शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षे काम केलेल्या सालगड्याला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:34 IST

धारूर : एका ठिकाणी एखादा वर्ष काम करणे हे कठीण होत चालले असताना अंजनडोह येथे एका ...

धारूर : एका ठिकाणी एखादा वर्ष काम करणे हे कठीण होत चालले असताना अंजनडोह येथे एका शिक्षकाच्या शेतात सतत ३० वर्षे काम करणाऱ्या सालगड्याचा यथायोग्य सत्कार करून निरोप देण्यात आला. हा निरोप देताना दोन्ही कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आपले अश्रू आवरता आले नाही. बदलत्या काळात कुठे साल तर कुठे मनमुटावामुळे मालक आणि सालगड्यातील नाते दुरावत असताना तीन दशके काम करत ऋणानुबंध घट्ट असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.

शेतात सालगडी ठेवल्यानंतर एक वर्ष त्याला टिकविणे म्हणजे मालकाची कसोटीच असते. अर्ध्यावर सालगडी पळून गेल्याच्या अनेक घटना सतत चर्चेत असतात. अशा परिस्थितीत शेती मालकाचे होणारे हाल पाहवत नाहीत. शेतीसाठी सालगड्याचं साल चैत्र पाडव्याला ठरवले जाते. मात्र, पाडवा ते पाडवा सालगडी टिकवताना मालकांना कसरतच करावी लागते. मात्र, तालुक्यातील अंजनडोह येथील प्रसंगाने शेतकरी व सालगड्यांना आगळीवेगळी प्रेरणा दिली आहे. येथील सेवानिवृत्त शिक्षक व श्री विठ्ठल शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दगडूराव रावणराव सोळंके यांच्या शेतात गौतम लिंबाजी नेपते हे ३० वर्षांपासून सालगडी म्हणून काम करत होते. ३० वर्षांत कधीही वार्षिक साल ठरवले नाही. गावात जे साल असेल तेवढेच नेपते यांना दिले जायचे. कोणतीही बोलाचाली न होता दोन्ही कुटुंबाचे नाते घट्ट झाले होते. दोन मुले बाहेरगावी कामधंद्याला लागल्याने आणि वयोमानामुळे नेपते यांनी मालकाला सांगून काम बंद करण्याचा निर्णय घेतला. गुढीपाडव्याच्या दिवशी कौटुंबिक कार्यक्रमात सोळंके कुटुंबाने गौतम नेपते यांचा कुटुंबासह यथायोग्य सत्कार करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला. यावेळी दोन्ही कुटुंबातील मागील ३० वर्षांतील विविध आठवणींनी प्रत्येक सदस्याचे डोळे पाणावले होते.

===Photopath===

150421\img-20210413-wa0157_14.jpg