शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

उड्डाणपूल अर्धवट; टोलवसुली मात्र दणक्यात सुरू; शेतकरी अद्यापही मावेजापासून वंचित; टोलनाका फोडण्याचा माधव जाधव यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:33 IST

अंबाजोगाई : लातूर ते लोखंडी सावरगाव या राज्य महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, अंबासाखर याठिकाणी होत असलेला उड्डाणपूल ...

अंबाजोगाई : लातूर ते लोखंडी सावरगाव या राज्य महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, अंबासाखर याठिकाणी होत असलेला उड्डाणपूल अर्धवट स्थितीत आहे. या उड्डाणपुलासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना न देताच दिनांक २९ डिसेंबरपासून सेलूअंबा येथील टोलनाका सुरू करून कंपनीने वाहनचालकांकडून वसुली सुरू केली आहे.

अर्धवट उड्डाणपूल व जागोजागी सिमेंट रस्त्याला गेलेले तडे, अशी रस्त्याची अवस्था असताना कंपनीने टोलवसुली सुरू केल्यामुळे वाहनचालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

लातूर ते लोखंडी सावरगाव या राज्य महामार्गाच्या सिमेंट रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. अंबासाखर याठिकाणी ऊसाचा कारखाना असल्यामुळे याठिकाणी वाहनांची गर्दी होऊ नये, यासाठी चाळीस कोटी रुपये खर्चाचा उड्डाणपूल मंजूर करण्यात आला आहे. या उड्डाणपुलाच्या कामासाठी आजूबाजूच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. या उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, रमेश आडसकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

एक वर्षापासून या उड्डाणपुलाचे काम अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाचे काम करण्यासाठी एक किलोमीटरपर्यंत रस्ता खोदण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे थातूरमातूर बुजविण्यात आले आहेत. अर्धवट असलेला उड्डाणपूल व खराब रस्ता, अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याला गेलेल्या भेगा अशी रस्त्याची स्थिती असताना कंपनीने सेलूअंबा येथील टोल नाका सुरू करून वाहनचालकांकडून टोलची वसुली सुरू केली आहे. ही टोल वसुली त्वरित बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, यशराज कोळगिरे, ॲड. अमित गिरवलकर, सिद्धेश्वर स्वामी यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

शेतकरी मोबदल्यापासून वंचित

अंबासाखर याठिकाणी दोन किलोमीटरचा उड्डाणपूल उभारण्यासाठी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. जमिनी संपादित करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना तत्काळ मावेजा मिळणे अपेक्षित होते. परंतु, अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बरेच शेतकरी मावेजापासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना कोणीही वाली नसल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी शिवाजी साप्ते यांनी व्यक्त केली.

...तर टोलनाका फोडणार

या रस्ताच्या कामासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या असून, रस्ताचे काम संपत आले आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीच्या मावेजाची रक्कम राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने व केंद्र सरकारने दिलेली नाही. दोन दिवसात जर टोल वसुली बंद केली नाही तर टोल नाका फोडण्याचा इशारा किसान काँग्रेसचे मराठवाडा महासचिव ॲड. माधव जाधव यांनी दिला आहे.

उड्डाणपूल सोडता या रस्त्याचे काम बहुुतांशी पूर्ण झाले आहे. शासनाच्या आदेशाने सेलूअंबा येथील टोल नाका सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मावेजा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- रोहिदास गायकवाड (उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग)