शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान! - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST

बीड : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात तीव्र राहिली. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने कडक निर्बंध लावले होते. ...

बीड : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात तीव्र राहिली. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने कडक निर्बंध लावले होते. त्यामुळे मंगल कार्यालये बंद होती, तर विवाहाच्या अनुषंगाने आवश्यक सर्व व्यवसायांना फटका बसला. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ठरलेली लग्नसोहळे पुन्हा लांबणार, असे वाटत असतानाच, काही अटींच्या आधारे लग्नांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लगीनघाई जोरात सुरू आहे. बाजारात कपडे, दागिने, गृहपयोगी साहित्य खरेदीसाठी दुकानांवर वर्दळ पाहायला मिळत आहेत. रीतिरिवाजानुसार लग्न करण्यावर भर देतानाच, आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर, कॅटरिंग, मंडप, बँड आचारी आणि मजुरांना कामे मिळू लागली आहेत. ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा असली, तरी पावसाच्या दिवसात फजिती होऊ नये, म्हणून मंगल कार्यालय, हॉटेलची बुकिंग वाढली असून, तारखा आरक्षित झाल्याने अनेक लग्न आयोजकांना शोधाशोध करावी लागत आहे.

परवानगीसाठी अग्निदिव्य

लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या ५० लोकांची नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, मंगल कार्यालय, मॅरेज हॉल हॉटेल मालकाचे नाव आदी माहिती आयोजकांना द्यावयाची आहे, तसेच त्यांची अँटिजन आणि आरटीपीसीआर तपासणी करून अहवाल वेळेत उपलब्ध करून घ्यावा लागतो. नंतर पोलीस प्रशासनाची परवानगी व ग्रामीण भागात ग्रामपंचायत व शहरी भागात नगरपंचायत, नगरपालिकेची परवानगीसाठी चकरा माराव्या लागतात. हे सोपस्कार पार पाडताना यजमानांची मात्र दमछाक होते. या परवानगी प्रक्रियेला कधी दोन तर कधी चार-पाच दिवस लागतात.

या असतील अटी

लग्नसोहळ्यासाठी प्रशासकीय अटी घालून दिल्या आहेत. उपस्थित राहणाऱ्या ५० जणांची अँटिजन आणि आरटीपीसीआर तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्याबाबतची खात्री

पोलीस विभागाने करावयाची आहे. त्यानंतर, स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यावी लागते. लग्नाच्या वेळी भेट देण्याचे व निरीक्षण करण्याचे संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांना निर्देश दिलेले आहेत. विवाह स्थळी पुरेसे सॅनिटायझर उपलब्ध करणे, मास्क घालणे बंधनकारक करण्याची जबाबदारी आयोजकांवर सोपविली आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी उपाय करणे, बैठक व्यवस्था व भोजन व्यवस्थेत सोशल डिस्टन्सचे नियोजन करणे आवश्यक केले आहे. घरी जरी लग्न आयोजित केले जाणार असेल, तरी स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी बंधनकारक आहे.

शुभमुहूर्त

जुलैमध्ये १, २, ३, १३ या तारखांना शुद्ध मुहूर्त आहे, तर २२, २५, २६, २८, २९ या तारखांना गौण विवाह मुहूर्त आहेत, याशिवाय वर-वधू पक्ष दोघे मिळून सोयीचा मुहूर्त शोधण्यात दंग आहेत.

वधू-वर पित्याची कसरत

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने नियमांचे बंधन घालून दिलेले आहे. लॉकडाऊनमध्ये विवाह सोहळा करता आला नाही. आता निर्बंध काहीसे शिथिल केले आहेत. नियमांचे पालन करून विवाह सोहळा करणार आहोत. त्यासाठी आवश्यक परवानगी घेत आहोत. लगीनघाईत हे एक काम वाढले आहे.

- संजय जगदाळे, वधुपिता, बीड.

--------

कोरोना टाळण्यासाठी प्रशासनाचे नियम योग्य आहेत, परंतु ५० जणांच्या कोरोना चाचणीचा नियम जाचक वाटतो. बाजारात व इतरत्र अनावश्यक गर्दी होते, तिकडे दुर्लक्ष केले जाते. मग पवित्र लग्न सोहळ्यासाठी बंधने कशामुळे? लग्नविधी होईपर्यंत नियम पालनाची आयोजकांना काळजी वाटते.

- दिलीप खिंवसरा, बीड.

----------------