शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

मान्यता रद्द केलेल्या ३५ दिव्यांग शाळांचे ९ सप्टेंबरला ठरणार भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST

बीड : भौतिक सुविधांचा अभाव, विद्यार्थीसंख्येतील तफावत व नोकर भरतीतील अनियमिततेच्या कारणावरून राज्यातील ३५ दिव्यांग शाळांची मान्यता रद्द करण्यात ...

बीड : भौतिक सुविधांचा अभाव, विद्यार्थीसंख्येतील तफावत व नोकर भरतीतील अनियमिततेच्या कारणावरून राज्यातील ३५ दिव्यांग शाळांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. संस्थाचालकांनी याविरुद्ध केलेल्या अपिलावर ९ सप्टेंबर रोजी मंत्रालयात फैसला होणार आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार असून यात शाळांचे भवितव्य ठरणार आहे.

दिव्यांग शाळांना समाजकल्याण विभागाकडून लाखोंचे अनुदान मिळते. दिव्यांगांऐवजी संस्थाचालकांचेच यातून कल्याण होऊ लागल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे दीड वर्षांपूर्वी राज्यभरातील दिव्यांग शाळांची तपासणी केली होती. यात त्रुटी आढळलेल्या ३५ शाळांची मान्यता रद्द करण्यात आली होती. दरम्यान, या कारवाईविरुद्ध संस्थाचालकांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अवर सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यानुसार ९ सप्टेंबर रोजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता ३५ शाळांची सुनावणी होणार आहे. यावेळी अभिलेख्यांसह उपस्थित राहण्यासंदर्भात संस्थाचालकांना कळविण्यात आले आहे. यात बीडमधील ११ दिव्यांग शाळांचा समावेश आहे. याशिवाय औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, नंदुरबार, नाशिक, वर्धा, धुळे व पुणे या जिल्ह्यांतील संस्थादेखील आहेत.

....

पुनर्मान्यतेचा घाट

दिव्यांगांना अपुऱ्या सुविधा देणाऱ्या, अनुदानावर डोळा ठेवून संस्था उघडणाऱ्यांना मान्यता रद्दच्या कारवाईने दणका बसला होता. मात्र, या संस्थाचालकांनी आता पुनर्मान्यतेचा घाट घातला आहे. त्यासाठी वजन वापरण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक न्याय विभागाने या संस्थांवर कडक कारवाई करून पुनर्मान्यतेचा डाव हाणून पाडावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे संस्थापक डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी केली आहे.