शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

आधी पाण्याचा, आता निधीचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

नितीन कांबळे कडा : जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, किंवा राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून ...

नितीन कांबळे

कडा : जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, किंवा राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून तयार केलेल्या ४७ शेततळ्यांचा निधी उपलब्ध झाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत . निधी खात्यावर त्वरित वर्ग झाला नाही तर कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी सांगितले.

आष्टी तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असते. शेत पिकवतांना अडचण येत असल्याने कृषी विभागाच्या माध्यमातून ८० शेतकरी यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान किंवा राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सामूहिक शेततळे तयार केले. यासाठी ३४ बाय ३४ मीटर शेततळ्यासाठी ३ लाख २९ हजार, तर २४ बाय २४ मीटरसाठी १ लाख ७५ हजार रुपये अनुदान आहे. सुरवातीला पदरमोड करून शेततळे पूर्ण करून तसा अहवालदेखील कृषी विभागाला दिला आहे, पण दहा महिने होऊनही खात्यावर पैसे वर्ग झाले नसल्याने शेतकरी उसनवारीमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ८० पैकी ३३ शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत, तर ४७ शेतकरी आजही वंचित आहेत. गतवर्षी मार्चपासून लाॅकडाऊनमुळे तेव्हापासून आजपर्यंत १ कोटी २५ लाख रुपये निधी रखडला असून, तो हा निधी त्वरित लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा नसता उपोषणाला बसण्याचा इशारा जगताप यांनी दिला आहे.

● वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे संबंधित लाभधारक शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठवले आहेत. वेळोवेळी होणाऱ्या बैठकीत हा विषय चर्चेला असतो. आमचा पाठपुरावा सुरू असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी लोकमतला सांगितले.