शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भगरीच्या पिठातून चार गावातील १०० ग्रामस्थांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 18:04 IST

काही अत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी बीडला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

माजलगाव (बीड) : एकादशीच्या उपवासासाठी खालेल्या भगरीच्या पिठामुळे उमरी, रोषणपुरी, कोथरळ , छत्रबोरगाव येथील अनेकांना विषबाधा झाल्याची घटना आज दुपारी घडली. शहरातील ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यात जवळपास 100 महिला, पुरुष रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पौष महिन्यातील  एकादशी असल्याने ग्रामीण भागात अनेकजण हा उपवास करतात. गुरुवारी दि. १७ उमरी, रोषणपुरी, कोथरूळ, छत्र बोरगाव येथील नागरिकांनी एकादशीच्या उपवासाच्या फराळासाठी गावातील किराणा दुकानदारांकडून भगरीचे पीठ विकत घेतले. दोन दिवसापूर्वी एका खाजगी व्यक्तीकडून येथील दुकानदारांनी हे भगरीचे पीठ खरेदी केल्याचे सांगण्यात आले. हेच पीठ गुरुवारी ग्रामस्थांना विकले. 

फरळासाठी भगरीच्या पिठाच्या भाकरी खाल्या पण दुपारनंतर उमरी गावातील चार, पाच जणांना उलटी, पोट दुखणे व जुलाबाचा त्रास सुरु झाल्याने काहीजण शहरातील खाजगी रुग्णालयात भरती झाले. त्यानंतर असा त्रास होणारांची संख्या ईतर गावातूनही वाढत गेली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात उमरी, रोषणपुरी, कोथरुळ येथील जवळपास 100 रुग्ण दाखल झाले. यात 70 महिला रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णावर उपचार करण्यात येत असून अत्यावस्थ रुग्णांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

जागा अपुरी पडत असल्याने रुग्णालयातील एका खाटावर दोन रुग्णांना झोपवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रुग्णांची संख्या वाढत गेल्याने तालुक्यातील प्राथमिक रुग्णालयातील डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन रुग्णावर उपचार केले. यात डॉ. गजानन रुद्रवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल परदेशी, डॉ. दत्तात्रय पारगावकर, डॉ. आनंद उघडे, डॉ. नागरगोजे, डॉ. प्रसाद कुलकर्णी सहभाग होता.

रुग्णांची प्रकृती स्थिर आहे काही अत्यावस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी बीडला पाठविण्यात आले आहे. तर येथे दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.- डॉ. गजानन रुद्रवार, वैद्यकीय अधिकारी.

रुग्णांवर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत, पहा व्हिडीओ : 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर