शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

नियमबाह्य पैसे उचलणाऱ्यांकडून पाच लाखांची तालुक्यात वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST

अनिल महाजन धारूर : पंतप्रधान किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने देशात शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू ...

अनिल महाजन

धारूर : पंतप्रधान किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने देशात शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू केली आहे. यामध्ये शेतकरी नसणाऱ्यांनीही या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत डल्ला मारल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने अशा बोगस शेतकऱ्यांकडून लाभ घेतलेला निधी वसूल करण्यात येत आहे.

यामध्ये धारुर तालुक्यातील ५४५ आयकर भरणाऱ्या नागरिकांना पीएम किसान योजनेवर पाणी सोडावे लागणार आहे, तर एकाच कुटुंबात अनेकांना लाभ मिळत असल्याने तालुक्यातीलच ३२८२ जणांना या योजनेचा यापुढे लाभ घेता येणार नाही. आजपर्यंत घेतलेला निधी परत करण्यासाठी तहसील प्रशासनाकडून नोटीस देण्यात येत आहे. पाच लाखाची वसुली आतापर्यंत झाली आहे. तसेच यापुढे पती किंवा पत्नी दोघांतून एकाच व्यक्तीस पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

देशातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांपर्यंतचा लाभ देत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सहकार्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वकांक्षी पीएम किसान योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे; परंतु या योजनेचा दुरूपयोग करत जमीन नसणाऱ्यांनी या योजनेवर डल्ला मारत लाभ पदरात पाडून घेतला आहे. तसेच आयकर भरणाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून पीएम किसान योजनेचा घेतलेला लाभ परत करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. धारूर तालुक्यातील ५४५ आयकर भरणारे नागरिक या योजनेचा लाभ घेत होते, तर एकाच कुटुंबात अनेकजण या पद्धतीने ३२८२ नागरिक या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्याने या सर्वांना तहसील प्रशासनाच्या वतीने मागील आठवडाभरापासून नोटीस पाठवण्यात येत आहे.

एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेणे अपेक्षित असताना पती आणि पत्नी यांच्यासह मुलांच्या नावेही या योजनेचा लाभ घेण्यात येत होता. त्यामुळे वरील सर्वांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्याकडून पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला लाभ वसूल केला जात आहे. महसूल प्रशासनाच्या सांगण्यानुसार यापुढे पती किंवा पत्नी दोघातून एकाच व्यक्तीस कायदेशीररीत्या पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे तर पती किंवा पत्नीच्या पश्चात दुसऱ्या व्यक्तीस वारसा पत्राने त्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्यामुळे यापुढे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीने पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा, तर कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीने या लाभावर पाणी सोडावे लागणार आहे.

आठवडाभरात पाच लाखांची वसुली

आयकर भरणाऱ्या तसेच एका कुटुंबात अनेकजण पीएम किसान योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्याने त्या सर्वांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांनी आठवडाभरात साधारण पाच लाख रुपयापर्यंत निधी परतावा केला आहे. सर्वांनी महसूल प्रशासनास सहकार्य करत शासनाची फसवणूक करून उचललेला पैसा तात्काळ जमा करावा अन्यथा पुढे होणाऱ्या कारवाईस ते स्वतः जबाबदार असतील, असे महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रकाश गोपड यांनी सांगितले.