शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

पुराच्या भीतीने राजापूरकरांची आठवड्यापासून झोप उडाली - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:41 IST

राजेश राजगुरू तलवाडा : गोदाकाठच्या गावातील लोकांच्या डोक्यावर पुराची टांगती तलवार लटकत असते. गोदावरी नदीला येणाऱ्या या पुरामुळे पावसाळा ...

राजेश राजगुरू

तलवाडा : गोदाकाठच्या गावातील लोकांच्या डोक्यावर पुराची टांगती तलवार लटकत असते. गोदावरी नदीला येणाऱ्या या पुरामुळे पावसाळा संपेपर्यंत लोकांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागते.

याच भीतीने तालुक्यातील राजापूर येथील ग्रामस्थ झोपलेच नाहीत. या परिसरात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. राजापूरच्या उत्तर बाजूने गोदावरी नदी वाहते, तर उर्वरित सर्व बाजूंनी नदीनाल्यांनी गावाला घेरलेले आहे. गोदावरीला पूर असो किंवा नसो, पण थोडा जरी पाऊस पडला की या ओढ्यानाल्यांना पूर येऊन गावाचा संपर्क तुटतो.

गावातून बाहेर पडण्यासाठी असणाऱ्या एकमेव मार्गावर एक नदी व एक नाला आडवा येतो. यातील नाल्यावरील पुलावरून पूर्ण पावसाळाभर पाणी वाहत असल्यासारखेच असते. त्यात थोडा जास्त पाऊस झाला की या नाल्यावरील पुलावरून पाण्याचा प्रचंड वेगाने प्रवाह वाहत असतो. त्यामुळे पावसाळ्यात गोदाकाठावरील राजापूर या गावांतील लोकांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागते.

सध्या गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. दररोज मुसळधार पाऊस पडत असल्याने आठ दिवसांपासून या गावाचा संपर्क तुटल्यातच जमा आहे.

त्यामुळे रात्रीच्या वेळी अचानक पाणीपातळी वाढून पूर येतो की काय या शंकेने या गावातील पुरुष, महिला, मुलांबाळासह रात्र जागून काढत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या गावातील लोक झोपलेच नाहीत.

गावातून बाहेर निघण्यास रस्ता नाही. त्यात पाऊस चालू असतो आणि अचानक पाणीपातळी वाढली तर काय करायचे? या विचाराच्या तंद्रीत गावातील सर्वच लोकांची आठ दिवसांपासून झोप उडाली आहे.

कायम पुनर्वसन करण्याची मागणी

राजापूर हे गाव थोडा पाऊस आला तरी चोहोबाजूंनी पाण्याने घेरले जात असते. ही स्थिती प्रत्येक पावसाळ्यात असते. त्यामुळे गावाचे पुनर्वसन करावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

अर्धा तास पाऊस झाला तरी तुटतो संपर्क

तलवाडा मंडळात ४ ते ८ सप्टेंबरदरम्यान या मंडळातील नागरिकांना दोन वेळा अतिवृष्टीला सामोरे जावे लागले. अर्धा तास पाऊस झाला तरी राजापूरचा संपर्क तुटतो. पुरानंतर आता साथरोग पसरू लागले असून, आरोग्य यंत्रणेने दक्ष राहण्याची गरज आहे. तर गंभीर रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी खचलेल्या पुलामुळे अडचणी निर्माण झाल्याने तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे.

090921\09bed_8_09092021_14.jpeg

राजापूर येथील संपर्क तुटला असून पुराची भीती कायम आहे.