शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:15 IST

साहित्याचा उगम पुढच्या पिढीशी जोडता आला तर निश्चितच भावी पिढी सुसंस्कृत होईल, असे सांगून माणसाची अधोगती रोखण्याचे काम साहित्यातून होते, असे प्रतिपादन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

ठळक मुद्देमाणसाची अधोगती रोखण्याचे सामर्थ्य साहित्यातच - पंकजा मुंडे

अविनाश मुडेगावकर।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई (आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक नगरी) बाबासाहेब परांजपे व्यासपीठ - साहित्याचा उगम पुढच्या पिढीशी जोडता आला तर निश्चितच भावी पिढी सुसंस्कृत होईल, असे सांगून माणसाची अधोगती रोखण्याचे काम साहित्यातून होते, असे प्रतिपादन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

अंबाजोगाई येथे बीड जिल्हा शिक्षण विभाग आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून पंकजा मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी होते. तर व्यासपीठावर ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे, खा. रजनीताई पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, माजी मंत्री सुरेश धस, रमेश आडसकर, आ. संगिता ठोंबरे, नगराध्यक्षा रचना मोदी, माजी आ. उषा दराडे, जि. प. सभापती शोभा दरेकर, संजय दौंड, अ‍ॅड. आनंदराव चव्हाण, जि.प. चे सभापती संतोष हंगे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अक्षयकुमार काळे, शिक्षणाधिकारी भावना राजनूर, म.सा.प. अध्यक्ष कौतिकराव ठालेपाटील, उपाध्यक्ष किरण सगर, सचिव दादा गोरे, भास्कर बडे, अमर हबीब, दगडू लोमटे, भगवानराव सोनवणे, व्यंकटेश गायकवाड, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपस्थित होते.

साने गुरूजी प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून व दीपप्रज्वलनाने साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या वाटचाल या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. तर साहित्य परिषदेच्या वतीने वि. अ. कानोले लिखित मुकुंदराजांची अंबानगरी कोणती? या ग्रंथाचे प्रकाशन तसेच संत कवी विष्णुदास विशेषांकाचे प्रकाशनही झाले.

म.सा.प.चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी अध्यक्षपदाची सुत्रे प्रा. रंगनाथ तिवारी यांच्याकडे सुपूर्द केली. पाहुण्यांचे स्वागत स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले. यावेळी पंकजा मुंडे यांनी ज्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ज्यांची जडणघडण झाली ते आजच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांच्यामुळे गोपीनाथ मुंडे- प्रमोद महाजनांच्या जीवनाला कलाटणी मिळाली, याच्या आठवणी विशद केल्या.संमेलनाध्यक्ष प्रा. तिवारी यांचा परिचय वैशाली कंकाळ यांनी करून दिला. प्रास्ताविक दगडू लोमटे यांनी केले. संचालन योगीराज माने यांनी केले. आभार वैशाली गोस्वामी यांनी मानले.

जाणीव व उणीव हे शब्दांचे खेळ ज्याला कळतात तो जीवनात यशस्वी होतोअंबाजोगाई शहराने प्राचीन काळापासून सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. अंबाजोगाईच्या साहित्यिकांनी देशात लौकिक केला. त्यामुळेच हे साहित्य संमेलन यशस्वीरीत्या पार पडत आहे. माणूस आठवणीत जगत असतो. ही आठवण माणसाला इतिहासात नेते. ज्याला इतिहास कळला, त्याला भविष्य कळते. यासाठी माणसाचं जीवन हे सुसंगत करण्यासाठी जीवनाला साहित्याची जोड असली पाहिजे. माणसाला आपली अभिव्यक्ती मांडता आली पाहिजे. श्रोता व वक्ता हे नातं कळलं पाहिजे. शब्दांमध्ये मोठी ताकद असते. जाणीव व उणीव हे शब्दांचे खेळ ज्याला कळतात तो जीवनात यशस्वी होतो. आज समाजामध्ये जी सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, ती अबाधित ठेवण्यासाठी माध्यमांनी लोकांच्या मनातील शांतता हिरावून घेऊ नये.- पंकजा मुंडे, उद्घाटक

शिक्षण व साहित्य यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी हा साहित्य संमेलनाचा खटाटोपमराठवाडा हा सर्वच बाबतीत मागासलेला समजला जातो. हा कलंक दूर करण्यासाठी सामूहिक पुढाकाराची गरज आहे. प्रत्येकाने आपआपल्या क्षेत्रात ठोसपणे काम केले तर हा कलंक पुसून झाली अशी अपेक्षा त्यांनी केली. इंग्रजी भाषा माणसाला अवगत झाली नाही तर त्याची कुचंबणा होते. याचा प्रत्यय आपण अनुभवला. ही वेळ पुन्हा ग्रामीण भागातल्या माणसावर पुन्हा येऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण सभापती झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांना पहिलीपासूनच सेमी इंग्रजीचे शिक्षण हा निर्णय आपण घेतला. शिक्षण व साहित्य यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी हा साहित्य संमेलनाचा खटाटोप आहे.- राजेसाहेब देशमुख स्वागताध्यक्ष

साहित्य संमेलन प्रेरणादायीतंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने क्रांती घडत असताना मोबाईलचा अतिवापर ही आजच्या बालकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईलचा अतिवापर टाळायला लावून पुस्तक वाचनाची गोडी निर्माण करावी. बीड जिल्ह्याला धार्मिक, सामाजिक, सहिष्णुतेचा इतिहास आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याचे वेगळेपण समोर येते. एका शिक्षकाच्या मुलाने शिक्षण सभापती झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून भरविलेले हे साहित्य संमेलन प्रेरणादायी आहे. अंबाजोगाईतला साहित्यिकांचा मोठा वारसा असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून या शहराने आपली वेगळी ओळख निर्माण केल्याने अंबाजोगाईचे वेगळेपण आजही महाराष्ट्रात टिकून आहे.- रजनीताई पाटीलप्रमुख अतिथी

शासनाचे उदासीन धोरण कारणीभूतदेशातील शेतक-यांच्या प्रश्नांकडे सर्वच सरकारे दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांच्या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहेत. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. शेतकºयांच्या विरोधात २५४ कायदे आहेत. या जाचक कायद्यांमुळे शेतकरी मरण जवळ करीत आहेत. या बाबतीत शासनाचे उदासीन धोरण याला कारणीभूत आहे. तसेच चित्रपट निर्माते अप्रामाणिकपणे काम करीत असून इतिहास सांगण्यापेक्षा काल्पनिक चित्र रंगवून त्यांची नजर फक्त गल्ल्यावरच आहे. या माध्यमातून लोकभावनेचा मोठ्या प्रमाणात अनादर होत आहे. - कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, मसाप