शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

चौकशीच्या भीतीने कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:31 IST

परळी व अंबाजोगाई तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. जलयुक्तची कामे न करता बिले उचलल्यानंतर बिंग फुटू नये म्हणून ती अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा धडाका कंत्राटदारांनी लावला आहे. मात्र, परळी तालुक्यातील डाबी, वानटाकळी या गावातील नागरिकांनी या कामातील भ्रष्टाचार व शेतामध्ये पिके उभी असल्यामुळे जलयुक्तच्या सध्या होणाऱ्या कामांना विरोध सुरू केला आहे.

ठळक मुद्दे‘जलयुक्त’च्या कामांना डाबी, वानगावकरांचा विरोध : कामे न करताच उचलली बिले; ५७६ कामांची होणार चौकशी

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परळी व अंबाजोगाई तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. जलयुक्तची कामे न करता बिले उचलल्यानंतर बिंग फुटू नये म्हणून ती अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा धडाका कंत्राटदारांनी लावला आहे. मात्र, परळी तालुक्यातील डाबी, वानटाकळी या गावातील नागरिकांनी या कामातील भ्रष्टाचार व शेतामध्ये पिके उभी असल्यामुळे जलयुक्तच्या सध्या होणाऱ्या कामांना विरोध सुरू केला आहे.अंबाजोगाई व परळी तालुक्यात जलयुक्तची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा ठपका यापूर्वीच चौकशी समितीने ठेवलेला आहे. मात्र, कामे न करता ज्या कंत्राटदारांनी बिले उचलेली आहेत, त्यांचे मात्र चौकशी पथक येणार असल्याने धाबे दणाणले आहे. दक्षता पथकानेही तपासणी करून या कामांमध्ये अनियमितता असल्याचा अहवाल सादर केला होता.जलयुक्त शिवार योजनेतील सर्वच कामांची चौकशी होणार असल्याने तसेच विधिमंडळ अंदाज समिती ३० आॅगस्ट रोजी जिल्ह्यात येणार असल्यामुळे गैरकारभारावर पांघरूण घालण्यासाठी कंत्राटदारांकडून हा प्रकार होत असल्याची माहिती पुढे आली आहे. आधी बिले उचलली परंतु, न केलेली कामे करण्याचा घाट आता कंत्राटदार व अधिकाºयांनी घातला आहे.या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे गावकºयांना माहिती आहे व शेतात पिके उभी असल्यामुळे कामे करताना नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कामे करण्यास विरोध दर्शवित लेखी स्वरुपाची तक्रार कृषी विभागाकडे केल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक एम. एल. चपळे यांनी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. न झालेली कामे कोणाच्या सांगण्यावरून सुरू करण्यात येत आहेत, याचीही चौकशी होणार असल्याचे समजते.जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचारप्रकरणी कृषी विभागातील २४ अधिकाºयांना निलंबित करण्यात आले होते. तसेच बोगस कामे करणाºया १३८ पेक्षा अधिक मजूर संस्थांसह व कंत्राटदारांवर गुन्हे नोंद झाले होते.सुप्रीम कोर्टाचाही दिलासा नाहीजलयुक्त शिवार भ्रष्टाचारप्रकरणी २४ अधिकारी निलंबित करण्यात आले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने तसेच उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काही अधिकाºयांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.२१ आॅगस्ट रोजी २४ पैकी ६ अधिकाºयांना उच्च न्यायालयाने १ आठवड्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.पोलिसांकडून अभयभ्रष्ट अधिकाºयांना पाठिशी घालण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे. पोलीस अधीक्षकांना भेटून भ्रष्ट अधिकारी, कंत्राटदारांना अटक करण्यासाठी निवेदन दिले आहे. तरी देखील कुठलीही कारवाई झालेली नाही.हा उच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे या प्रकरणात तक्रार करणारे महाराष्ट्र ओबीसी कॉग्रेस सेलचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवार