शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा वर्षे झाली तरी बंधारा कामांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:21 IST

कडा : शिवकालीन पाणीपुरवठा योजनेतून २००६-०७ मध्ये कडी नदीवर घाटापिंपरी येथे १० लाख रुपये खर्च करून दोन केटीवेअर ...

कडा : शिवकालीन पाणीपुरवठा योजनेतून २००६-०७ मध्ये कडी नदीवर घाटापिंपरी येथे १० लाख रुपये खर्च करून दोन केटीवेअर बंधारे बांधण्यात आले होते; पण पिंचिंग पक्के न केल्याने पहिल्याच पावसात हे बंधारे फुटले. याला १५ वर्षे झाली तरी साधी दुरुस्ती किंवा नवीन काम केले नसल्याने शेतकऱ्यांना फायदा तर झालाच नाही; पण जमीन वाहून गेल्याने तोटा सहन करावा लागला आहे. अधिकाऱ्यांनी आता तरी बंधारा दुरुस्ती करावी; जेणेकरून भविष्यात पाणी आले तर फायदा होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश कांबळे यांनी केली आहे.

आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथील कडी नदीवर २००६-०७ साली ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग आष्टी अंतर्गत शिवकालीन पाणीपुरवठा योजनेतून प्रत्येकी पाच लाखांचे दोन के.टी. वेअर बंधारे बांधण्यात आले होते. बंधारे बांधले आणि पहिल्याच पावसात आलेल्या पुराने पिंचिंग तुटून गेल्याने पाण्याची साठवणूक होण्याऐवजी शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा बंधारा फुटून एक-दोन नव्हे तर तब्बल १५ वर्षे झाली तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणीदेखील करण्यात आली नाही किंवा दुरुस्तीसुद्धा करण्यात आली नाही. पाणी साठवून शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होण्याऐवजी १० लाख रुपये झालेला खर्च पाण्यात गेला आहे. आता पावसाळ्यात थोडेफार पाणी साचेल यासाठी किमान डागडुजी तरी करावी, अशी मागणी कांबळे यांनी केली.

-------

या बंधारा कामाचे दगडी पिंचिंग फुटल्याने माझ्या शेतातील माती वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासन दरबारी तक्रारी, उपोषण करून आणि शेवटी वैतागून आत्मदहनाचा इशारा देऊनही कसलाच मावेजा मिळाला नसल्याचे शेतकरी काकासाहेब तळेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

-------

याबाबत आष्टी येथील पाणीपुरवठा उपअभियंता बी. टी. खेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, या योजनेचा निधी उपलब्ध नाही. दुसऱ्या योजनेतून निधी उपलब्ध झाला तर दुरुस्ती करू, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

----------

210721\20210721_125604_14.jpg