शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

जायकवाडीतून विसर्ग वाढल्याने गोदावरीस पूर; पाचांळेश्वर, शनी मंदिर पाण्याखाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 17:37 IST

दोन महिन्यात तिस-यांदा पाचांळेश्वर मंदिर पाण्याखाली आले तर राक्षसभुवनच्या शनीमंदिर दुस-या मजल्यावर पाणी

गेवराई : परतीचा पाऊस मोठ्याप्रमाणावर सुरु असल्याने पैठण येथील नाथसागर धरणात वरिल धरणातून पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे गुरुवारी रात्री 3 वाजेच्या सुमारास धरणाचे 16 दरवाजे अडीज फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात 43509 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. विसर्गामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून दोन महिन्यात तिस-यांदा पाचांळेश्वर मंदिर पाण्याखाली आले तर राक्षसभुवनच्या शनीमंदिर दुस-या मजल्यावर पाणी आले आहे.तब्बल 12 वर्षा नंतर गोदावरी नदी तब्बल तिस-यादां दुथडी भरून वाहत आहे. 

जायकवाडी धरणातून उजवा व डावा कालवा, जलविद्युत केद्रांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून पाणी सोडलेले आहे. गुरुवारी धरणाचे 10,11,12,13,14,15,16,17,20,21,22,23,24,25,26,27 असे १६  दरवाजे आवक वाढल्याने उघडण्यात आले. गोदावरी नदी पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील 32 गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. वाढलेल्या पाणी पातळीमुळे तालुक्यातील पांचाळेश्वर येथील आत्मतिर्थ दत्त  मंदिर पुर्ण पाण्याखाली गेले आहे. तसेच शनिच्या साडेतीन पिठा पैकी एक पिठ असलेल्या राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिरातील दुस-या मजल्यावर पाणी येऊन मूर्ती पाण्याखाली गेली आहे.

नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा नदी पात्रात नाथसागरातुन 43509 क्युसेक पाणी सोडल्या मुळे तालुक्यातील 32 गावातील नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असुन नागरिकांनी नदी पात्रात जावु नये,जनावरे पाण्यात सोडु नये तसेच महसुलचे पथक तौनात ठेवले आहे असे आवहान तहसिलदार धोंडिबा गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :BeedबीडfloodपूरgodavariगोदावरीJayakwadi Damजायकवाडी धरण