शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरल्यास दस्त नोंदणीसाठी चार महिन्यांची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:34 IST

बीड : मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी ...

बीड : मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून

मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल नढे यांनी केले आहे.

स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत सूट जाहीर केली आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व १२ दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता असल्याने हे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या २९ ऑगस्ट २०२० रोजीच्या शासन राजपत्रानुसार, कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्ताऐवजांवर उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची १ च्या अनुच्छेद २५ च्या खंड ( बी ) अन्वये अन्यथा आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणाऱ्या आणि ३१ डिसेंबर २०२० रोजी संपणाऱ्या कालावधीकरिता दोन टक्के तर १ जानेवारी २०२१ पासून सुरू होणाऱ्या व ३१ मार्च रोजी संपणाऱ्या कालावधीसाठी दीड टक्केने कमी केले आहे. तसेच, नगर विकास विभागाच्या ३१ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम १९६५च्या कलम १४७ ( अ ) अन्वये महानगरपालिका क्षेत्रात स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कावरील अधिभार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधी करिता अर्धा टक्के इतका कमी करण्यात आले आहे . तसेच २८ ऑगस्ट २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ अन्वये स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणारा एक टक्का अधिभार हा १ सप्टेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधी करिता शून्य टक्के तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्धा टक्के करण्यात आला आहे. शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत ३१ मार्च अखेरपर्यंत असल्याने या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये गर्दी होऊ शकते. मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून ई चलनाद्वारे मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम २३ अनुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आंत नोंदणीसाठी सादर करता येते. त्यामुळे कोविड -१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता मार्च २०२१ शेवटी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी न करता, नोंदणी कायद्यातील तरतुदीचा लाभ घेण्याचे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल नढे व मुद्रांक सह दुय्यम निबंधक संजय गोपवाड (अंबाजोगाई) यांनी केले आहे.