शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगड विकासास मिळाली गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:29 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात श्रीक्षेत्र नारायणगडास २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करुन दिल्यामुळे यातून गडाच्या विकासासंदर्भात अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. २०० वर्षे पुरातन असलेल्या या गडाकडे आतापर्यंत सर्वच प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे गडाचा विकास खुंटला होता, असे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्देआज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ; पालकमंत्री, महसूलमंत्र्यांचीही उपस्थिती - विनायक मेटे

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात श्रीक्षेत्र नारायणगडास २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करुन दिल्यामुळे यातून गडाच्या विकासासंदर्भात अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. २०० वर्षे पुरातन असलेल्या या गडाकडे आतापर्यंत सर्वच प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे गडाचा विकास खुंटला होता, असे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

यावेळी गडाचे विश्वस्त माजी आ. राजेंद्र जगताप, राजेंद्र मस्के, प्रभाकर कोलंगडे, अ‍ॅड. राहुल मस्के, अनिल घुमरे, सुहास पाटील उपस्थित होते. आ. मेटे म्हणाले की, उद्या १५ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री फडणवीस गडावर हेलिकॉप्टरद्वारे येतील. त्यांच्या हस्ते गडावरील विविध विकास कामांचा शुभारंभ होईल. यावेळी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित असतील.

गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाखाली विकास कामे होत आहेत. या गडाच्या विकासासाठी ४२ कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित होता. पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये मंजूर झाले. याशिवाय गडावर येणाºया रस्त्यांच्या विकासासाठी १५ कोटी रुपयांच्या प्रस्तावासही तत्वत: मान्यता मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षातच यापैकी काही निधी प्राप्त होईल. गडाची ५०० हेक्टर जमीन आहे. त्यापैकी काही कुळ कायद्यात अडकलेली होती. ही जमीनही महसूल मंत्री पाटील यांच्या सहकार्यातून परत गडाकडे परत आली आहे. पैकी २०० ते ३०० हेक्टरमध्ये आंबा, चिकू, जांभूळ यासारख्या फळझाडांची लागवड केली जाणार असून, या रोपट्यांच्या संवर्धनासाठी ७५ लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. यातून ठिबक सिंचन योजना कार्यान्वित होईल.

हे संस्थान जिल्ह्यासाठी भाविकांचे श्रध्दास्थान आहे. आतापर्यंत तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असलेल्या या गडास पर्यटनस्थळ म्हणूनही आकार देण्याचा प्रयत्न चालू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडाच्या विकासासाठी भरघोस निधी दिला असून दुसºया टप्प्यातही असाच निधी मिळेल. या निधीतून विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचेही आ. विनायक मेटे यांनी सांगितले.प्रस्तावित अंबाजोगाई जिल्ह्यास पाठिंबाप्रस्तावित अंबाजोगाई जिल्ह्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून रेंगाळला आहे. आता पुन्हा या प्रश्नाने उचल खाल्ली असून, सर्वपक्षीय समितीही स्थापन झाली आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या प्रस्तावास शिवसंग्रामचा पाठिंबा असून, समितीने दिलेल्या आदेशात शिवसंग्राम सक्रीय सहभाग नोंदवेल. या प्रश्नावर उद्या मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्याशी जिल्हा निर्मिती संयोजन समितीच्या पदाधिकाºयांची भेट घडवून आणली जाईल. यासाठी मी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा विकासासाठी भरीव घोषणेची अपेक्षाबीड जिल्हा हा नेहमीच निसर्गाच्या कोपाखाली आहे. आताही गारपीट झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी उद्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री भरीव घोषणा करतील अशी आशा आहे. तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या, मुस्लिम समाजाच्या मागण्या यावरही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणली जाईल, असेही आ. विनायक मेटे यांनी सांगितले.