शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

रूई येथे मोसंबी लागवड व्यवस्थापनाचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

गेवराई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तालुक्यातील रुई येथील प्रकल्पांतर्गत कृषी विद्यावेत्ता मुंबई येथील प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे ...

गेवराई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तालुक्यातील रुई येथील प्रकल्पांतर्गत कृषी विद्यावेत्ता मुंबई येथील प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे विद्यावेत्ता विजय कोळेकर यांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मोसंबी लागवड आणि व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. तसेच शेततळे व रेशीम लाभार्थी शेतकऱ्यांची बैठक घेऊन चौकी सेंटर तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

जिल्हांतर्गत क्षेत्रीय भेटी अंतर्गत या कार्यक्रमात वृक्ष लागवडीचे महत्व सांगून जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू लागवड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यातून बांबूपासून कुटीर उद्योग निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले. प्रकल्पांतर्गत शेडनेट पॉलिहाऊसचे जास्तीत जास्त लाभ घेऊन दर्जेदार मालाचे उत्पादन करून तो माल उत्पादक ते ग्राहक अशी सेवा दिल्यानंतर निश्चितच विक्रेता व उपयुक्तता या दोघांनाही फायदा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. विहीर पुनर्भरणाबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. जलव्यवस्थापन करून ठिबक व तुषारचा अवलंब करावा व कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल या अनुषंगाने शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा, असे यावेळी कोळेकर म्हणाले. उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व सहायकांनी पोकरा योजनेअंतर्गत असणारे सर्व ॲप व्यवस्थित वापरून शेतकऱ्यांपर्यंत हवामान सल्ला देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संवाद विशेषज्ञ संग्राम जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी मडके, तालुका कृषी अधिकारी बी.टी सोनवणे, मंडळ कृषी अधिकारी मस्के ,जगधने जयशिव, घसिंग, पवार, जाधव, पी. जी. पवार, के. के. पवार, के. एस. सुतार, आर. के. म्हेत्रे, डी. आर. राठोड, एस. बी. शिंदे, पी. एन. मुने, रुईचे सरपंच शिवाजी काजळे, कालिदास नवले, अंगद नवले सह शेतकरी उपस्थित होते.

डीबीटीमुळे शेतकरी समाधानी

रूई येथील कार्यक्रमानंतर गेवराई येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व कृषी सहायक व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. डीबीटी ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात येत असून ग्रामस्तरावरील शेतकरी समाधानी असल्याचे कोळेकर म्हणाले.