शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

सिंदफना प्रकल्पातून पहिले आवर्तन, रबीला ठरणार आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST

शिरूर कासार : सिंदफना मध्यम प्रकल्पातून शेतीसाठी पाण्याचे पहिले आवर्तन शनिवारी सोडण्यात आले. मात्र, कालव्याच्या अर्धवट दुरुस्तीमुळे काही ...

शिरूर कासार : सिंदफना मध्यम प्रकल्पातून शेतीसाठी पाण्याचे पहिले आवर्तन शनिवारी सोडण्यात आले. मात्र, कालव्याच्या अर्धवट दुरुस्तीमुळे काही शेतकरी पाटाच्या पाण्यापासून वंचित राहणार असल्याचे दिसत आहे.

यावर्षी सिंदफना मध्यम प्रकल्प ओसंडून वाहिला. शेतीसाठी पूर्ण हंगाम पाणी मिळेल अशी खात्री वाटत होती. मात्र, कालव्याच्या दुरुस्तीस विलंब झाला आणि आता पहिले आवर्तन सोडण्यात आले. यावेळी शाखा अभियंता अविनाश मिसाळ,पाखरे ,सरपंच सुदाम काकडे, हनुमान केदारसह तुपे नवनाथ यवले,बापुराव साळवे, लक्ष्मण काकडे ,सुरेश पवार आदी शेतकरी उपस्थित होते.

१५ ऑक्टोबर ते २८ फेब्रुवारी हा कालावधी रबी हंगामाचा मानला जातो. याकाळात किमान चार ते पाचवेळा पाणी सोडले जाते. यावर्षी मात्र पहिले आवर्तन सोडण्यास ९ जानेवारी उजाडले. आता असातसा दीड महिना उरला आहे. तांत्रिक अडचणी आणि मनुष्यबळाचा अभाव सांगितला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे. दुरुस्तीचे काम बीड -पाथर्डी रोडपर्यंतच झाल्याने काही शेतकरी पाटपाण्यापासून वंचित राहणार असल्याचे दिसत आहे.

दुरुस्तीस विलंब झाला. त्यासाठी मशिनरी उपलब्ध झाली नाही. तरीदेखील शेतीला पाणी सोडण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळावर काम केले व पाणी सोडले आहे. शेतकऱ्यांनी पाणी वाया घालू नये तसेच पाणीअर्ज व पाणीपट्टीची बाकी भरावी, असे आवाहन शाखा अभियंता अविनाश मिसाळ व पाखरे यांनी केले आहे.