शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण होईपर्यंत ग्रामसेवकांचा कामावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST

प्रशासनाच्या नोटिसीनंतर पवित्रा : अपहार, अनियमितता झाली नसल्याचा दावा बीड : ‘काम केले प्रशासनाने आणि बळीचे बकरे म्हणजे ग्रामसेवक’ ...

प्रशासनाच्या नोटिसीनंतर पवित्रा : अपहार, अनियमितता झाली नसल्याचा दावा

बीड : ‘काम केले प्रशासनाने आणि बळीचे बकरे म्हणजे ग्रामसेवक’ या धोरणामुळे बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ैहैराण झाले असून, जोपर्यंत नरेगासाठी ग्रामसेवक वगळता स्वतंत्र यंत्रणा निर्माण होत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटना नरेगाच्या सर्व कामावर बहिष्कार टाकत असल्याची माहिती जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बळिराम उबाळे व सचिव भगवान तिडके यांनी दिली.

सध्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना नरेगा विषयात नोटिसा बजावलेल्या आहेत. त्यामध्ये मागील १० वर्षांत झालेल्या लेखापरीक्षण अहवालातील आक्षेप नोंदविलेले आहेत. परंतु, हे लेखा आक्षेप ग्रामपंचायतीला ७ ते १० वर्षांपासून प्राप्त झालेले नाहीत. या आक्षेपांबाबत ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवकांना कसल्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे आक्षेपांची पूर्तता करण्याची संधी मिळालेली नाही. काही बँका व लेखापरीक्षकांच्या तांत्रिक चुकांमुळे रोखीने देयक दिल्याचे आक्षेप नोंदविले आहेत. वास्तविक ग्रामपंचायतीने संबंधित एजन्सी किंवा लाभार्थींना धनादेशाद्वारे रकमा दिलेल्या आहेत. तसेच वैयक्तिक ज.ल.वि. व इतर वैयक्तिक कामे पूर्ण होऊन त्यांची देयके (कुशल) दोन ते तीन वर्षांनी ग्रामपंचायतीला प्राप्त होतात. त्यामुळे या कालावधीत कोणतीही एजन्सी किंवा दुकानदार उधारीवर थांबत नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी पदरमोड करून त्यांचे पैसे दिलेले असतात. साधारणत: दोन वर्षांनंतर कुशल देयके प्राप्त झाल्यावर ग्रामपंचायतीने संबंधित शेतकऱ्यांना चेकद्वारे कुशल देयके अदा केलेली आहेत. त्यामुळे या कामात कसल्याही प्रकारचा अपहार किंवा अनियमितता झालेली नसल्याचे उबाळे यांनी सांगितले. तसेच नरेगा यंत्रणा ही केंद्र शासनाची योजना असून, राज्य शासन किंवा वेगळी यंत्रणा नाही. त्यामुळे योजना राबविण्यासाठी व कंत्राटी पद्धतीची यंत्रणा निर्माण केली, ज्यामध्ये तालुका स्तरावर ग.वि.अ., शाखा अभियंता, लेखा अधिकारी, वि.अ., एपीओ, डीपीओ, डाटा एंट्री ऑपरेटर्स यांच्यामार्फत फाईल जाते. ग्रामपंचायतीकडूनही मंजूर कामाची हजेरी पत्रके व कुशल देयके या यंत्रणेकडून तपासून दिली जातात. त्यामुळे नरेगात चुका होण्याची शक्यता नसते. लेखापरीक्षकांनी काढलेल्या आक्षेपानुसार नोटीस फक्त ग्रामसेवक, सरपंचांनाच देण्यात आल्या आहेत. हा प्रकार म्हणजे काम केले प्रशासनाने आणि बळीचे बकरे म्हणजे ग्रामसेवक, त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक हैराण झाले आहेत. त्यामुळे सततच्या होणाऱ्या त्रासाला व जाचाला वैतागून ग्रामसेवक न्यायासाठी राज्य शासन व न्यायालयाकडे दाद मागत आहेत. जोपर्यंत नरेगासाठी ग्रामसेवक वगळता स्वतंत्र यंत्रणा निर्माण होत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटना या नरेगाच्या सर्व कामांवर बहिष्कार टाकत आहे, असे बळिराम उबाळे व भगवान तिडके यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.