शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

‘अल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : रोहिणी, मृग नक्षत्रांत पडलेल्या अल्प स्वरूपाच्या पावसानंतर लगेचच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : रोहिणी, मृग नक्षत्रांत पडलेल्या अल्प स्वरूपाच्या पावसानंतर लगेचच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तसेच पावसामुळे पेरणीचे वेधदेखील शेतकऱ्यांना लागले आहे. मात्र, हा पाऊस मान्सूनपूर्व असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मुख्य पीक कापूस, सोयाबीन तसेच कडधान्य आहे. मान्सूनपूर्व पडलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. व पेरणीसाठी काही ठिकाणी लगबग सुरू झाली आहे. मात्र, काही ठिकाणी पडलेला पाऊस हा ५ मिमीपेक्षा कमी असल्यामुळे ही ओल जास्त काळ टिकून राहत नाही, असे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे घाईगडबडीत पेरणी केली तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येण्याची दाट शक्यता आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार सरासरी ७५ ते १०० मिमी पाऊस पडला तरच पेरणी करणे गरजेचे आहे.

बीज प्रक्रिया महत्त्वाची

खरीप पेरणीसाठी समाधानकारक पाऊस पडल्यानंतर पेरणी करताना बीज प्रक्रिया करूनच शेतकऱ्यांनी लागवड किंवा पेरणी करावी, यासाठी कृषी विभागाच्या ग्रामपातळीवर काम करणारे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांनी बहुतांश गावांमध्ये सोयाबीन बियाणाची उगवणक्षमता प्रयोग केले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी करावे. विक्रीच्या बियाणांसाठीदेखील हा पर्याय अवलंबला गेला तर, उगवणक्षमतेनुसार पेरणी करता येईल.

जिल्ह्यातील खरीप हंगामातील मुख्य पिके

कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, खरीप ज्वारी, मूग, उडीद.

बियाणेखरेदीसंदर्भात

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी विक्रेत्यांकडून पक्की पावती घ्यावी, जेणेकरून फसवणूक टाळण्यास मदत होईल.

मध्यम व भारी जमीन

जिल्ह्यातील मध्यम व भारी जमीन आहे, यामध्ये कापूस सोयाबीन तूर, हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत खरीप भुईमूग, खरीप ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सूर्यफूल अशा प्रकारे पीक पद्धतीचा अवलंब करावा.

७५-१०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी लागवड करू नये. कृषी विभागाच्या वतीने वेळोवेळी पेरणीसंदर्भात सल्ला दिला जाईल. दुबार पेरणी टाळण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

- दत्तात्रेय मुळे, जिल्हा कृषी अधीक्षक, बीड

परमिटधारकांनी बियाणे खरेदी करावे

कृषी विभागामार्फत गळीत धान्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रमाणित बियाणे वाटपासाठी लॉटरीत निवड करून लाभार्थी शेतकऱ्यांना परमिट देण्यात आलेले आहेत. अशा परमिटधारक शेतकऱ्यांनी त्या कृषी सेवा केंद्रात जाऊन अनुदानित बियाणे खरेदी करावीत. पुढील दोन दिवसांत शेतकऱ्यांनी बियाणे उचलले नाही तर, त्यांचे परमिट रद्द करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून कळवण्यात आले आहे.

===Photopath===

100621\10_2_bed_20_10062021_14.jpg

===Caption===

बीड शेतकरी