शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

चारा संपून दहा दिवस उलटले; अद्याप छावण्यांचा निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:40 IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप व रबी दोन्ही हंगामात मिळून होणारी चारा निर्मिती यावर्षी झाली नाही. तर जिल्ह्यातील चारा संपून १० दिवस उलटले आहेत.

ठळक मुद्देपशुधनाचे हाल : पावणेतीन कोटी लिटर पाणी लागते रोज, चारा निर्मिती घटणार

बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप व रबी दोन्ही हंगामात मिळून होणारी चारा निर्मिती यावर्षी झाली नाही. तर जिल्ह्यातील चारा संपून १० दिवस उलटले आहेत. जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत चारा छावणी प्रस्तावावर कुठलाही निर्णय घेतलेला नसल्याने चारा-पाण्याविना पशुधनाची परवड होत आहे.जिल्ह्यात जवळपास १२ लाख इतके पशुधन आहे. त्यासाठी रोज पाच हजार मेट्रीक टन चारा लागतो. पशुसंवर्धन विभागाने डिसेंबरमध्ये ३२ दिवस पूरेल एवढाच चारा शिल्लक असल्याचे अहवालात म्हटले होते. मात्र आज घडीला जिल्ह्यात चारा शिल्लक नसून परजिल्ह्यामधून चारा खरेदी करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी मागणी आल्यानंतर चारा छावण्या जिल्ह्यात सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र प्रत्येक तालुक्यातून छावण्यांचे मोठ्या प्रमाणात प्रस्ताव तहसील कार्यालयात आले. १५ दिवस उलटून देखील चारा छावण्यांच्या प्रस्तावावर निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. दरम्यान, बीडमध्ये ६ फेब्रुवारी रोजी आलेल्या मागण्यांचा विचार करता छावण्यांबाबत एक- दोन दिवसात सुधारित निर्णय शासनाकडून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पाण्याचा प्रश्न देखील गंभीरजिल्ह्यातील पशुधन गाय-म्हैस वर्ग, शेळी, मेंढी व इतर जवळपास १२ लाख आहे, मोठ्या जनावरांना प्रतिदिन ४०-४५ लिटर पाणी लागते तर लहान जनावरांना १५ ते १८ लिटर व शेळ््या, मेंढ्यांना ५ लिटर पाणी लागते या हिशेबाने रोज जवळपास २ कोटी ८८ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. बहुतांश गावांध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पुढील काळात पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होणार आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र