शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण होईपर्यंत ग्रामसेवकांचा कामावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST

प्रशासनाच्या नोटिसीनंतर पवित्रा : अपहार, अनियमितता झाली नसल्याचा दावा बीड : ‘काम केले प्रशासनाने आणि बळीचे बकरे म्हणजे ग्रामसेवक’ ...

प्रशासनाच्या नोटिसीनंतर पवित्रा : अपहार, अनियमितता झाली नसल्याचा दावा

बीड : ‘काम केले प्रशासनाने आणि बळीचे बकरे म्हणजे ग्रामसेवक’ या धोरणामुळे बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ैहैराण झाले असून, जोपर्यंत नरेगासाठी ग्रामसेवक वगळता स्वतंत्र यंत्रणा निर्माण होत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटना नरेगाच्या सर्व कामावर बहिष्कार टाकत असल्याची माहिती जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बळिराम उबाळे व सचिव भगवान तिडके यांनी दिली.

सध्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना नरेगा विषयात नोटिसा बजावलेल्या आहेत. त्यामध्ये मागील १० वर्षांत झालेल्या लेखापरीक्षण अहवालातील आक्षेप नोंदविलेले आहेत. परंतु, हे लेखा आक्षेप ग्रामपंचायतीला ७ ते १० वर्षांपासून प्राप्त झालेले नाहीत. या आक्षेपांबाबत ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवकांना कसल्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे आक्षेपांची पूर्तता करण्याची संधी मिळालेली नाही. काही बँका व लेखापरीक्षकांच्या तांत्रिक चुकांमुळे रोखीने देयक दिल्याचे आक्षेप नोंदविले आहेत. वास्तविक ग्रामपंचायतीने संबंधित एजन्सी किंवा लाभार्थींना धनादेशाद्वारे रकमा दिलेल्या आहेत. तसेच वैयक्तिक ज.ल.वि. व इतर वैयक्तिक कामे पूर्ण होऊन त्यांची देयके (कुशल) दोन ते तीन वर्षांनी ग्रामपंचायतीला प्राप्त होतात. त्यामुळे या कालावधीत कोणतीही एजन्सी किंवा दुकानदार उधारीवर थांबत नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी पदरमोड करून त्यांचे पैसे दिलेले असतात. साधारणत: दोन वर्षांनंतर कुशल देयके प्राप्त झाल्यावर ग्रामपंचायतीने संबंधित शेतकऱ्यांना चेकद्वारे कुशल देयके अदा केलेली आहेत. त्यामुळे या कामात कसल्याही प्रकारचा अपहार किंवा अनियमितता झालेली नसल्याचे उबाळे यांनी सांगितले. तसेच नरेगा यंत्रणा ही केंद्र शासनाची योजना असून, राज्य शासन किंवा वेगळी यंत्रणा नाही. त्यामुळे योजना राबविण्यासाठी व कंत्राटी पद्धतीची यंत्रणा निर्माण केली, ज्यामध्ये तालुका स्तरावर ग.वि.अ., शाखा अभियंता, लेखा अधिकारी, वि.अ., एपीओ, डीपीओ, डाटा एंट्री ऑपरेटर्स यांच्यामार्फत फाईल जाते. ग्रामपंचायतीकडूनही मंजूर कामाची हजेरी पत्रके व कुशल देयके या यंत्रणेकडून तपासून दिली जातात. त्यामुळे नरेगात चुका होण्याची शक्यता नसते. लेखापरीक्षकांनी काढलेल्या आक्षेपानुसार नोटीस फक्त ग्रामसेवक, सरपंचांनाच देण्यात आल्या आहेत. हा प्रकार म्हणजे काम केले प्रशासनाने आणि बळीचे बकरे म्हणजे ग्रामसेवक, त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक हैराण झाले आहेत. त्यामुळे सततच्या होणाऱ्या त्रासाला व जाचाला वैतागून ग्रामसेवक न्यायासाठी राज्य शासन व न्यायालयाकडे दाद मागत आहेत. जोपर्यंत नरेगासाठी ग्रामसेवक वगळता स्वतंत्र यंत्रणा निर्माण होत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटना या नरेगाच्या सर्व कामांवर बहिष्कार टाकत आहे, असे बळिराम उबाळे व भगवान तिडके यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.