शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
3
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
4
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
5
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
6
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
7
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
8
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
9
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
10
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
11
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
12
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
13
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
14
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
15
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
16
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
17
IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्लास! अन्...
18
प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न
19
आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!
20
RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं

परळीत वैद्यनाथ साखर कारखान्यात रसाची टाकी फुटली; १ ठार ११ कर्मचारी भाजले; ७ जणांची प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:28 IST

परळी (जि. बीड) तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाच्या टाकीचा कॅप शुक्रवारी दुपारी गळून पडला. त्यामुळे टाकीतील गरम रस तेथील कामगार व कर्मचा-यांच्या अंगावर पडला. त्यात बारा जण भाजले. यातील एकाचा रात्री १२.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी (जि. बीड) : तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाच्या टाकीचा कॅप शुक्रवारी दुपारी गळून पडला. त्यामुळे टाकीतील गरम रस तेथील कामगार व कर्मचा-यांच्या अंगावर पडला. त्यात बारा जण भाजले. यातील एकाचा रात्री १२.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ९ जणांवर लातुरात तर दोघांवर अंबाजोगाईत उपचार सुरु आहेत.

परळी-बीड राज्य रस्त्यावर पांगरी शिवारात अठरा वर्षांपूर्वी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी या साखर कारखान्याची उभारणी केली. सध्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्षा गेल्या हंगामात हा कारखाना उसाअभावी बंद होता. यंदा काही दिवसांपूर्वीच ऊस गाळपास प्रारंभ झाला होता. शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास कारखान्यातील उसाच्या रसाने भरलेल्या टाकीचे कॅप गळून पडले. साखर प्रक्रियेसाठी हा रस दुसºया टाकीत नेण्यापूर्वीच गरम रसाची ही टाकी फुटल्याने कर्मचाºयांच्या अंगावर उकळलेला रस पडला. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. तेथील प्रत्येकजण मदतीसाठी धावून जात होते.

यात कारखान्याचे काही कर्मचारी व खाजगी कंत्राटदाराचे काही कामगार जखमी झाले. हा रस ४०० डिग्री सेल्सिअस इतका उष्ण होता, अशी माहिती आहे. मधुकर पंढरीनाथ आदनाक (५०) यांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर गौतम तुकाराम घुमरे (५०), सुभाष गोपीनाथ कराड (४५), सुमित अनंतराव भंडारे (१८) हे १०० टक्के भाजले असून सुनील भागवत भंडारे (२४) ९५ टक्के, रामभाऊ माणिक नागरगोजे (४२) ९० टक्के, लहुदास अभिमान डाके (२५) ६३ टक्के व धनाजी राजेश्वर देशमुख (४५) हे ६० टक्के भाजले आहेत. याशिवाय आणखी दोघांवर लातुरात उपचार सुरू असल्याचे डॉ. विठ्ठल लहाने यांनी सांगितले.

उर्वरित दोघे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर अंबाजोगाईत उपचार सुरु आहेत. वृत्त लिहीस्तोवर या चौघांमधील चंद्रकांत मिसाळ आणि अदिनाथ भंडारी या दोघांचीच नावे समजू शकली. या घटनेनंतर कारखान्यातील सर्व प्रक्रि या बंद ठेवण्यात आली.जखमींना वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, कार्यकारी संचालक व्ही.जी.दगडे, येवले, पानढवळे, सुरक्षा अधिकारी डी.एल.जायभाये यांच्यासह इतर कर्मचाºयांनी तातडीने परळीच्या खाजगी रुग्णालय व अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती रुग्णालयात दाखल केले. तेथून लातूर येथील डॉ. विठ्ठल लहाने यांच्या दवाखान्यात आधी आठ जणांना व नंतर रात्री आणखी दोघांंना हलविण्यात आले. या घटनेबद्दल राज्याच्या ग्रामविकास मंत्री व वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले असून शनिवारी जखमींची त्या भेट घेणार आहेत.

घटनास्थळास अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी विशाल आनंद, प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी अनुराधा गुरव, परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक के.जे.सपकाळ, जमादार नवनाथ ढाकणे, विष्णू घुले यांनी भेट देऊन पाहणी केली.

‘डीप बर्न’मुळे चिंतासुपर फेशिअल आणि डीप बर्न असे जळित रुग्णांचे वर्गीकरण केले जाते. अतिउष्ण पाण्यात १२ पैकी १० जण मोठ्या प्रमाणावर भाजले गेले. मानवी कातडीचे मुख्यत: दोन तर सूक्ष्म पातळीवर एकूण सात पडदे असतात. या गंभीर घटनेत संपूर्ण कातडी भाजली गेली आहे. त्याला फुल थिकनेस बर्न म्हणतात. परिणामी, सर्व रुग्णांची प्रकृती ही चिंताजनकच आहे.-डॉ. विठ्ठल लहाने,प्लास्टिक सर्जन, लातूर

 

उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न करा -धनंजय मुंडेजखमी कामगारांना तातडीने चांगल्यात चांगले उपचार मिळावेत आणि त्यांचे जीव वाचावेत, यासाठी प्रशासन, कारखान्याने प्रयत्न करावेत अशा सूचना विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत. घटना समजताच वर्धा दौºयावर असलेल्या धनंजय यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क केला व रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी तातडीने जखमीना मदत करण्याच्या सूचना दिल्याने जि.प.सदस्य अजय मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, गटनेते वाल्मिक कराड, सभापती सूर्यभान मुंडे व इतरांनी रूग्णालयात धाव घेतली व मदत कार्यात सहभाग घेतला. ही घटना अतिशय दुर्दैवी व गंभीर आहे. या घटनेस जबाबदार कोण? घटना कशी घडली? याची चर्चा नंतर करता येईल. आता मात्र जखमींना बरे करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या जखमींवर आवश्यकता असल्यास मोठ्या शहरातील चांगल्या रूग्णालयात उपचार करावेत, असे मुंडे म्हणाले.