शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:40 IST

------------- वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात वन्य प्राणी रानडुक्कर, हरिणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली ...

-------------

वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात वन्य प्राणी रानडुक्कर, हरिणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे प्राणी सध्या परिसरात उभ्या असणाऱ्या ज्वारी व उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. हरिणांचे मोठे कळप या भागात मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत. त्यांचा पिकांवर सुरू असलेला मुक्तसंचार धोकादायक ठरू लागला आहे. या वन्य प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युतराव गंगणे यांनी केली आहे.

-------------

शहर बससेवा सुरू करण्याची मागणी

अंबेजोगाई : अंबेजोगाई शहराची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यशवंतराव चव्हाण चौक ते भगवानबाबा चौक असा मोठा पल्ला शहरवासीयांना पार करावा लागतो. भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या भागात स्वाराती रुग्णालयामार्गे शहर वाहतूक बससेवा सुरू झाल्यास शहरवासीयांची मोठी सोय होणार आहे. पूर्वी सुरू झालेली ही सेवा बंद झाली आहे. ती पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र काळे यांनी केली आहे.

-----------------

वृक्षतोडीकडे दुर्लक्ष

अंबेजोगाई : शहर परिसरात वनविभागाची मोठी झाडी आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सरपणासाठी लोक झाडांचे फाटे तोडून येत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन व वनविभागाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

--------

‘ऑटो रिक्षात मास्क घालणे सक्तीचे करावे’

अंबेजोगाई : विनामास्क प्रवाशांनाही ऑटो रिक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे. पूर्वी मास्क असल्याशिवाय रिक्षाचालक प्रवाशांना अथवा ग्राहकांना रिक्षात बसू देत नव्हते. मात्र, आता बेफिकिरी वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जोमाने असतानाही पुन्हा नो मास्क नो एंट्री ही मोहीम सुरू करून ग्राहकांना मास्कची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख यांनी केली आहे.

--------

कमी दाबाने वीजपुरवठा, शेतकरी त्रस्त

अंबेजोगाई : तालुक्यात शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होऊ लागल्याने विद्युत पंप सुस्थितीत चालत नाहीत. ते सतत बंद पडत आहेत. महावितरणने ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करून, पूर्ण क्षमतेने व मोठ्या दाबाने विद्युत पुरवठा उपलब्ध करून दिला, तर सिंचनाची गैरसोय दूर होईल.

------------