शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

आरोग्य विभागाचे अपयश ; मृत्यूदर होईना कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:34 IST

बीड : जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण कमी होत असले तरी मृत्यूदर वाढतच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाेर्टलवर ...

बीड : जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण कमी होत असले तरी मृत्यूदर वाढतच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाेर्टलवर ५६९ तर ऑफलाईन तब्बल ५९४ मृत्यूची नोंद आहे. यात बीड व अंबाजोगाई तालुक्यात तर मृत्यूने शतक ओलांडले आहे. जिल्ह्यात सध्या मृत्यूदराचा टक्का ३.२६ एवढा असून तो कमी करण्यात आरोग्य विभाग पूर्णपणे अपयशी ठरत आहे. ही परिस्थिती बीडकरांसाठी चिंताजनक आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार १९१ कोरोनाबाधि रुग्ण आढळले आहेत. पैकी १७ हजार ४२२ कोरोनामुक्त झाले आहेत. पोर्टलवर ५६९ मृत्यूची नोंद असून ऑफलाईन ६९४ आहेत. मागील काही महिन्यांपासून राज्यातील मृत्यूदर कमी होत आहे. परंतु बीडमधील मृत्यूदर कमी होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. उपचारातील हलगर्जी, वेळेवर आणि पुरेशा सुविधा न मिळणे, वरिष्ठांचे दुर्लक्ष अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील मृत्यूदर आटोक्यात येत नाहीत. जिल्ह्यात एवढी गंभीर परिस्थिती असतानाही आरोग्य विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. झालेल्या मृत्यूचे ऑडिट करण्यातच अधिकारी व्यस्त आहेत. परंतु, मृत्यूदर कमी करण्यात उपाययोजना करीत नसल्याचे दिसत आहे. यामुळे कोरोनाकाळात सहानुभूती मिळविणाऱ्या आरोग्य विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नियोजनशून्य उपाययोजना

जिल्हा रुग्णालयासह अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात कोरोनामुळे होणारे मृत्यू सर्वाधिक आहेत. असे असतानाही येथे कसल्याच उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या ढिसाळ नियोजनामुळे रुग्णांना वेळेवर सुविधा मिळत नाहीत. दर्जेदार उपचाराबद्दलही तक्रारी आहेत. असे असतानाही आरोग्य विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

कोट

जिल्हा रुग्णालयात कमी मृत्यू आहेत. तर अंबाजोगाईत जास्त आहेत. याबाबत अधिष्ठातांना विचारावे लागेल. मृत्यूदर कमी करण्यासाठी चाचण्या वाढायला पाहिजेत. कारणमीमांसा सांगणे आता अवघड आहे.

डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

---

तालुकानिहाय मृत्यू

बीड१४२

आष्टी ४९

पाटोदा २५

शिरूर १४

गेवराई ४०

माजलगाव ४४

वडवणी ११

धारूर ३४

केज ५५

अंबाजोगाई १०७

परळी ६८

इतर ५