शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

जुन्या दराची पावती देत खतविक्रेत्यांची वरकमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:30 IST

माजलगाव : १ एप्रिलला रासायनिक खतांच्या कंपन्यांनी अचानक मोठ्या प्रमाणात दरवाढ केली होती. ही वाढ केंद्र सरकारने ...

माजलगाव : १ एप्रिलला रासायनिक खतांच्या कंपन्यांनी अचानक मोठ्या प्रमाणात दरवाढ केली होती. ही वाढ केंद्र सरकारने काही काळासाठी थांबवली आहे. ही भाववाढ नक्कीच होणार असल्याने येथील व्यापाऱ्यांनी खतविक्री थांबवली आहे. अडलेल्या शेतकऱ्यांकडून जादा पैसे घेत जुन्या भावात पावत्या देण्याचा गोरखधंदा सुरू केला असताना मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत.

मागील दहा वर्षांपासून खत बनवणाऱ्या कंपन्यांची मनमानी सुरू असून, या कंपन्यांनी दहा वर्षात क्विंटल मागे ७०० ते ८०० रुपयांची भाववाढ केली. या भाववाढीच्या विरोधात शेतकरी संघटनेने आवाज न उठवल्याने या कंपन्यांचे फावले. आपण भाववाढ केली तरी कोणी काही बोलत नसल्याने या कंपन्यांनी १ एप्रिल रोजी अचानक खतांची भाववाढ केली. ही भाववाढ थोडीथोडकी नसून क्विंटलमागे तब्बल एक ते दीड हजार रुपयांची झाली आहे. ही भाववाढ केंद्र सरकारने तात्पुरती थांबली आहे. मात्र पुढील काळात ही भाववाढ नक्कीच कायम राहील, असा अंदाज बांधत येथील खतविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे असणारे खताचे साठे विक्री करणे थांबवले आहे. एखाद्या शेतकऱ्याला खताची खूपच आवश्यकता असल्यास त्यास चढ्या भावाने खत दिले जात असल्याचे शेतकरीवर्गातून सांगितले जात आहे. असे असताना येथील कृषी अधिकाऱ्याकडून मात्र कानावर हात ठेवले जात आहेत.

व्यापाऱ्यांचे गुदाम तपासा

केंद्र व राज्य सरकारशी संगनमत करून खत बनवणाऱ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर खतांची भाववाढ केली असून, याविरोधात आम्ही आंदोलन पुकारणार आहोत. सध्या येथील व्यापाऱ्यांकडून चढ्या भावाने खताची विक्री होत असताना संबंधित खात्याचे अधिकारी मात्र गप्प आहेत. त्यांनी दोन दिवसात संबंधित व्यापाऱ्यांचे गुदाम तपासावेत नसता या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल.

--- ॲड. नारायण गोले, पदाधिकारी, शेतकरी कामगार पक्ष, माजलगाव

खतांची अद्याप भाववाढ झालेली नाही. त्यामुळे व्यापारी चढ्या भावाने खतविक्री करू शकत नाहीत. असे कोणी करत असेल तर कृषी कार्यालयाकडे तक्रार करावी. यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जाईल.

---सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव