शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जुन्या दराची पावती देत खतविक्रेत्यांची वरकमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:30 IST

माजलगाव : १ एप्रिलला रासायनिक खतांच्या कंपन्यांनी अचानक मोठ्या प्रमाणात दरवाढ केली होती. ही वाढ केंद्र सरकारने ...

माजलगाव : १ एप्रिलला रासायनिक खतांच्या कंपन्यांनी अचानक मोठ्या प्रमाणात दरवाढ केली होती. ही वाढ केंद्र सरकारने काही काळासाठी थांबवली आहे. ही भाववाढ नक्कीच होणार असल्याने येथील व्यापाऱ्यांनी खतविक्री थांबवली आहे. अडलेल्या शेतकऱ्यांकडून जादा पैसे घेत जुन्या भावात पावत्या देण्याचा गोरखधंदा सुरू केला असताना मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत.

मागील दहा वर्षांपासून खत बनवणाऱ्या कंपन्यांची मनमानी सुरू असून, या कंपन्यांनी दहा वर्षात क्विंटल मागे ७०० ते ८०० रुपयांची भाववाढ केली. या भाववाढीच्या विरोधात शेतकरी संघटनेने आवाज न उठवल्याने या कंपन्यांचे फावले. आपण भाववाढ केली तरी कोणी काही बोलत नसल्याने या कंपन्यांनी १ एप्रिल रोजी अचानक खतांची भाववाढ केली. ही भाववाढ थोडीथोडकी नसून क्विंटलमागे तब्बल एक ते दीड हजार रुपयांची झाली आहे. ही भाववाढ केंद्र सरकारने तात्पुरती थांबली आहे. मात्र पुढील काळात ही भाववाढ नक्कीच कायम राहील, असा अंदाज बांधत येथील खतविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे असणारे खताचे साठे विक्री करणे थांबवले आहे. एखाद्या शेतकऱ्याला खताची खूपच आवश्यकता असल्यास त्यास चढ्या भावाने खत दिले जात असल्याचे शेतकरीवर्गातून सांगितले जात आहे. असे असताना येथील कृषी अधिकाऱ्याकडून मात्र कानावर हात ठेवले जात आहेत.

व्यापाऱ्यांचे गुदाम तपासा

केंद्र व राज्य सरकारशी संगनमत करून खत बनवणाऱ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर खतांची भाववाढ केली असून, याविरोधात आम्ही आंदोलन पुकारणार आहोत. सध्या येथील व्यापाऱ्यांकडून चढ्या भावाने खताची विक्री होत असताना संबंधित खात्याचे अधिकारी मात्र गप्प आहेत. त्यांनी दोन दिवसात संबंधित व्यापाऱ्यांचे गुदाम तपासावेत नसता या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल.

--- ॲड. नारायण गोले, पदाधिकारी, शेतकरी कामगार पक्ष, माजलगाव

खतांची अद्याप भाववाढ झालेली नाही. त्यामुळे व्यापारी चढ्या भावाने खतविक्री करू शकत नाहीत. असे कोणी करत असेल तर कृषी कार्यालयाकडे तक्रार करावी. यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जाईल.

---सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव