शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST

गेवराई : महावितरणकडून शेतकऱ्यांची सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येत असून गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीजजोडणी तोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे ...

गेवराई : महावितरणकडून शेतकऱ्यांची सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येत असून गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीजजोडणी तोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत मंगळवारी शिवसेना नेते माजीमंत्री बदामराव पंडित यांनी महावितरण कार्यालयात जाऊन तोडलेली वीजजोडणी पूर्ववत करण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला.

यावेळी अभियंता शिवणकर यांच्याशी चर्चा करून तत्काळ तोडगा निघत नसेल तर आपण याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याचा पवित्रा बदामराव पंडित व उपस्थित शेतकऱ्यांनी घेतला होता. दुपारी २ वाजेपर्यंत यावर कुठलाच तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच ठाण मांडले होते. शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या चर्चेतून मार्ग निगत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू ठेवले होते. औरंगाबाद येथील संयुक्त व्यवस्थापकीय संचालकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतर बदामराव पंडित यांनी काही शेतकऱ्यांसह कार्यकारी अभियंता गाडे यांची बीड येथे जाऊन भेट घेतली. त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांना ६ ऐवजी ८ तास वीजपुरवठा करावा आणि शेतकरी प्रति कनेक्शन पाच हजार रुपये बिल भरतील असे ठरले. त्यानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.

यावेळी बदामराव पंडित यांच्यासह माजी सभापती अभिजित पंडित, पंचायत समिती माजी उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, शिवसेना पं. स. गटनेते बापू चव्हाण, शिवसेना तालुका उपप्रमुख दिनकर शिंदे, महादेव औटी, मुकुंद बाबर, बदाम पौळ, विश्वनाथ सोनवणे, माउली धुमाळ, अमोल वाकडे, सुनील वाकडे, कैलास वाकडे, मदन गवारे, विष्णू आंधळे, भागवत वडघणे, सुनील वडघणे, भीमराव कोठेकर आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.