शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ऊसाच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचे औरंगाबादेत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : साखर सहसंचालकांनी लेखी पत्राद्वारे आदेशित करूनही जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे व्यवस्थापक बैठकीला हजर न राहिल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : साखर सहसंचालकांनी लेखी पत्राद्वारे आदेशित करूनही जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे व्यवस्थापक बैठकीला हजर न राहिल्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने दिनांक १ जानेवारी रोजी औरंगाबाद येथील सहसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. जिल्ह्यातील कारखाने स्थानिक व कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा नोंदीत ऊस आणण्याऐवजी शेजारच्या जिल्ह्यातून ऊस आणत आहेत. त्यामुळे स्थानिक ऊस उत्पादक अडचणीत आले आहेत. याविरोधात शेतकरी संघर्ष समितीने गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली बीड व परभणी जिल्ह्यांच्या सीमेवर आंदोलन केले होते. त्यावेळी कारखान्यांनी गेटकेन ऊस बंद करून कार्यक्षेत्रातील ऊस घेण्याची हमी दिली होती. मात्र, या दिलेल्या हमीचे पालन झाले नाही. त्यामुळे थावरे यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर सहसंचालकांनी २९ डिसेंबर रोजी बैठक बोलावून सातही साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, लेखी पत्र दिलेले असतानाही एकही व्यवस्थापक बैठकीला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता. याप्रकरणी प्रशासनाने कारखान्यांविरूद्ध कोणतीही कारवाई केली नाही. प्रशासनाच्या उदासिन भूमिकेविरोधात दिनांक १ जानेवारी रोजी औरंगाबाद येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सहसंचालकांशी चर्चा करण्यात आली. तसेच प्रश्न निकाली न काढल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे थावरे म्हणाले.