शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

सौर कृषिपंप योजनेतून शेतकरी होतोय आत्मनिर्भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:30 IST

कडा : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून मिळालेल्या सौर पंपाचा वापर करून शेतकरी पिकाला पाणी देण्याबद्दल आत्मनिर्भर होत ...

कडा : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून मिळालेल्या सौर पंपाचा वापर करून शेतकरी पिकाला पाणी देण्याबद्दल आत्मनिर्भर होत आहेत. आष्टी तालुक्यातील शेरी येथील दादासाहेब सुरेश ढोबळे नामक तरुण शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला आहे.

दादासाहेबची तीन एकर शेती आहे. या शेतीला पाणी देण्यासाठी त्याला मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून पंप मिळाला आहे. वीज उपलब्ध नसणे किंवा विजेचा लपंडाव यांसारख्या अडचणीतून त्याची सुटका झाली आहे. कांदा, ऊस, गहू, घास या पिकांबरोबर त्याची लिंबोणीची बागही बहरणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषिपंपासाठी ऑनलाईन नावनोंदणी करावी लागते. आपल्या शेतीला शाश्वत पाणीपुरवठा करणारी विहीर, बोअर असावे. मात्र, तिथे आधी विद्युत पुरवठा नसावा, एवढीच या योजनेची महत्त्वाची अट आहे. ढोबळे याने अर्ज करून नियम, अटींची पूर्तता झाल्यावर त्याला १६ हजार ५६० रुपये भरावे लागले. त्यानंतर त्याला १ लाख ५४ हजार रुपयाचे सौर कृषिपंप साहित्य मिळले. यात सौर पॅनल, त्याचे स्ट्रक्चर, मोटार, केबल आणि घरी वापरण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करून चालवले जाणारे दिवे इत्यादी साहित्य मिळाले. ज्या कंपनीकडून हे साहित्य पोहोच झाले, त्यांनीच त्याची उभारणी करून दिली. त्याने शेतात बोअर घेतलेले असून, जेव्हा दिवसभर सौर विद्युत पुरवठा सुरू असतो तेव्हा बोअरवरील मोटार चालू करून शेतीला पाणी देता येते. या सौर कृषिपंपामुळे शेतीला दिवसा पाणी देणे शक्य झाले असून, आता वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि वीज बिल या दोन्हींपासून मुक्तता मिळाल्याचे दादासाहेब ढोबळे याने सांगितले.

फोटो- दादासाहेब ढोबळे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक ढवण उपस्थित होते.