शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल खर्चास ग्रामपंचायतींचा ठेंगा, पालिकेने तोडले 11 गावचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 17:49 IST

माजलगांव धरणामधून शहर व आजूबाजूची 11 खेडे अशी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाते. याच्या देखभालीची जबाबदारी माजलगांव नगर पालिकेवर आहे. योजनेच्या देखभालीचा खर्च मोठया प्रमाणावर असल्याने या 11 खेडयांनी मिळुन खर्च उचलायचा आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या ग्रामपंचायती देखभाल खर्च जमाकरण्यात ठेंगा दाखवत आहेत. यामुळे नगरपालिकेने या गावांची पाणी कपात केल्याने या गावातील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमाजलगांव धरणामधून शहर व आजूबाजूची 11 खेडे अशी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाते.देखभालीचा खर्च मोठया प्रमाणावर असल्याने या 11 खेडयांनी मिळुन खर्च उचलायचा आहे. नगर पालिकेला या योजनेच्या विद्युत बिलापोटी दरमहा सुमारे 18 लक्ष रुपये भरावे लागतात.

माजलगाव ( बीड ), दि. 14 : माजलगांव धरणामधून शहर व आजूबाजूची 11 खेडे अशी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाते. याच्या देखभालीची जबाबदारी माजलगांव नगर पालिकेवर आहे. योजनेच्या देखभालीचा खर्च मोठया प्रमाणावर असल्याने या 11 खेडयांनी मिळुन खर्च उचलायचा आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या ग्रामपंचायती देखभाल खर्च जमाकरण्यात ठेंगा दाखवत आहेत. यामुळे नगरपालिकेने या गावांची पाणी कपात केल्याने या गावातील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहर व 11 गावे अशी १२ गावांची तहान भागवणारी पाणी पुरवठा योजना म्हणून या योजनेची ओळख आहे. यात शेलापुरी, रेणापुरी, चिंचगव्हाण, देवखेडा, नांदुर,भाटवडगांव, मनुर आदी गावांना माजलगांव धरणात असलेल्या जॅकवेलद्वारे फिल्टर प्लॅंटमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. योजना राबवताना नगर पालिका व संबंधीत 11 खेडे यांच्यामध्ये देखभाल दुरुस्तीच्या रकमेसंबंधात स्पष्ट करार झालेले आहेत. त्यानुसार नगर पालिकेने देखभालीची जबबादारी घेत त्यांचा हिस्सा उचलायचा असुन 11 खेडयांनी देखील त्यात आपली हिस्सेदारी जमा करावयाची आहे. 

करारानुसार मागील अनेक दिवसांपासुन नगर पालिका या 11 खेडयांमधील कारभा-यांना पैसे जमा करण्या बाबत वारंवार कळविते. परंतु,  सदरील 11 खेडयांमधील कारभारी मात्र पालिकेने दिलेल्या नोटीसांना दाद देण्यास तयार नसतात. पालिकेने चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला परंतु, कधी 10 हजार तर कधी 5 हजार अशी जुजबी रक्कम भरु ते आश्वासन देत. देखभाल खर्च मोठा असल्याने शेवटी पालिकेने मागील आठ दिवसांपासुन संबंधीत गावांचा पाणी पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. येणा-या सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा खंडीत झाल्याने या गावात एकच खळबळ उडाली आहे. 

18 लाखाचे येते बिल  नगर पालिकेला या योजनेच्या विद्युत बिलापोटी दरमहा सुमारे 18 लक्ष रुपये भरावे लागतात. या खर्चाचा मोठा ताण पालिकेवर पडत आहे त्यामुळे नाईलाजास्तव पालिकेस हा निर्णय घ्यावा लागल्याचे पाणी पुरवठा अधिका-यांनी सांगितले.  यासोबतच ११ गावचे प्रतिनिधी आपला वाटा भरत नाहीतच उलट पुरवठा सुरु करा नाहीतर आंदोलन करू अशा धमक्या देतात अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.  

रक्कम भरताच पाणी पुरवठा पुर्ववत करू 

ही योजना 13 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. तेव्हापासून या योजनेतून शहरा बरोबरच 11 खेडयांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु,  संबंधीत ग्रामपंचायतींना वारंवार सुचना तसेच नोटीस देवून देखील ते देखभाल व दुरुस्तीसाठी साठीचे रक्कम पालिकेकडे जमा करीत नाहीत. रक्कम जमा करताच पाणी पुरवठा पुर्ववत करण्यात येईल. -सहाल चाउस, नगराध्यक्ष