शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

विद्युत रोहित्रात वारंवार बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:35 IST

अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात वीजपुरवठा अनियमित व अचानकच कमी-जास्त दाबाने होत असल्याने रोहित्रामध्ये बिघाड होतो. परिणामी हे बिघडलेले ...

अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात वीजपुरवठा अनियमित व अचानकच कमी-जास्त दाबाने होत असल्याने रोहित्रामध्ये बिघाड होतो. परिणामी हे बिघडलेले रोहित्र आठ ते दहा दिवस बदलून मिळत नाहीत. याचा मोठा फटका सिंचनाला बसतो. पिके जोमात आलेली आहेत. त्यांना पाण्याची आवश्यकता असताना रोहित्रात होणारे बिघाड शेतकऱ्यांसाठी घातक ठरू लागले आहेत.

-----------

पेट्रोल दरवाढीमुळे वाहनचालकांना त्रास

अंबाजोगाई : पेट्रोल व डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून, पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल पेडगावकर यांनी केली आहे.

-----------

कोरोना प्रादुर्भावामुळे पालकांत चिंता

अंबाजोगाई : कोरोनाचा विषाणूंचा प्रादुर्भाव अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज दोन अंकी रुग्णसंख्या वाढत चालली आहे. नुकत्याच इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. महाविद्यालयेही दोन दिवसांपूर्वी सुरू झाली, अशा स्थितीत कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने आपल्या पाल्याला शाळेत पाठवावे की नाही, याबाबत पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने पालकांची चिंताही वाढली आहे.

--------------------

पाझर तलाव खोलीकरणाची मागणी

अंबाजोगाई : तालुक्यातील बर्दापूर, नांदगाव, सुगाव या परिसरात असणारे पाझर तलाव कोरडे पडू लागले आहेत. या तलावांच्या खोलीकरणाची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. शासनाने तलावाचे खोलीकरण व नूतनीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप आडसूळ यांनी केली आहे.

-----------

कांदा महागला

अंबाजोगाई : शहरातील येथील भाजीपाला बाजारात सध्या कांद्याचे भाव वाढले आहेत. जुना कांदा ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. बाजारात नवीन कांदा उपलब्ध होत नसल्याने जुन्या कांद्याला चांगला दर आला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून मंगळवार व शुक्रवारच्या बाजारात कांद्याच्या दरात वाढ होत आहे. कांदा उत्पादकांना दिलासा मिळत असला तरी ग्राहकांमध्ये मात्र कांदा महाग झाल्याची ओरड सुरू झाली आहे.