शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मराठा आरक्षण रद्द होण्यास फडणवीस सरकारच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:24 IST

बीड, अंबाजोगाई : मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास केंद्रातील भाजप आणि महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारच ...

बीड, अंबाजोगाई :

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास केंद्रातील भाजप आणि महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारच जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी बीड आणि अंबाजोगाई येथील पत्रपरिषदेत केला. नरेंद्र पाटील आणि विनायक मेटे हे भाजपचे हस्तक असून, त्यांना पुढे करून मराठा मोर्चा काढला जात आहे, असा आरोप लाखे यांनी यावेळी केला.

मराठा आरक्षणाची सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील हे २ जून रोजी अंबाजोगाईत, तर ४ जून रोजी बीडमध्ये होते. मराठा आरक्षणाबाबत तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण, वंचित बहुजन समाजाचे पदोन्नतीतील आरक्षण याबाबत भाजपकडून दिशाभूल केली जात असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले. अंबाजोगाईत पत्रपरिषदेत जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, अ‍ॅड. विष्णुपंत सोळंके, औदुंबर मोरे, महादेव आदमाने, बालाजी शेळके, शरद देशमुख तर बीडमध्ये ॲड. महादेव धांडे, ॲड.राहूल साळवे आदी उपस्थित होते.

डॉ. लाखे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार व काँग्रेस पक्षाने केलेले प्रामाणिक प्रयत्न याची तपशीलवार व मुद्देसूद माहिती दिली. मराठा आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पक्षाकडून चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. भाजपचा हा खोटारडेपणा आता उघड झाला आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास केंद्रातील भाजपचे मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे. आता विरोधी पक्षातील नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा मराठा समाजाची दिशाभूल करून नरेंद्र पाटील व आ. विनायक मेटे यांना हाताशी धरून कोविड असतानाही मोर्चे काढण्यास समाजाला प्रवृत्त करीत आहेत. ही वस्तुस्थिती समाजाला माहीत करून देण्यासाठी मी राज्यभरात दौरे करीत आहे, असे ते म्हणाले.

आमदार मेटे यांनी मराठा समाजाची दिशाभूल थांबवावी, असे लाखे पाटील यांनी आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, ‘ईडब्लूएस’ आरक्षणाचा मराठा विद्यार्थी, युवकांना शैक्षणिक प्रवेश आणि नोकरीमध्ये लाभ न मिळण्यामागचे खरे सूत्रधार हे आ. मेटेच असल्याचा आरोप करून लाखे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने याबाबत जो शासन आदेश काढला तो सुस्पष्ट असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तो काढावा लागला आहे. मेटे कसलीही याचिका न करता एकीकडे त्याचेही श्रेय लाटत असून दुसरीकडे शासन आदेश सुस्पष्ट नसल्याचे सांगत आहेत. ते राजकीय हेतूने संभ्रम निर्माण करीत आहेत.