शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

रयत बाजार अभियानामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - राजेंद्र सुपेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:27 IST

आष्टी : महाराष्ट्र शासनाकडून ‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गत ‘संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान’ राज्यात राबविण्यात येत आहे. ...

आष्टी : महाराष्ट्र शासनाकडून ‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गत ‘संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान’ राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानातून शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना थेट ग्राहकांशी जोडण्यावर भर देण्यात येणार आहे. या अभियानात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला वाढीव दर मिळणार असून, ग्राहकांना ताजा व दर्जेदार शेतमाल उपलब्ध होणार आहे. या उपक्रमांतर्गत रस्ते, चौक, गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका याठिकाणी इच्छुक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना तात्पुरत्या स्वरूपात शेतमाल विक्रीसाठी परवानगी देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. इच्छुक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे यासाठी लेखी अर्ज करावेत. प्राप्त अर्ज तालुकास्तरीय समितीसमोर ठेवून योग्य अर्जांना समितीची मान्यता घेण्यात येईल व त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी ते शासनाकडे सादर करण्यात येतील. जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी शासनाच्या या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुपेकर यांनी केले आहे.