शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आष्टी तहसील कार्यालयासमोर शेतक-यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:36 IST

आष्टी : तालुक्यातील पाटण सांगवी येथील नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह बंद केल्याने २५ एकर क्षेत्रावरील पिकांमध्ये पाणी शिरून पिकांचे नुकसान ...

आष्टी : तालुक्यातील पाटण सांगवी येथील नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह बंद केल्याने २५ एकर क्षेत्रावरील पिकांमध्ये पाणी शिरून पिकांचे नुकसान होणार आहे. तरी हा ओढा तत्काळ पूर्ववत करावा. तसेच ओढा बंद करणा-यांविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी दोन दिवसांपासून आष्टी तहसील कार्यालयासमोर शेतक-यांचे आमरण उपोषण सुरू आहे.

तालुक्यातील सांगवी पाटण येथील सर्वे नं. ११८ मधील नैसर्गिक ओढा बुजविला आहे. तहसीलदारांच्या आदेशाचा अवमान करून सुधीर भगत, आसाराम भगत, शशिकांत भोसले, लक्ष्मण भगत, शंकर भगत यांनी ओढ्याचे नुकसान केले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा. ओढा पूर्ववत करावा. अन्यथा जनावरे व मुलाबाळांसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलनकर्त्या शेतक-यांनी घेतला आहे.

या उपोषणास प्रल्हाद वनवे, संजय वनवे, बाळू वनवे, अनिल वनवे, महादेव वनवे, सुरेश वनवे, अर्जुन वनवे, ज्ञानदेव भोसले, चंद्रकांत वनवे, राजेंद्र भोसले, महेश भगत, अर्जुन भगत, गीता वनवे, स्वाती वनवे, विमल वनवे, सुनीता वनवे, मयूरी भगत, अनिता भोसले आदी शेतकरी बसले आहेत.

180821\img_20210818_131443_14.jpg

आष्टी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेले पाटण सांगवी येथील शेतकरी.