शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जायकवाडीतून विसर्ग वाढल्याने गोदावरीस पूर; पाचांळेश्वर, शनी मंदिर पाण्याखाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 17:37 IST

दोन महिन्यात तिस-यांदा पाचांळेश्वर मंदिर पाण्याखाली आले तर राक्षसभुवनच्या शनीमंदिर दुस-या मजल्यावर पाणी

गेवराई : परतीचा पाऊस मोठ्याप्रमाणावर सुरु असल्याने पैठण येथील नाथसागर धरणात वरिल धरणातून पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे गुरुवारी रात्री 3 वाजेच्या सुमारास धरणाचे 16 दरवाजे अडीज फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात 43509 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. विसर्गामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून दोन महिन्यात तिस-यांदा पाचांळेश्वर मंदिर पाण्याखाली आले तर राक्षसभुवनच्या शनीमंदिर दुस-या मजल्यावर पाणी आले आहे.तब्बल 12 वर्षा नंतर गोदावरी नदी तब्बल तिस-यादां दुथडी भरून वाहत आहे. 

जायकवाडी धरणातून उजवा व डावा कालवा, जलविद्युत केद्रांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून पाणी सोडलेले आहे. गुरुवारी धरणाचे 10,11,12,13,14,15,16,17,20,21,22,23,24,25,26,27 असे १६  दरवाजे आवक वाढल्याने उघडण्यात आले. गोदावरी नदी पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील 32 गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. वाढलेल्या पाणी पातळीमुळे तालुक्यातील पांचाळेश्वर येथील आत्मतिर्थ दत्त  मंदिर पुर्ण पाण्याखाली गेले आहे. तसेच शनिच्या साडेतीन पिठा पैकी एक पिठ असलेल्या राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिरातील दुस-या मजल्यावर पाणी येऊन मूर्ती पाण्याखाली गेली आहे.

नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा नदी पात्रात नाथसागरातुन 43509 क्युसेक पाणी सोडल्या मुळे तालुक्यातील 32 गावातील नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असुन नागरिकांनी नदी पात्रात जावु नये,जनावरे पाण्यात सोडु नये तसेच महसुलचे पथक तौनात ठेवले आहे असे आवहान तहसिलदार धोंडिबा गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :BeedबीडfloodपूरgodavariगोदावरीJayakwadi Damजायकवाडी धरण