शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पंधरा वर्षे झाली तरी बंधारा कामांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:21 IST

कडा : शिवकालीन पाणीपुरवठा योजनेतून २००६-०७ मध्ये कडी नदीवर घाटापिंपरी येथे १० लाख रुपये खर्च करून दोन केटीवेअर ...

कडा : शिवकालीन पाणीपुरवठा योजनेतून २००६-०७ मध्ये कडी नदीवर घाटापिंपरी येथे १० लाख रुपये खर्च करून दोन केटीवेअर बंधारे बांधण्यात आले होते; पण पिंचिंग पक्के न केल्याने पहिल्याच पावसात हे बंधारे फुटले. याला १५ वर्षे झाली तरी साधी दुरुस्ती किंवा नवीन काम केले नसल्याने शेतकऱ्यांना फायदा तर झालाच नाही; पण जमीन वाहून गेल्याने तोटा सहन करावा लागला आहे. अधिकाऱ्यांनी आता तरी बंधारा दुरुस्ती करावी; जेणेकरून भविष्यात पाणी आले तर फायदा होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश कांबळे यांनी केली आहे.

आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथील कडी नदीवर २००६-०७ साली ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग आष्टी अंतर्गत शिवकालीन पाणीपुरवठा योजनेतून प्रत्येकी पाच लाखांचे दोन के.टी. वेअर बंधारे बांधण्यात आले होते. बंधारे बांधले आणि पहिल्याच पावसात आलेल्या पुराने पिंचिंग तुटून गेल्याने पाण्याची साठवणूक होण्याऐवजी शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा बंधारा फुटून एक-दोन नव्हे तर तब्बल १५ वर्षे झाली तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणीदेखील करण्यात आली नाही किंवा दुरुस्तीसुद्धा करण्यात आली नाही. पाणी साठवून शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होण्याऐवजी १० लाख रुपये झालेला खर्च पाण्यात गेला आहे. आता पावसाळ्यात थोडेफार पाणी साचेल यासाठी किमान डागडुजी तरी करावी, अशी मागणी कांबळे यांनी केली.

-------

या बंधारा कामाचे दगडी पिंचिंग फुटल्याने माझ्या शेतातील माती वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासन दरबारी तक्रारी, उपोषण करून आणि शेवटी वैतागून आत्मदहनाचा इशारा देऊनही कसलाच मावेजा मिळाला नसल्याचे शेतकरी काकासाहेब तळेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

-------

याबाबत आष्टी येथील पाणीपुरवठा उपअभियंता बी. टी. खेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, या योजनेचा निधी उपलब्ध नाही. दुसऱ्या योजनेतून निधी उपलब्ध झाला तर दुरुस्ती करू, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

----------

210721\20210721_125604_14.jpg