शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आवक नसल्याने द्राक्षाचे भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:34 IST

अंबाजोगाई : तालुक्यात सध्या लॉकडाऊन असल्याने व द्राक्षाची वाहतुकीद्वारे होणारी आवक थंडावल्याने द्राक्षाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ४० ...

अंबाजोगाई : तालुक्यात सध्या लॉकडाऊन असल्याने व द्राक्षाची वाहतुकीद्वारे होणारी आवक थंडावल्याने द्राक्षाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ४० ते ५० रुपये किलोच्या दराने विकले जाणारे द्राक्ष आता ७० ते ८० रुपये किलोने ग्राहकांना मिळू लागले आहेत. लॉकडाऊनमुळे बंद असलेला बाजार व फळांची कमी असलेली आवक यामुळे द्राक्षाबरोबरच इतर फळांचेही भाव मोठ्या प्रमाणात वधारले आहेत.

खाद्यतेलांच्या किमती वाढल्या

अंबाजोगाई : शेंगदाणा, सोयाबीन व सूर्यफुलाच्या तेलाच्या दरात या महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ११० रुपये प्रतिकिलो मिळणारे तेल आता १४५ ते १५० रुपये झाले आहे. याशिवाय गॅसच्या किमतीही भडकल्या आहेत. पेट्रोलच्या किमतीही वाढल्या आहेत. एकूणच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागले असून दाद मागावी तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुलांची काळजी घ्या

अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशावेळी लहान मुलांची पालकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांची प्रतिकारशक्ती सक्षम ठेवण्यासाठी आहाराचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच लहान मुलांना घराबाहेर पडण्यासाठी खबरदारी बाळगावी, असे आवाहन श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. राहुल धाकडे यांनी केले आहे.

समित्या स्थापन करा

अंबाजोगाई : अंबाजोागई तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागानुसार समिती स्थापन करणे गरजेचे आहे. समितीतील लोक नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यासाठी मज्जाव करतील व याची पोलीस यंत्रणेला व स्थानिक प्रशासनाला याची मोठी मदत होणार आहे. यासाठी अशा समित्या स्थापन करण्यासाठी शासनाने पुढाकर घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद तापडे यांनी केली आहे.

आंबा उत्पादकांना मदत करा

अंबाजोगाई : यावर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे गावरान व केशर आंबा मोठ्या प्रमाणात रखडला होता. मात्र, मार्च महिन्यात सलग दोन वेळा झालेल्या गारपिटीमुळे लागलेले आंबे गळून पडले. तर अनेक ठिकाणी आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात झडल्याने आंबा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केज विधानसभा मतदारसंघात आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे यांनी केली आहे.