शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

३० वर्षे काम केलेल्या सालगड्याला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:34 IST

धारूर : एका ठिकाणी एखादा वर्ष काम करणे हे कठीण होत चालले असताना अंजनडोह येथे एका ...

धारूर : एका ठिकाणी एखादा वर्ष काम करणे हे कठीण होत चालले असताना अंजनडोह येथे एका शिक्षकाच्या शेतात सतत ३० वर्षे काम करणाऱ्या सालगड्याचा यथायोग्य सत्कार करून निरोप देण्यात आला. हा निरोप देताना दोन्ही कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आपले अश्रू आवरता आले नाही. बदलत्या काळात कुठे साल तर कुठे मनमुटावामुळे मालक आणि सालगड्यातील नाते दुरावत असताना तीन दशके काम करत ऋणानुबंध घट्ट असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.

शेतात सालगडी ठेवल्यानंतर एक वर्ष त्याला टिकविणे म्हणजे मालकाची कसोटीच असते. अर्ध्यावर सालगडी पळून गेल्याच्या अनेक घटना सतत चर्चेत असतात. अशा परिस्थितीत शेती मालकाचे होणारे हाल पाहवत नाहीत. शेतीसाठी सालगड्याचं साल चैत्र पाडव्याला ठरवले जाते. मात्र, पाडवा ते पाडवा सालगडी टिकवताना मालकांना कसरतच करावी लागते. मात्र, तालुक्यातील अंजनडोह येथील प्रसंगाने शेतकरी व सालगड्यांना आगळीवेगळी प्रेरणा दिली आहे. येथील सेवानिवृत्त शिक्षक व श्री विठ्ठल शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दगडूराव रावणराव सोळंके यांच्या शेतात गौतम लिंबाजी नेपते हे ३० वर्षांपासून सालगडी म्हणून काम करत होते. ३० वर्षांत कधीही वार्षिक साल ठरवले नाही. गावात जे साल असेल तेवढेच नेपते यांना दिले जायचे. कोणतीही बोलाचाली न होता दोन्ही कुटुंबाचे नाते घट्ट झाले होते. दोन मुले बाहेरगावी कामधंद्याला लागल्याने आणि वयोमानामुळे नेपते यांनी मालकाला सांगून काम बंद करण्याचा निर्णय घेतला. गुढीपाडव्याच्या दिवशी कौटुंबिक कार्यक्रमात सोळंके कुटुंबाने गौतम नेपते यांचा कुटुंबासह यथायोग्य सत्कार करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला. यावेळी दोन्ही कुटुंबातील मागील ३० वर्षांतील विविध आठवणींनी प्रत्येक सदस्याचे डोळे पाणावले होते.

===Photopath===

150421\img-20210413-wa0157_14.jpg