शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

आधी पाण्याचा, आता निधीचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

नितीन कांबळे कडा : जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, किंवा राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून ...

नितीन कांबळे

कडा : जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, किंवा राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून तयार केलेल्या ४७ शेततळ्यांचा निधी उपलब्ध झाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत . निधी खात्यावर त्वरित वर्ग झाला नाही तर कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी सांगितले.

आष्टी तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असते. शेत पिकवतांना अडचण येत असल्याने कृषी विभागाच्या माध्यमातून ८० शेतकरी यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान किंवा राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सामूहिक शेततळे तयार केले. यासाठी ३४ बाय ३४ मीटर शेततळ्यासाठी ३ लाख २९ हजार, तर २४ बाय २४ मीटरसाठी १ लाख ७५ हजार रुपये अनुदान आहे. सुरवातीला पदरमोड करून शेततळे पूर्ण करून तसा अहवालदेखील कृषी विभागाला दिला आहे, पण दहा महिने होऊनही खात्यावर पैसे वर्ग झाले नसल्याने शेतकरी उसनवारीमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ८० पैकी ३३ शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत, तर ४७ शेतकरी आजही वंचित आहेत. गतवर्षी मार्चपासून लाॅकडाऊनमुळे तेव्हापासून आजपर्यंत १ कोटी २५ लाख रुपये निधी रखडला असून, तो हा निधी त्वरित लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा नसता उपोषणाला बसण्याचा इशारा जगताप यांनी दिला आहे.

● वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे संबंधित लाभधारक शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठवले आहेत. वेळोवेळी होणाऱ्या बैठकीत हा विषय चर्चेला असतो. आमचा पाठपुरावा सुरू असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी लोकमतला सांगितले.