शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

तलावामुळे डोंगर पट्ट्यात हरितक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : धारूरच्या डोंगरपट्ट्यात बारमाही दुष्काळी स्थिती होती. आता मात्र वाढत्या सिंचन प्रकल्पामुळे डोंगरपट्ट्यात हरितक्रांती होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : धारूरच्या डोंगरपट्ट्यात बारमाही दुष्काळी स्थिती होती. आता मात्र वाढत्या सिंचन प्रकल्पामुळे डोंगरपट्ट्यात हरितक्रांती होत आहे. यंदा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे अरणवाडी साठवण तलाव पर्यटकांसाठी पर्यटन स्थळ बनला आहे. पाच ते सहा गावांत अरणवाडी तलावामुळे हरित क्रांती होऊ पाहत आहे. पावसाचे पाणी वाहून जाऊ नये म्हणून अरणवाडी साठवण तलावाचा निर्णय झाला. तलावाचे काम गेल्या पंधरा वर्षांपासून रखडले होते. तो यावर्षी पूर्ण झाला व पहिल्याच पावसात पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधानाचे वातावरण आहे. या रस्त्यांच्या बाजूने राष्ट्रीय महामार्ग ४५८ सी हा गेल्याने हा साठवण तलाव सर्वांचे आकर्षण ठरू लागला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे नुकसान होऊ नये म्हणून पाटबंधारेकडून या तलावाचा सांडवा फोडण्यात आला होता. हे प्रकरण वादग्रस्त ठरले होते. यानंतर पुन्हा कालव्याचे काम ‘जैसे थे’ करण्यात आले. त्यानंतरही तलाव भरल्याने पाणी सांडव्यावरून वाहू लागले. महामार्गावरून जाणाऱ्या निसर्ग प्रेमींसाठी हे आकर्षक पर्यटनस्थळच झाले आहे. या तलावामुळे चोरांबा अरणवाडी, थेटेगव्हाण, पहाडी पारगाव, ढगेवाडी, सोनीमोहा आदी गावातील शेतीला फायदा होणार आहे. यामुळे डोंगराळ जमीन ओलिताखाली येणार आहे. सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.

पर्यटनासाठी आकर्षण

अरणवाडी तलाव चोहोबाजूंनी डोंगर असल्याने निसर्ग सौंदर्याने फुलला आहे. महामार्गही जवळून जात आहे. यामुळे पर्यटक याकडे आकर्षित होत आहेत. यामुळे हा सेल्फी पॉइंट ठरत आहे. महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनादेखील सेल्फीचा मोह आवरत नाही. तलावामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती निर्माण होणार असल्याचे परिसरातील ग्रामस्थ बाळासाहेब चव्हाण म्हणाले.

040921\04bed_1_04092021_14.jpg