शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST

गेवराई : महावितरणकडून शेतकऱ्यांची सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येत असून गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीजजोडणी तोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे ...

गेवराई : महावितरणकडून शेतकऱ्यांची सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येत असून गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीजजोडणी तोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत मंगळवारी शिवसेना नेते माजीमंत्री बदामराव पंडित यांनी महावितरण कार्यालयात जाऊन तोडलेली वीजजोडणी पूर्ववत करण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला.

यावेळी अभियंता शिवणकर यांच्याशी चर्चा करून तत्काळ तोडगा निघत नसेल तर आपण याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याचा पवित्रा बदामराव पंडित व उपस्थित शेतकऱ्यांनी घेतला होता. दुपारी २ वाजेपर्यंत यावर कुठलाच तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच ठाण मांडले होते. शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या चर्चेतून मार्ग निगत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू ठेवले होते. औरंगाबाद येथील संयुक्त व्यवस्थापकीय संचालकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतर बदामराव पंडित यांनी काही शेतकऱ्यांसह कार्यकारी अभियंता गाडे यांची बीड येथे जाऊन भेट घेतली. त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांना ६ ऐवजी ८ तास वीजपुरवठा करावा आणि शेतकरी प्रति कनेक्शन पाच हजार रुपये बिल भरतील असे ठरले. त्यानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.

यावेळी बदामराव पंडित यांच्यासह माजी सभापती अभिजित पंडित, पंचायत समिती माजी उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, शिवसेना पं. स. गटनेते बापू चव्हाण, शिवसेना तालुका उपप्रमुख दिनकर शिंदे, महादेव औटी, मुकुंद बाबर, बदाम पौळ, विश्वनाथ सोनवणे, माउली धुमाळ, अमोल वाकडे, सुनील वाकडे, कैलास वाकडे, मदन गवारे, विष्णू आंधळे, भागवत वडघणे, सुनील वडघणे, भीमराव कोठेकर आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.