शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

शेतकऱ्यांनो. खचून जाऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धानोरा : गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धानोरा : गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन करून शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांना खासदार प्रीतम मुंडे यांनी मंगळवारी भेट दिली. गेल्या आठवड्यात देऊळगाव, शेडाळा, सावरगाव, गंगादेवी या परिसरात ढगफुटी झाली होती. या पावसाने शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी यावेळी त्यांनी केली. यावेळी त्यांनी आपद्ग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आधीच कोरोनात आलेल्या आर्थिक संकटाने बेजार आहोत. त्यात अतिवृष्टी यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आठ दिवस झाले तरी नुकसानभरपाई मिळेना, अशा अनेक व्यथा शेतकऱ्यांंनी मांडल्या.

यावेळी मुंडे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी आपणही पीकविमा, मदतीसाठी प्रयत्न करू, असे सांगतिले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्यासह तालुक्यातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.