शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

एका स्वाक्षरीअभावी शेतकऱ्यांचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:31 IST

रब्बी हंगाम संपला तरी खरिपाची नुकसान भरपाई मिळेना धारूर : खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी ...

रब्बी हंगाम संपला तरी खरिपाची नुकसान भरपाई मिळेना

धारूर : खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेता शासनाने तत्काळ नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. यातील पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले असले तरी दुसऱ्या टप्प्यातील अनुदान रब्बी हंगाम संपला तरी खरिपाच्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. बँकांना देण्यात येणाऱ्या धनादेशावर तहसीलदारांची स्वाक्षरी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

खरीप हंगामात परतीच्या पावसाने तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. या मध्ये कापूस,तूर, सोयाबीन या प्रमुख पिकांसह इतरही पिकांना या परतीच्या अतिवृष्टीचा फटका बसला होता. यामुळे हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊ अशी घोषणा केली होती. यातील पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झालेले आहे. परंतु दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील अनुदान तहसीलकडे वर्ग होऊनही ते अद्यापपर्यंत मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. हे अनुदान खरीप हंगाम संपण्यापूर्वी देण्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु रब्बी हंगाम उलटून गेला तरीही शेतकऱ्यांना नुकसानीचे अनुदान मिळत नसल्याने सरकार आणि प्रशासनाविरुद्ध शेतकरी संतप्त झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान तहसीलकडे प्राप्त होऊन महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. अद्यापपर्यंत तहसीलदारांना शेतकऱ्यांसाठी आलेल्या अतिवृष्टी अनुदानाच्या अंतिम धनादेशावर सही करायला वेळ मिळत नसल्यामुळे हे अनुदान बँकांकडे वर्ग करण्यात आले नसल्याची माहिती मिळत आहे. तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी बँकांना अनुदानासाठी देण्यात येणाऱ्या याद्या तयार केल्या आहेत. तहसीलदारांना अंतिम सही करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती मिळत आहे. तहसीलदार शिडोळकर यांच्याशी संपर्क साधत या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.