शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

एका स्वाक्षरीअभावी शेतकऱ्यांचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:31 IST

रब्बी हंगाम संपला तरी खरिपाची नुकसान भरपाई मिळेना धारूर : खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी ...

रब्बी हंगाम संपला तरी खरिपाची नुकसान भरपाई मिळेना

धारूर : खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेता शासनाने तत्काळ नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. यातील पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले असले तरी दुसऱ्या टप्प्यातील अनुदान रब्बी हंगाम संपला तरी खरिपाच्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. बँकांना देण्यात येणाऱ्या धनादेशावर तहसीलदारांची स्वाक्षरी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

खरीप हंगामात परतीच्या पावसाने तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. या मध्ये कापूस,तूर, सोयाबीन या प्रमुख पिकांसह इतरही पिकांना या परतीच्या अतिवृष्टीचा फटका बसला होता. यामुळे हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊ अशी घोषणा केली होती. यातील पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झालेले आहे. परंतु दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील अनुदान तहसीलकडे वर्ग होऊनही ते अद्यापपर्यंत मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. हे अनुदान खरीप हंगाम संपण्यापूर्वी देण्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु रब्बी हंगाम उलटून गेला तरीही शेतकऱ्यांना नुकसानीचे अनुदान मिळत नसल्याने सरकार आणि प्रशासनाविरुद्ध शेतकरी संतप्त झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान तहसीलकडे प्राप्त होऊन महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. अद्यापपर्यंत तहसीलदारांना शेतकऱ्यांसाठी आलेल्या अतिवृष्टी अनुदानाच्या अंतिम धनादेशावर सही करायला वेळ मिळत नसल्यामुळे हे अनुदान बँकांकडे वर्ग करण्यात आले नसल्याची माहिती मिळत आहे. तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी बँकांना अनुदानासाठी देण्यात येणाऱ्या याद्या तयार केल्या आहेत. तहसीलदारांना अंतिम सही करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती मिळत आहे. तहसीलदार शिडोळकर यांच्याशी संपर्क साधत या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.