शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

उड्डाणपूल अर्धवट; टोलवसुली मात्र दणक्यात सुरू; शेतकरी अद्यापही मावेजापासून वंचित; टोलनाका फोडण्याचा माधव जाधव यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:33 IST

अंबाजोगाई : लातूर ते लोखंडी सावरगाव या राज्य महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, अंबासाखर याठिकाणी होत असलेला उड्डाणपूल ...

अंबाजोगाई : लातूर ते लोखंडी सावरगाव या राज्य महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, अंबासाखर याठिकाणी होत असलेला उड्डाणपूल अर्धवट स्थितीत आहे. या उड्डाणपुलासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना न देताच दिनांक २९ डिसेंबरपासून सेलूअंबा येथील टोलनाका सुरू करून कंपनीने वाहनचालकांकडून वसुली सुरू केली आहे.

अर्धवट उड्डाणपूल व जागोजागी सिमेंट रस्त्याला गेलेले तडे, अशी रस्त्याची अवस्था असताना कंपनीने टोलवसुली सुरू केल्यामुळे वाहनचालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

लातूर ते लोखंडी सावरगाव या राज्य महामार्गाच्या सिमेंट रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. अंबासाखर याठिकाणी ऊसाचा कारखाना असल्यामुळे याठिकाणी वाहनांची गर्दी होऊ नये, यासाठी चाळीस कोटी रुपये खर्चाचा उड्डाणपूल मंजूर करण्यात आला आहे. या उड्डाणपुलाच्या कामासाठी आजूबाजूच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. या उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, रमेश आडसकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

एक वर्षापासून या उड्डाणपुलाचे काम अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाचे काम करण्यासाठी एक किलोमीटरपर्यंत रस्ता खोदण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे थातूरमातूर बुजविण्यात आले आहेत. अर्धवट असलेला उड्डाणपूल व खराब रस्ता, अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याला गेलेल्या भेगा अशी रस्त्याची स्थिती असताना कंपनीने सेलूअंबा येथील टोल नाका सुरू करून वाहनचालकांकडून टोलची वसुली सुरू केली आहे. ही टोल वसुली त्वरित बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, यशराज कोळगिरे, ॲड. अमित गिरवलकर, सिद्धेश्वर स्वामी यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

शेतकरी मोबदल्यापासून वंचित

अंबासाखर याठिकाणी दोन किलोमीटरचा उड्डाणपूल उभारण्यासाठी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. जमिनी संपादित करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना तत्काळ मावेजा मिळणे अपेक्षित होते. परंतु, अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बरेच शेतकरी मावेजापासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना कोणीही वाली नसल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी शिवाजी साप्ते यांनी व्यक्त केली.

...तर टोलनाका फोडणार

या रस्ताच्या कामासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या असून, रस्ताचे काम संपत आले आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीच्या मावेजाची रक्कम राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने व केंद्र सरकारने दिलेली नाही. दोन दिवसात जर टोल वसुली बंद केली नाही तर टोल नाका फोडण्याचा इशारा किसान काँग्रेसचे मराठवाडा महासचिव ॲड. माधव जाधव यांनी दिला आहे.

उड्डाणपूल सोडता या रस्त्याचे काम बहुुतांशी पूर्ण झाले आहे. शासनाच्या आदेशाने सेलूअंबा येथील टोल नाका सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मावेजा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- रोहिदास गायकवाड (उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग)