शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निजामकाळातील बनावट दस्तऐवजांचा होतोय वापर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 09:36 IST

वक्फ जमीन घोटाळा : मालकी हक्काची होणार पडताळणी, पथक रवाना

- संजय तिपाले लोकमत न्यूज नेटवर्क बीड : वक्फ बोर्डच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची भूमाफियांनी अक्षरशः विल्हेवाट लावली, या प्रकरणी सात गुन्हे नोंद आहेत. खिदमतमास व मदतमास जमिनींचे बेकायदा हस्तांतरण करण्यासाठी निजामकालीन बनावट दस्तऐवजांचा वापर केल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. त्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी हैदराबादला रवाना झाले.  

जिल्ह्यात    वक्फ बोर्डच्या मालकीची २७ हजार हेक्टर जमीन आहे. भूमाफियांनी यातील काही जमिनी गिळंकृत केल्याचे उजेडात आले. या प्रकरणी आतापर्यंत आष्टी ठाणे दोन, अंभोरा, बीड शहर, शिवाजीनगर, बीड ग्रामीण व दिंद्रूड या ठाण्यांत प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. राज्यात सर्वाधिक गुन्हे बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत.  यात दोन तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या आश्रयाला असलेल्या काही बड्या मंडळींचीही नावे एफआयआरवर आहेत. तथापि, महसूल विभागाकडून  गुन्हे नोंद झालेल्या  जमिनींशी संबंधित दस्ताऐवज मिळत नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेसमोर वक्फ बोर्ड हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी वक्फ बोर्डाकडील निजामकालीन दस्तऐवज मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी बुधवारी एक पथक हैदराबादला रवाना केले आहे. 

 या पथकामार्फत बीड शहर, बीड ग्रामीण, शिवाजीनगर व  दिंद्रूड या चार ठिकाणच्या गु्न्ह्यांसंदर्भात  खरेदी-विक्री व्यवहाराचे मुंतखब (निजामकालीन दस्तऐवज) तपासण्यात येणार आहेत. हे दस्तऐवज उर्दूतील आहेत. या दस्तऐवजांआधारेच वक्फ बोर्डच्या जमिनींचे हस्तांतरण करण्यात आले. मात्र, ते दस्तऐवज बनावट आहेत की खरे, याची पडताळणी करण्यात येणार आहे.     

मुंतखब म्हणजे काय? जमीन इनाम म्हणून देताना जी सनद दिली जाते त्याला मुंतखब म्हटले हाते. त्यावर देणाऱ्याचे तसेच स्वीकारणाऱ्याचे नाव, गट क्रमांक,   तसेच गावाचे नाव आणि चतु:सीमा असते. ती सनद म्हणजेच रजिस्ट्री असल्याचे समजले जाते. निजामकाळात मुंतखब हेच रजिस्ट्री दस्तऐवज होते.

वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रांसाठी हैदराबाद येथे पथक पाठविले आहे. या संदर्भात अधिकाधिक पुरावे गोळा करून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. - हरिभाऊ खाडे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बीड