शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

पुराच्या भीतीने राजापूरकरांची आठवड्यापासून झोप उडाली - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:41 IST

राजेश राजगुरू तलवाडा : गोदाकाठच्या गावातील लोकांच्या डोक्यावर पुराची टांगती तलवार लटकत असते. गोदावरी नदीला येणाऱ्या या पुरामुळे पावसाळा ...

राजेश राजगुरू

तलवाडा : गोदाकाठच्या गावातील लोकांच्या डोक्यावर पुराची टांगती तलवार लटकत असते. गोदावरी नदीला येणाऱ्या या पुरामुळे पावसाळा संपेपर्यंत लोकांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागते.

याच भीतीने तालुक्यातील राजापूर येथील ग्रामस्थ झोपलेच नाहीत. या परिसरात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. राजापूरच्या उत्तर बाजूने गोदावरी नदी वाहते, तर उर्वरित सर्व बाजूंनी नदीनाल्यांनी गावाला घेरलेले आहे. गोदावरीला पूर असो किंवा नसो, पण थोडा जरी पाऊस पडला की या ओढ्यानाल्यांना पूर येऊन गावाचा संपर्क तुटतो.

गावातून बाहेर पडण्यासाठी असणाऱ्या एकमेव मार्गावर एक नदी व एक नाला आडवा येतो. यातील नाल्यावरील पुलावरून पूर्ण पावसाळाभर पाणी वाहत असल्यासारखेच असते. त्यात थोडा जास्त पाऊस झाला की या नाल्यावरील पुलावरून पाण्याचा प्रचंड वेगाने प्रवाह वाहत असतो. त्यामुळे पावसाळ्यात गोदाकाठावरील राजापूर या गावांतील लोकांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागते.

सध्या गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. दररोज मुसळधार पाऊस पडत असल्याने आठ दिवसांपासून या गावाचा संपर्क तुटल्यातच जमा आहे.

त्यामुळे रात्रीच्या वेळी अचानक पाणीपातळी वाढून पूर येतो की काय या शंकेने या गावातील पुरुष, महिला, मुलांबाळासह रात्र जागून काढत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या गावातील लोक झोपलेच नाहीत.

गावातून बाहेर निघण्यास रस्ता नाही. त्यात पाऊस चालू असतो आणि अचानक पाणीपातळी वाढली तर काय करायचे? या विचाराच्या तंद्रीत गावातील सर्वच लोकांची आठ दिवसांपासून झोप उडाली आहे.

कायम पुनर्वसन करण्याची मागणी

राजापूर हे गाव थोडा पाऊस आला तरी चोहोबाजूंनी पाण्याने घेरले जात असते. ही स्थिती प्रत्येक पावसाळ्यात असते. त्यामुळे गावाचे पुनर्वसन करावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

अर्धा तास पाऊस झाला तरी तुटतो संपर्क

तलवाडा मंडळात ४ ते ८ सप्टेंबरदरम्यान या मंडळातील नागरिकांना दोन वेळा अतिवृष्टीला सामोरे जावे लागले. अर्धा तास पाऊस झाला तरी राजापूरचा संपर्क तुटतो. पुरानंतर आता साथरोग पसरू लागले असून, आरोग्य यंत्रणेने दक्ष राहण्याची गरज आहे. तर गंभीर रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी खचलेल्या पुलामुळे अडचणी निर्माण झाल्याने तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे.

090921\09bed_8_09092021_14.jpeg

राजापूर येथील संपर्क तुटला असून पुराची भीती कायम आहे.