शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार हजार पशुधनाला मिळाले ‘राहत’मुळे जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:25 IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस नसल्यामुळे रबी व खरीप दोन्ही हंगामात पिकांची लागवड झाली नव्हती, त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार होता. तसेच डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे जनावरं सांभाळणे कठीण झाले होते.

ठळक मुद्देजेवणाची व्यवस्था । १३ ते १४ गावांतील शेतकऱ्यांनी घेतला राहत शिबिरात आश्रय

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस नसल्यामुळे रबी व खरीप दोन्ही हंगामात पिकांची लागवड झाली नव्हती, त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार होता. तसेच डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे जनावरं सांभाळणे कठीण झाले होते. अनेक पशुपालक शेतकºयांनी कवडीमोल भावाने आपली जनावरे बाजारात विकली. त्यानंतर शासनाच्या वतीने गोशाळेच्या माध्यमातून बीड तालुक्यातील पालवन येथे ‘राहत’ शिबीर सुरु करण्यात आले. शिबिरामुळे १३ ते १४ गावांमधील साडेचार हजार जनावरांना जीवदान मिळाले आहे.बीड शहराच्या आसपास बहूतांश गावांमधील शेती ही खडकाळ आहे. त्यामुळे पिकांपेक्षा शहर जवळ असल्यामुळे शेतकºयांमधून दुग्ध व्यवसायाला पसंती दिली जाते. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे चारा-पाण्याची टंचाई जाणवत होती. अनेक शेतकºयांना पशुधन कसे टिकवायचे, हा प्रश्न पडला होता. तसेच छावण्या सुरु करण्याचा शासनाचा निर्णय झालेला नव्हता. मात्र, पालवन परिसरातील राजेंद्र मस्के यांच्या गोशाळेच्या माध्यमातून ‘राहत’ शिबिराला मान्यता मिळाली व ते सुरु झाले. परिसरातील शेतकरी आपल्या बिºहाडासह या शिबिरावर राहायला आले. या राहत शिबिरामुळे पशुधन वाचल्याचे शेतकºयांमधून सांगण्यात आले.शेतकºयांसाठी जेवणबीड शहराच्या परिसरातील १३ ते १४ गावांमधील शेतकरी या राहत शिबिरात सहभागी झाले आहेत. अनेक जण मागील चार महिन्यापासून आपल्या कुटुंबासोबत तर काही जण जनावरांची देखरेख करण्यासाठी एक जण राहत शिबिरावर वास्तव्यास असतो. त्यांच्या जेवणाची व्यवस्था होत नसल्याचे दिसून आल्यानंतर राहत शिबिरावरच जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय राहत शिबिराचे चालक राजेंद्र मस्के यांनी घेतला आहे.लसीकरणामुळे साथीचे रोग नाहीतएकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जनावरे एकत्र आल्यानंतर साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते मात्र, त्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी लसीकरण केले जात आहे. त्यामुळे जनारवांचे स्वास्थ चांगले आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संतोष पालवे यांनी दिली.गांडूळ खत निर्मितीचा प्रयोगराहत शिबिरावर पडलेल्या शेणावर प्रक्रिया करुन गांडूळ खत निर्मिती करण्यात येत आहे. या माध्यमातून उत्पादन कसे घ्यावे याचे प्रशिक्षण देखील राहत शिबिरावर शेतकºयांना दिले जात आहे. त्यामुळे शेतकºयांना दुग्ध व्यवसायासोबतच इतर पुरक व्यवसायातून आपली प्रगती साधता येणार आहे.रोज लागतो ८५ टन चारासाडेचार हजारांपेक्षा अधिक जनावरे असलेल्या राहत शिबिरात रोज ८५ टन चारा वाटप केला जातो. तसेच इतर राज्यातून मुर घास आणला असून त्याचे देखील वाटप केले जाते. तसेच जनावरांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक शेतकºयांसाठी पाण्याची व्यवस्था त्यांच्या जवळ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रोज सकाळी व संध्याकाळी येथील शेतकरी बीड शहरात दुधाची विक्री करतात. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळत असल्याचे शेतकºयांमधून सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र