शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

सरकारकडे सत्ता टिकविण्यासाठी पैसा, शेतकऱ्यांसाठी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना काहीच लाभ मिळाला नाही. सरकारकडे आमदारांचे फंड देण्यासाठी पैसा आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना काहीच लाभ मिळाला नाही. सरकारकडे आमदारांचे फंड देण्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही. हे सरकार घोषणांची अतिवृष्टी करीत असल्याची टीका आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी केली. आष्टी येथील निवासस्थानी पत्रकारांशी आमदार सुरेश धस यांनी संवाद साधला.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, तूर, उडिद, कांदा पिकांमध्ये पाणी साठले असून पिके सडू लागली आहेत. शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच येणार नाही. जिल्ह्यातील ५० महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली असून ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. हा नुकसानग्रस्त भाग सरसकट नुकसान भरपाई देण्यास पात्र आहे. जिल्हाधिकारी म्हणतात पंचनामे करू. पंचनामे, ई-पीक पाहणी हे नाटक कशासाठी? ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडल्यास सरसकट नुकसान भरपाईसाठी क्षेत्र पात्र ठरते. जिल्हा प्रशासनाने नियम वाचण्याची गरज आहे. अतिवृष्टी झालेल्या भागातील नुकसानीचे पंचनामे करणारे अधिकारी नदीच्या कडेला फिरतात. आष्टी तालुक्यातील सहा मंडलात अतिवृष्टी झाली असून पाटोदा, शिरुर कासार येथे भयानक परिस्थिती आहे. आष्टी तालुक्यातील मेहकरी धरण भरले नाही. बाकी सर्व १०० टक्के भरली आहेत. ५० मंडलांमधील क्षेत्र सरसकट नुकसान भरपाई देण्यास पात्र आहे, असेही ते म्हणाले.

...

पीकविम्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला

पीकविम्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी विमा भरलेलाच नाही. पीकविम्याचे मध्ये नाटक आणू नये. सरसकट सरकारने नुकसान भरपाई द्यावी. आघाडी सरकारच्या काळात मोबाईल वाजायचा बंद झाला. शेतकऱ्यांना पीक विमा, अनुदान, मिळालेच नसून, मोदी सरकारच्या किसान सन्मान या योजनेचा २ हजार रुपये हप्ता आला तरच मोबाईल ‘टुंग’ वाजत आहे. या सरकारच्या काळात सर्व काही बंद झाले, अशी टीकाही आ. धस यांनी यावेळी केली.