शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

पाच एकर ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 23:49 IST

तालुक्यातील खळवट लिमगाव येथील शेतकरी धनंजय माने यांच्या शेतातील पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना बुधवार रोजी दुपारी बारा वाजता घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडवणी : तालुक्यातील खळवट लिमगाव येथील शेतकरी धनंजय माने यांच्या शेतातील पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना बुधवार रोजी दुपारी बारा वाजता घडली आहे.ग्रामीण भागात महावितरणाच्या विद्युत वाहिन्या जुन्या व अक्षम बनल्या आहेत. लोंबकळणाऱ्या तारांमुळे अनेक ठिकाणी पिके जळून खाक होत आहेत. महावितरणाच्या दुर्लक्षामुळे एकाच गावातील ही दुसरी घटना घडल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.लिमगाव शिवारातून वीजतारांचे खांब काही शेतकºयांच्या जमिनीतून गेलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही ना काही घटना घडतच असते. आठ दिवसांपूर्वीच येथील तीन शेतकºयांचा तब्बल वीस एकर ऊस जाळून खाक झाला होता. ही घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारी १२ वाजता धनंजय माने यांच्या शेतातील विजेच्या खांबावरील तारेमध्ये घर्षण होऊन झालेल्या शार्टसर्कीटमुळे जाळ झाला आणि त्यांच्या उसाला आग लागली. या आगीत पाच एकर ऊस जळून खाक झाला असून, तब्बल चार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीपोटी प्रशासनाने तातडीने पंचनामा करून शेतकºयांना मदत करावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र