शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगड विकासास मिळाली गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:29 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात श्रीक्षेत्र नारायणगडास २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करुन दिल्यामुळे यातून गडाच्या विकासासंदर्भात अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. २०० वर्षे पुरातन असलेल्या या गडाकडे आतापर्यंत सर्वच प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे गडाचा विकास खुंटला होता, असे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्देआज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ; पालकमंत्री, महसूलमंत्र्यांचीही उपस्थिती - विनायक मेटे

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात श्रीक्षेत्र नारायणगडास २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करुन दिल्यामुळे यातून गडाच्या विकासासंदर्भात अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. २०० वर्षे पुरातन असलेल्या या गडाकडे आतापर्यंत सर्वच प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे गडाचा विकास खुंटला होता, असे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

यावेळी गडाचे विश्वस्त माजी आ. राजेंद्र जगताप, राजेंद्र मस्के, प्रभाकर कोलंगडे, अ‍ॅड. राहुल मस्के, अनिल घुमरे, सुहास पाटील उपस्थित होते. आ. मेटे म्हणाले की, उद्या १५ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री फडणवीस गडावर हेलिकॉप्टरद्वारे येतील. त्यांच्या हस्ते गडावरील विविध विकास कामांचा शुभारंभ होईल. यावेळी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित असतील.

गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाखाली विकास कामे होत आहेत. या गडाच्या विकासासाठी ४२ कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित होता. पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये मंजूर झाले. याशिवाय गडावर येणाºया रस्त्यांच्या विकासासाठी १५ कोटी रुपयांच्या प्रस्तावासही तत्वत: मान्यता मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षातच यापैकी काही निधी प्राप्त होईल. गडाची ५०० हेक्टर जमीन आहे. त्यापैकी काही कुळ कायद्यात अडकलेली होती. ही जमीनही महसूल मंत्री पाटील यांच्या सहकार्यातून परत गडाकडे परत आली आहे. पैकी २०० ते ३०० हेक्टरमध्ये आंबा, चिकू, जांभूळ यासारख्या फळझाडांची लागवड केली जाणार असून, या रोपट्यांच्या संवर्धनासाठी ७५ लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. यातून ठिबक सिंचन योजना कार्यान्वित होईल.

हे संस्थान जिल्ह्यासाठी भाविकांचे श्रध्दास्थान आहे. आतापर्यंत तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असलेल्या या गडास पर्यटनस्थळ म्हणूनही आकार देण्याचा प्रयत्न चालू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडाच्या विकासासाठी भरघोस निधी दिला असून दुसºया टप्प्यातही असाच निधी मिळेल. या निधीतून विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचेही आ. विनायक मेटे यांनी सांगितले.प्रस्तावित अंबाजोगाई जिल्ह्यास पाठिंबाप्रस्तावित अंबाजोगाई जिल्ह्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून रेंगाळला आहे. आता पुन्हा या प्रश्नाने उचल खाल्ली असून, सर्वपक्षीय समितीही स्थापन झाली आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या प्रस्तावास शिवसंग्रामचा पाठिंबा असून, समितीने दिलेल्या आदेशात शिवसंग्राम सक्रीय सहभाग नोंदवेल. या प्रश्नावर उद्या मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्याशी जिल्हा निर्मिती संयोजन समितीच्या पदाधिकाºयांची भेट घडवून आणली जाईल. यासाठी मी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा विकासासाठी भरीव घोषणेची अपेक्षाबीड जिल्हा हा नेहमीच निसर्गाच्या कोपाखाली आहे. आताही गारपीट झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी उद्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री भरीव घोषणा करतील अशी आशा आहे. तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या, मुस्लिम समाजाच्या मागण्या यावरही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणली जाईल, असेही आ. विनायक मेटे यांनी सांगितले.