शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

चारा संपून दहा दिवस उलटले; अद्याप छावण्यांचा निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:40 IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप व रबी दोन्ही हंगामात मिळून होणारी चारा निर्मिती यावर्षी झाली नाही. तर जिल्ह्यातील चारा संपून १० दिवस उलटले आहेत.

ठळक मुद्देपशुधनाचे हाल : पावणेतीन कोटी लिटर पाणी लागते रोज, चारा निर्मिती घटणार

बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप व रबी दोन्ही हंगामात मिळून होणारी चारा निर्मिती यावर्षी झाली नाही. तर जिल्ह्यातील चारा संपून १० दिवस उलटले आहेत. जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत चारा छावणी प्रस्तावावर कुठलाही निर्णय घेतलेला नसल्याने चारा-पाण्याविना पशुधनाची परवड होत आहे.जिल्ह्यात जवळपास १२ लाख इतके पशुधन आहे. त्यासाठी रोज पाच हजार मेट्रीक टन चारा लागतो. पशुसंवर्धन विभागाने डिसेंबरमध्ये ३२ दिवस पूरेल एवढाच चारा शिल्लक असल्याचे अहवालात म्हटले होते. मात्र आज घडीला जिल्ह्यात चारा शिल्लक नसून परजिल्ह्यामधून चारा खरेदी करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी मागणी आल्यानंतर चारा छावण्या जिल्ह्यात सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र प्रत्येक तालुक्यातून छावण्यांचे मोठ्या प्रमाणात प्रस्ताव तहसील कार्यालयात आले. १५ दिवस उलटून देखील चारा छावण्यांच्या प्रस्तावावर निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. दरम्यान, बीडमध्ये ६ फेब्रुवारी रोजी आलेल्या मागण्यांचा विचार करता छावण्यांबाबत एक- दोन दिवसात सुधारित निर्णय शासनाकडून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पाण्याचा प्रश्न देखील गंभीरजिल्ह्यातील पशुधन गाय-म्हैस वर्ग, शेळी, मेंढी व इतर जवळपास १२ लाख आहे, मोठ्या जनावरांना प्रतिदिन ४०-४५ लिटर पाणी लागते तर लहान जनावरांना १५ ते १८ लिटर व शेळ््या, मेंढ्यांना ५ लिटर पाणी लागते या हिशेबाने रोज जवळपास २ कोटी ८८ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. बहुतांश गावांध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पुढील काळात पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होणार आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र