शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:29 IST

अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी रबी हंगाम चांगला बहरला आहे. मोठ्या पावसामुळे जलस्त्रोत मोठ्या प्रमाणात वाढले. सर्वत्र विहिरी, नद्या तुडुंब आहेत. ...

अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी रबी हंगाम चांगला बहरला आहे. मोठ्या पावसामुळे जलस्त्रोत मोठ्या प्रमाणात वाढले. सर्वत्र विहिरी, नद्या तुडुंब आहेत. चार वर्षांनंतर अंबाजोगाई तालुक्यात मुबलक पाणीसाठा झाला. शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा, करडई यासोबतच उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली. या पिकांना पाणी देण्याची वेळ आता आली आहे. मात्र, महावितरणकडून शेतकऱ्यांची मोठी कोंडी होत आहे. एक आठवडा दिवसा, तर एक आठवडा रात्री अशी वीज वितरणची व्यवस्था महावितरणकडून होते. त्यातही वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. यामुळे विद्युत पंप चालत नाहीत. तर अनेक विद्युत पंप निकामी होतात. मोटारी जळतात. स्टार्टर उडतात. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. तसेच डीपीमध्ये बिघाड झाल्यास तो लवकर दुरुस्त केला जात नाही. जळालेला ट्रान्सफॉर्मर लवकर दुरुस्त करून मिळत नाही. यामुळे शेतीला पाणी देणे मोठ्या जिकिरीचे काम झाले आहे. महावितरणने यासंदर्भात ठोस उपाययोजना आखून उच्च दाबाने वीजपुरवठा सुरू करून वीज अखंडित द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे.

----------------