शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल खर्चास ग्रामपंचायतींचा ठेंगा, पालिकेने तोडले 11 गावचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 17:49 IST

माजलगांव धरणामधून शहर व आजूबाजूची 11 खेडे अशी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाते. याच्या देखभालीची जबाबदारी माजलगांव नगर पालिकेवर आहे. योजनेच्या देखभालीचा खर्च मोठया प्रमाणावर असल्याने या 11 खेडयांनी मिळुन खर्च उचलायचा आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या ग्रामपंचायती देखभाल खर्च जमाकरण्यात ठेंगा दाखवत आहेत. यामुळे नगरपालिकेने या गावांची पाणी कपात केल्याने या गावातील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमाजलगांव धरणामधून शहर व आजूबाजूची 11 खेडे अशी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाते.देखभालीचा खर्च मोठया प्रमाणावर असल्याने या 11 खेडयांनी मिळुन खर्च उचलायचा आहे. नगर पालिकेला या योजनेच्या विद्युत बिलापोटी दरमहा सुमारे 18 लक्ष रुपये भरावे लागतात.

माजलगाव ( बीड ), दि. 14 : माजलगांव धरणामधून शहर व आजूबाजूची 11 खेडे अशी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाते. याच्या देखभालीची जबाबदारी माजलगांव नगर पालिकेवर आहे. योजनेच्या देखभालीचा खर्च मोठया प्रमाणावर असल्याने या 11 खेडयांनी मिळुन खर्च उचलायचा आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या ग्रामपंचायती देखभाल खर्च जमाकरण्यात ठेंगा दाखवत आहेत. यामुळे नगरपालिकेने या गावांची पाणी कपात केल्याने या गावातील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहर व 11 गावे अशी १२ गावांची तहान भागवणारी पाणी पुरवठा योजना म्हणून या योजनेची ओळख आहे. यात शेलापुरी, रेणापुरी, चिंचगव्हाण, देवखेडा, नांदुर,भाटवडगांव, मनुर आदी गावांना माजलगांव धरणात असलेल्या जॅकवेलद्वारे फिल्टर प्लॅंटमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. योजना राबवताना नगर पालिका व संबंधीत 11 खेडे यांच्यामध्ये देखभाल दुरुस्तीच्या रकमेसंबंधात स्पष्ट करार झालेले आहेत. त्यानुसार नगर पालिकेने देखभालीची जबबादारी घेत त्यांचा हिस्सा उचलायचा असुन 11 खेडयांनी देखील त्यात आपली हिस्सेदारी जमा करावयाची आहे. 

करारानुसार मागील अनेक दिवसांपासुन नगर पालिका या 11 खेडयांमधील कारभा-यांना पैसे जमा करण्या बाबत वारंवार कळविते. परंतु,  सदरील 11 खेडयांमधील कारभारी मात्र पालिकेने दिलेल्या नोटीसांना दाद देण्यास तयार नसतात. पालिकेने चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला परंतु, कधी 10 हजार तर कधी 5 हजार अशी जुजबी रक्कम भरु ते आश्वासन देत. देखभाल खर्च मोठा असल्याने शेवटी पालिकेने मागील आठ दिवसांपासुन संबंधीत गावांचा पाणी पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. येणा-या सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा खंडीत झाल्याने या गावात एकच खळबळ उडाली आहे. 

18 लाखाचे येते बिल  नगर पालिकेला या योजनेच्या विद्युत बिलापोटी दरमहा सुमारे 18 लक्ष रुपये भरावे लागतात. या खर्चाचा मोठा ताण पालिकेवर पडत आहे त्यामुळे नाईलाजास्तव पालिकेस हा निर्णय घ्यावा लागल्याचे पाणी पुरवठा अधिका-यांनी सांगितले.  यासोबतच ११ गावचे प्रतिनिधी आपला वाटा भरत नाहीतच उलट पुरवठा सुरु करा नाहीतर आंदोलन करू अशा धमक्या देतात अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.  

रक्कम भरताच पाणी पुरवठा पुर्ववत करू 

ही योजना 13 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. तेव्हापासून या योजनेतून शहरा बरोबरच 11 खेडयांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु,  संबंधीत ग्रामपंचायतींना वारंवार सुचना तसेच नोटीस देवून देखील ते देखभाल व दुरुस्तीसाठी साठीचे रक्कम पालिकेकडे जमा करीत नाहीत. रक्कम जमा करताच पाणी पुरवठा पुर्ववत करण्यात येईल. -सहाल चाउस, नगराध्यक्ष