शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सरकारकडे सत्ता टिकविण्यासाठी पैसा, शेतकऱ्यांसाठी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना काहीच लाभ मिळाला नाही. सरकारकडे आमदारांचे फंड देण्यासाठी पैसा आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना काहीच लाभ मिळाला नाही. सरकारकडे आमदारांचे फंड देण्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही. हे सरकार घोषणांची अतिवृष्टी करीत असल्याची टीका आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी केली. आष्टी येथील निवासस्थानी पत्रकारांशी आमदार सुरेश धस यांनी संवाद साधला.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, तूर, उडिद, कांदा पिकांमध्ये पाणी साठले असून पिके सडू लागली आहेत. शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच येणार नाही. जिल्ह्यातील ५० महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली असून ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. हा नुकसानग्रस्त भाग सरसकट नुकसान भरपाई देण्यास पात्र आहे. जिल्हाधिकारी म्हणतात पंचनामे करू. पंचनामे, ई-पीक पाहणी हे नाटक कशासाठी? ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडल्यास सरसकट नुकसान भरपाईसाठी क्षेत्र पात्र ठरते. जिल्हा प्रशासनाने नियम वाचण्याची गरज आहे. अतिवृष्टी झालेल्या भागातील नुकसानीचे पंचनामे करणारे अधिकारी नदीच्या कडेला फिरतात. आष्टी तालुक्यातील सहा मंडलात अतिवृष्टी झाली असून पाटोदा, शिरुर कासार येथे भयानक परिस्थिती आहे. आष्टी तालुक्यातील मेहकरी धरण भरले नाही. बाकी सर्व १०० टक्के भरली आहेत. ५० मंडलांमधील क्षेत्र सरसकट नुकसान भरपाई देण्यास पात्र आहे, असेही ते म्हणाले.

...

पीकविम्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला

पीकविम्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी विमा भरलेलाच नाही. पीकविम्याचे मध्ये नाटक आणू नये. सरसकट सरकारने नुकसान भरपाई द्यावी. आघाडी सरकारच्या काळात मोबाईल वाजायचा बंद झाला. शेतकऱ्यांना पीक विमा, अनुदान, मिळालेच नसून, मोदी सरकारच्या किसान सन्मान या योजनेचा २ हजार रुपये हप्ता आला तरच मोबाईल ‘टुंग’ वाजत आहे. या सरकारच्या काळात सर्व काही बंद झाले, अशी टीकाही आ. धस यांनी यावेळी केली.