शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
4
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
5
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
6
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
7
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
8
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
9
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
10
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
11
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
12
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
13
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
14
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
15
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
16
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
17
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
18
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
19
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

किराणाची तुटली, पण कोरोनाची साखळी तुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST

बीड : प्रशासनाच्या आदेशानुसार मागील १५ -२० दिवसांपासून किराणा दुकाने बंद आहेत, तर आता घरातला किराणाही संपला आहे. या ...

बीड : प्रशासनाच्या आदेशानुसार मागील १५ -२० दिवसांपासून किराणा दुकाने बंद आहेत, तर आता घरातला किराणाही संपला आहे. या कालावधीत दुकाने बंद राहिल्याने गर्दीचा प्रश्नच राहिला नाही. आतातरी कोरोनाची साखळी तुटेल, असे वाटले. परंतु कोरोनाचे रुग्ण घटण्याचे प्रमाण फारसे समाधानकारक दिसून आलेले नाही. किराणाची तुटली, पण कोरोनाची साखळी तुटेना, अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. किराणा दुकानांमुळे कोरोना पसरतो आणि किराणा बंद केल्याने कोरोना थांबेल, हे दोन्ही निष्कर्ष मात्र सध्यातरी फोल ठरल्याचे दिसत आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत प्रशासनाने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली. सचारबंदीच्या कालावधीत विनाकारण फिरणारे, तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. सुरूवातीपासून जीवनावश्यक असलेला किराणा प्रशासनाच्या यादीतून अनावश्यक झाला. किराणा दुकानेही इतर आस्थापनांप्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश झाले. ही दुकाने कधीपर्यंत बंद ठेवली जाणार, याची स्पष्टता नसल्याने काही ग्राहकांनी अधिकची खरेदी करून तजवीज केली, तर अनेकांनी आर्थिक अडचणींमुळे क्षमतेइतकी खरेदी केली. आता खरेदीसाठी मोठा खंड पडल्याने घराघरातील किराणा संपत आला आहे, तर काहींचा किराणा संपला आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांचा रोजगार बंद आहे. अशा घरांमध्ये परिस्थती बिकटच आहे. किराणा दुकाने कधी उघडतील, याची प्रतीक्षा करीत लॉकडाऊनच्या बातम्यांकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत ग्राहक त्रस्त, तर दुकानदार बेजार झाले आहेत. व्यवसायासाठी गुंतविलेल्या भांडवलाचेे अन लॉकडाऊनमुळे होत असलेल्या नुकसानीची चिंता त्यांना सतावत आहे, तर अधिकाऱ्यांना घरी किराणा लागत नाही काय, असा संतप्त सवाल एका सामान्य ग्राहकाने केला.

बंद दुकान उंदरांना मोकळे रान

लॉकडाऊन शिथिल होताच किराणा व्यापाऱ्यांना नव्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. कुलूप उघडले, शटर उचलताच कोळ्याने विणलेले जाळे सारून प्रवेश करावा लागेल. त्यानंतर दुकानात उंदरांनी घातलेला धुमाकूळ नजरेस पडणार आहे. मसाल्याच्या बरण्यांचे तुकडे विखुरलेले आढळतील. फोडलेले मॅगीचे पुडे अस्ताव्यस्त दिसतील. पाण्याअभावी कासावीस उंदरांनी गोडेतेलाच्या पुड्याला पाणी समजून फोडलेले व दुकानात तेलच तेल पसरलेले दिसेल. बिस्किटांच्या पुड्यांचा उंदरांनी अक्षरशः फडशा पाडला असणार. हवा न मिळाल्याने शेंगदाण्याला बुरशी चढलेली असणार. शाम्पूच्या बाटल्या, लोणच्याच्या बरण्या फुटलेल्या दिसतील. इतर खाद्यपदार्थांचेही नुकसान दिसणार आहे. नुकसानीचा हा आकडा पंचनाम्यात नोंदला जाणार नाही. शेंगदाण्याचे दोन कट्टे जरी खराब झाले तर किमान दहा हजारांचे नुकसान होते. इथे तर शेकडो दुकानांमध्ये उंदरांना रान मोकळे होते. नोकरांचा पगार, दुकानाचे भाडे, बँकेच्या व्याजाचा भुर्दंड आहेच. गतवर्षीच्या नुकसानीतून अजूनही सावरलेले नसताना परत यावर्षी अजून हा फटका किराणा व्यावसायिकांना बसणार आहे. दुकाने उघडल्यानंतर परत तेजीच्या दराने खरेदी केलेला माल मंदीत विकावा लागणार असल्याने कंबरडे मोडणार आहे.