शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेच्या कचरा गाड्या ग्रामस्थांनी अडविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:30 IST

माजलगाव : येथील नगर परिषदेस केसापुरी येथे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी जागा देण्यात आली असताना तेथे कचऱ्यावर प्रक्रिया न ...

माजलगाव : येथील नगर परिषदेस केसापुरी येथे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी जागा देण्यात आली असताना तेथे कचऱ्यावर प्रक्रिया न करता तो पेटवून देण्यात येत असल्याने त्याची दुर्गंधी येत आहे. यामुळे प्रदूषणाच्या त्रासामुळे वैतागलेल्या संतप्त ग्रामस्थांनी रविवारी आंदोलन करून नगर परिषदेच्या सात कचरा गाड्या परत पाठवल्या. तसेच तेथे सुरू असलेले बांधकामही रोखले.

माजलगाव शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेस शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी येथे घनकचरा व्यवस्थापन युनिटसाठी जागा देण्यात आली होती. मात्र, तेथे जागेचा वापर झाला नाही व युनिटही सुरू केले नाही. नगर परिषदेने शहरात कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदारास काम दिले आहे. मात्र, ठेकेदार त्याच्या वाहनात ओला व सुका कचरा अशी विभागणी न करता सरसकट कचरा गोळा करून टेम्पोत टाकून नेतो व तेथे कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे प्रदूषण व दुर्गंधी होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने केसापुरी गावकऱ्यांनी यापूर्वी नगर परिषदेस निवेदने दिली होती.

परंतु कार्यवाही होत नसल्याने अखेर रविवारी सकाळी विलास साळवे यांच्या नेतृत्त्वाखाली शरद घनघाव, बाळू राठोड, ॲड. रोहित साबळे, सगीर देशमुख, जायकोबा राठोड, सचिन लाडे, धीरज सोळंके, गोपाळ दौंडे, कैलास शिंगाडे, विठ्ठल साबळे आदींसह ग्रामस्थांनी नगर परिषदेच्या ७ कचरा गाड्या अडवून त्या परत पाठवल्या. चालकांनी या गाड्या वळवून बायपास व सिंदफना नदीकाठाकडे हा कचरा नेवून टाकला. त्यामुळे शहरवासियांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे.

===Photopath===

250421\purusttam karva_img-20210425-wa0036_14.jpg