शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य पैसे उचलणाऱ्यांकडून पाच लाखांची तालुक्यात वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST

अनिल महाजन धारूर : पंतप्रधान किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने देशात शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू ...

अनिल महाजन

धारूर : पंतप्रधान किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने देशात शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू केली आहे. यामध्ये शेतकरी नसणाऱ्यांनीही या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत डल्ला मारल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने अशा बोगस शेतकऱ्यांकडून लाभ घेतलेला निधी वसूल करण्यात येत आहे.

यामध्ये धारुर तालुक्यातील ५४५ आयकर भरणाऱ्या नागरिकांना पीएम किसान योजनेवर पाणी सोडावे लागणार आहे, तर एकाच कुटुंबात अनेकांना लाभ मिळत असल्याने तालुक्यातीलच ३२८२ जणांना या योजनेचा यापुढे लाभ घेता येणार नाही. आजपर्यंत घेतलेला निधी परत करण्यासाठी तहसील प्रशासनाकडून नोटीस देण्यात येत आहे. पाच लाखाची वसुली आतापर्यंत झाली आहे. तसेच यापुढे पती किंवा पत्नी दोघांतून एकाच व्यक्तीस पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

देशातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांपर्यंतचा लाभ देत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सहकार्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वकांक्षी पीएम किसान योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे; परंतु या योजनेचा दुरूपयोग करत जमीन नसणाऱ्यांनी या योजनेवर डल्ला मारत लाभ पदरात पाडून घेतला आहे. तसेच आयकर भरणाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून पीएम किसान योजनेचा घेतलेला लाभ परत करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. धारूर तालुक्यातील ५४५ आयकर भरणारे नागरिक या योजनेचा लाभ घेत होते, तर एकाच कुटुंबात अनेकजण या पद्धतीने ३२८२ नागरिक या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्याने या सर्वांना तहसील प्रशासनाच्या वतीने मागील आठवडाभरापासून नोटीस पाठवण्यात येत आहे.

एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेणे अपेक्षित असताना पती आणि पत्नी यांच्यासह मुलांच्या नावेही या योजनेचा लाभ घेण्यात येत होता. त्यामुळे वरील सर्वांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्याकडून पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला लाभ वसूल केला जात आहे. महसूल प्रशासनाच्या सांगण्यानुसार यापुढे पती किंवा पत्नी दोघातून एकाच व्यक्तीस कायदेशीररीत्या पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे तर पती किंवा पत्नीच्या पश्चात दुसऱ्या व्यक्तीस वारसा पत्राने त्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्यामुळे यापुढे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीने पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा, तर कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीने या लाभावर पाणी सोडावे लागणार आहे.

आठवडाभरात पाच लाखांची वसुली

आयकर भरणाऱ्या तसेच एका कुटुंबात अनेकजण पीएम किसान योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्याने त्या सर्वांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांनी आठवडाभरात साधारण पाच लाख रुपयापर्यंत निधी परतावा केला आहे. सर्वांनी महसूल प्रशासनास सहकार्य करत शासनाची फसवणूक करून उचललेला पैसा तात्काळ जमा करावा अन्यथा पुढे होणाऱ्या कारवाईस ते स्वतः जबाबदार असतील, असे महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रकाश गोपड यांनी सांगितले.