शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या दराची पावती देत खतविक्रेत्यांची वरकमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:30 IST

माजलगाव : १ एप्रिलला रासायनिक खतांच्या कंपन्यांनी अचानक मोठ्या प्रमाणात दरवाढ केली होती. ही वाढ केंद्र सरकारने ...

माजलगाव : १ एप्रिलला रासायनिक खतांच्या कंपन्यांनी अचानक मोठ्या प्रमाणात दरवाढ केली होती. ही वाढ केंद्र सरकारने काही काळासाठी थांबवली आहे. ही भाववाढ नक्कीच होणार असल्याने येथील व्यापाऱ्यांनी खतविक्री थांबवली आहे. अडलेल्या शेतकऱ्यांकडून जादा पैसे घेत जुन्या भावात पावत्या देण्याचा गोरखधंदा सुरू केला असताना मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत.

मागील दहा वर्षांपासून खत बनवणाऱ्या कंपन्यांची मनमानी सुरू असून, या कंपन्यांनी दहा वर्षात क्विंटल मागे ७०० ते ८०० रुपयांची भाववाढ केली. या भाववाढीच्या विरोधात शेतकरी संघटनेने आवाज न उठवल्याने या कंपन्यांचे फावले. आपण भाववाढ केली तरी कोणी काही बोलत नसल्याने या कंपन्यांनी १ एप्रिल रोजी अचानक खतांची भाववाढ केली. ही भाववाढ थोडीथोडकी नसून क्विंटलमागे तब्बल एक ते दीड हजार रुपयांची झाली आहे. ही भाववाढ केंद्र सरकारने तात्पुरती थांबली आहे. मात्र पुढील काळात ही भाववाढ नक्कीच कायम राहील, असा अंदाज बांधत येथील खतविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे असणारे खताचे साठे विक्री करणे थांबवले आहे. एखाद्या शेतकऱ्याला खताची खूपच आवश्यकता असल्यास त्यास चढ्या भावाने खत दिले जात असल्याचे शेतकरीवर्गातून सांगितले जात आहे. असे असताना येथील कृषी अधिकाऱ्याकडून मात्र कानावर हात ठेवले जात आहेत.

व्यापाऱ्यांचे गुदाम तपासा

केंद्र व राज्य सरकारशी संगनमत करून खत बनवणाऱ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर खतांची भाववाढ केली असून, याविरोधात आम्ही आंदोलन पुकारणार आहोत. सध्या येथील व्यापाऱ्यांकडून चढ्या भावाने खताची विक्री होत असताना संबंधित खात्याचे अधिकारी मात्र गप्प आहेत. त्यांनी दोन दिवसात संबंधित व्यापाऱ्यांचे गुदाम तपासावेत नसता या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल.

--- ॲड. नारायण गोले, पदाधिकारी, शेतकरी कामगार पक्ष, माजलगाव

खतांची अद्याप भाववाढ झालेली नाही. त्यामुळे व्यापारी चढ्या भावाने खतविक्री करू शकत नाहीत. असे कोणी करत असेल तर कृषी कार्यालयाकडे तक्रार करावी. यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जाईल.

---सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव