शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

रयत बाजार अभियानामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - राजेंद्र सुपेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:27 IST

आष्टी : महाराष्ट्र शासनाकडून ‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गत ‘संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान’ राज्यात राबविण्यात येत आहे. ...

आष्टी : महाराष्ट्र शासनाकडून ‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गत ‘संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान’ राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानातून शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना थेट ग्राहकांशी जोडण्यावर भर देण्यात येणार आहे. या अभियानात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला वाढीव दर मिळणार असून, ग्राहकांना ताजा व दर्जेदार शेतमाल उपलब्ध होणार आहे. या उपक्रमांतर्गत रस्ते, चौक, गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका याठिकाणी इच्छुक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना तात्पुरत्या स्वरूपात शेतमाल विक्रीसाठी परवानगी देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. इच्छुक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे यासाठी लेखी अर्ज करावेत. प्राप्त अर्ज तालुकास्तरीय समितीसमोर ठेवून योग्य अर्जांना समितीची मान्यता घेण्यात येईल व त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी ते शासनाकडे सादर करण्यात येतील. जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी शासनाच्या या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुपेकर यांनी केले आहे.