शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल खर्चास ग्रामपंचायतींचा ठेंगा, पालिकेने तोडले 11 गावचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 17:49 IST

माजलगांव धरणामधून शहर व आजूबाजूची 11 खेडे अशी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाते. याच्या देखभालीची जबाबदारी माजलगांव नगर पालिकेवर आहे. योजनेच्या देखभालीचा खर्च मोठया प्रमाणावर असल्याने या 11 खेडयांनी मिळुन खर्च उचलायचा आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या ग्रामपंचायती देखभाल खर्च जमाकरण्यात ठेंगा दाखवत आहेत. यामुळे नगरपालिकेने या गावांची पाणी कपात केल्याने या गावातील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमाजलगांव धरणामधून शहर व आजूबाजूची 11 खेडे अशी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाते.देखभालीचा खर्च मोठया प्रमाणावर असल्याने या 11 खेडयांनी मिळुन खर्च उचलायचा आहे. नगर पालिकेला या योजनेच्या विद्युत बिलापोटी दरमहा सुमारे 18 लक्ष रुपये भरावे लागतात.

माजलगाव ( बीड ), दि. 14 : माजलगांव धरणामधून शहर व आजूबाजूची 11 खेडे अशी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाते. याच्या देखभालीची जबाबदारी माजलगांव नगर पालिकेवर आहे. योजनेच्या देखभालीचा खर्च मोठया प्रमाणावर असल्याने या 11 खेडयांनी मिळुन खर्च उचलायचा आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या ग्रामपंचायती देखभाल खर्च जमाकरण्यात ठेंगा दाखवत आहेत. यामुळे नगरपालिकेने या गावांची पाणी कपात केल्याने या गावातील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहर व 11 गावे अशी १२ गावांची तहान भागवणारी पाणी पुरवठा योजना म्हणून या योजनेची ओळख आहे. यात शेलापुरी, रेणापुरी, चिंचगव्हाण, देवखेडा, नांदुर,भाटवडगांव, मनुर आदी गावांना माजलगांव धरणात असलेल्या जॅकवेलद्वारे फिल्टर प्लॅंटमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. योजना राबवताना नगर पालिका व संबंधीत 11 खेडे यांच्यामध्ये देखभाल दुरुस्तीच्या रकमेसंबंधात स्पष्ट करार झालेले आहेत. त्यानुसार नगर पालिकेने देखभालीची जबबादारी घेत त्यांचा हिस्सा उचलायचा असुन 11 खेडयांनी देखील त्यात आपली हिस्सेदारी जमा करावयाची आहे. 

करारानुसार मागील अनेक दिवसांपासुन नगर पालिका या 11 खेडयांमधील कारभा-यांना पैसे जमा करण्या बाबत वारंवार कळविते. परंतु,  सदरील 11 खेडयांमधील कारभारी मात्र पालिकेने दिलेल्या नोटीसांना दाद देण्यास तयार नसतात. पालिकेने चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला परंतु, कधी 10 हजार तर कधी 5 हजार अशी जुजबी रक्कम भरु ते आश्वासन देत. देखभाल खर्च मोठा असल्याने शेवटी पालिकेने मागील आठ दिवसांपासुन संबंधीत गावांचा पाणी पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. येणा-या सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा खंडीत झाल्याने या गावात एकच खळबळ उडाली आहे. 

18 लाखाचे येते बिल  नगर पालिकेला या योजनेच्या विद्युत बिलापोटी दरमहा सुमारे 18 लक्ष रुपये भरावे लागतात. या खर्चाचा मोठा ताण पालिकेवर पडत आहे त्यामुळे नाईलाजास्तव पालिकेस हा निर्णय घ्यावा लागल्याचे पाणी पुरवठा अधिका-यांनी सांगितले.  यासोबतच ११ गावचे प्रतिनिधी आपला वाटा भरत नाहीतच उलट पुरवठा सुरु करा नाहीतर आंदोलन करू अशा धमक्या देतात अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.  

रक्कम भरताच पाणी पुरवठा पुर्ववत करू 

ही योजना 13 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. तेव्हापासून या योजनेतून शहरा बरोबरच 11 खेडयांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु,  संबंधीत ग्रामपंचायतींना वारंवार सुचना तसेच नोटीस देवून देखील ते देखभाल व दुरुस्तीसाठी साठीचे रक्कम पालिकेकडे जमा करीत नाहीत. रक्कम जमा करताच पाणी पुरवठा पुर्ववत करण्यात येईल. -सहाल चाउस, नगराध्यक्ष