शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

आधी पाण्याचा, आता निधीचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

नितीन कांबळे कडा : जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, किंवा राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून ...

नितीन कांबळे

कडा : जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, किंवा राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून तयार केलेल्या ४७ शेततळ्यांचा निधी उपलब्ध झाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत . निधी खात्यावर त्वरित वर्ग झाला नाही तर कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी सांगितले.

आष्टी तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असते. शेत पिकवतांना अडचण येत असल्याने कृषी विभागाच्या माध्यमातून ८० शेतकरी यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान किंवा राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सामूहिक शेततळे तयार केले. यासाठी ३४ बाय ३४ मीटर शेततळ्यासाठी ३ लाख २९ हजार, तर २४ बाय २४ मीटरसाठी १ लाख ७५ हजार रुपये अनुदान आहे. सुरवातीला पदरमोड करून शेततळे पूर्ण करून तसा अहवालदेखील कृषी विभागाला दिला आहे, पण दहा महिने होऊनही खात्यावर पैसे वर्ग झाले नसल्याने शेतकरी उसनवारीमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ८० पैकी ३३ शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत, तर ४७ शेतकरी आजही वंचित आहेत. गतवर्षी मार्चपासून लाॅकडाऊनमुळे तेव्हापासून आजपर्यंत १ कोटी २५ लाख रुपये निधी रखडला असून, तो हा निधी त्वरित लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा नसता उपोषणाला बसण्याचा इशारा जगताप यांनी दिला आहे.

● वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे संबंधित लाभधारक शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठवले आहेत. वेळोवेळी होणाऱ्या बैठकीत हा विषय चर्चेला असतो. आमचा पाठपुरावा सुरू असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी लोकमतला सांगितले.