शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

३० वर्षे काम केलेल्या सालगड्याला निरोप - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:33 IST

बदलत्या काळात कुठे साल तर कुठे मनमुटावामुळे मालक आणि सालगड्यातील नाते दुरावत असताना तीन दशके काम करत ऋणानुबंध घट्ट ...

बदलत्या काळात कुठे साल तर कुठे मनमुटावामुळे मालक आणि सालगड्यातील नाते दुरावत असताना तीन दशके काम करत ऋणानुबंध घट्ट असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.

शेतात सालगडी ठेवल्यानंतर एक वर्ष त्याला टिकविणे म्हणजे मालकाची कसोटीच असते. अर्ध्यावर सालगडी पळून गेल्याच्या अनेक घटना सतत चर्चेत असतात. अशा परिस्थितीत शेती मालकाचे होणारे हाल पाहवत नाहीत. शेतीसाठी सालगड्याचं साल चैत्र पाडव्याला ठरवले जाते. मात्र, पाडवा ते पाडवा सालगडी टिकवताना मालकांना कसरतच करावी लागते. मात्र, तालुक्यातील अंजनडोह येथील प्रसंगाने शेतकरी व सालगड्यांना आगळीवेगळी प्रेरणा दिली आहे.

येथील सेवानिवृत्त शिक्षक व श्री विठ्ठल शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दगडूराव रावणराव सोळंके यांच्या शेतात गौतम लिंबाजी नेपते हे ३० वर्षांपासून सालगडी म्हणून काम करत होते. ३० वर्षांत कधीही वार्षिक साल ठरवले नाही. गावात जे साल असेल तेवढेच नेपते यांना दिले जायचे. कोणतीही बोलाचाली न होता दोन्ही कुटुंबाचे नाते घट्ट झाले होते. दोन मुले बाहेरगावी कामधंद्याला लागल्याने आणि वयोमानामुळे नेपते यांनी मालकाला सांगून काम बंद करण्याचा निर्णय घेतला. गुढीपाडव्याच्या दिवशी कौटुंबिक कार्यक्रमात सोळंके कुटुंबाने गौतम नेपते यांचा कुटुंबासह यथायोग्य सत्कार करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला. यावेळी दोन्ही कुटुंबातील मागील ३० वर्षांतील विविध आठवणींनी प्रत्येक सदस्याचे डोळे पाणावले होते.

===Photopath===

150421\4225img-20210413-wa0157_14.jpg