शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

ग्रामीण तरुणात वाढतेय व्यसनाचे फॅड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:36 IST

--------- कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन; धोका वाढला अंबाजोगाई : अनलॉक प्रक्रियेअंतर्गत ग्रामीण भागात आठवडी बाजारांना परवानगी देण्यात आली आहे. ...

---------

कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन; धोका वाढला

अंबाजोगाई : अनलॉक प्रक्रियेअंतर्गत ग्रामीण भागात आठवडी बाजारांना परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात बाजारही आता मोठ्या पद्धतीने भरू लागले आहे. मात्र कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत आहे. सामाजिक अंतर व मास्कचा वापर क्वचितच केला जातो. अद्यापही कोरोना संपलेला नसल्याने नियमांचे असे उल्लंघन राहिल्यास संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

-------

बसस्थानकाबाहेरील विक्रेते संकटात

अंबाजोगाई : कोरोनाच्या प्रभावामुळे अंबाजोगाईत बसस्थानकाबाहेरील विक्रेत्यांवर मोठा परिणाम झाला आहे. बसस्थानकाच्या बाहेर असणारे बूट पॉलिशवाले, छोट्या-मोठ्या वस्तूंची विक्री करणारे विक्रेते. बस थांबल्यानंतर बसमध्ये पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट पुडे, विविध खाद्यपदार्थ यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनाही पाहिजे तसा रोजगार उपलब्ध झाला नाही. प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवासी धजावत नाहीत.

-----------

शाळा अनुदानाच्या ‘त्या’ अटी रद्द करण्याची मागणी

अंबाजोगाई : विना अनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे. अनुदानाच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. विनाअनुदानित शिक्षकांची पिळवणूक थांबवावी. विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासाठी असणाऱ्या जाचक अटी रद्द करून त्या शाळांना अनुदान देऊन शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी केली आहे.

------------

जपून पाणी वापरण्याचे पालिकेचे आवाहन

अंबाजोगाई : यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताचा जलसाठाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु शहरात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नागरिकांनी आपल्या नळाला तोट्या बसवून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश सरोदे यांनी केले आहे.

-------

कीटकनाशकाचा सतत वापर धोक्याचा

अंबाजोगाई : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना शिफारसीप्रमाणेच फवारणी करणे आवश्यक आहे. जर ठरवून दिलेल्या मात्रेपेक्षा जास्त प्रमाणात औषधांचा वापर झाल्यास फुलगळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकच कीटकनाशक सतत वापरणे धोक्याचे आहे. यासाठी कीटकनाशकांची आलटून-पालटून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले आहे.

------------

जमिनी खरडल्या, मदतीची प्रतीक्षा

अंबाजोगाई : तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मुसळधार झालेल्या पावसामुळे व सतत पडणाऱ्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या जमिनी आता पूर्ववत करण्यासाठी जेसीबी मशीन, लेव्हलींग मशीन व ट्रॅक्टर या मशिनरीसाठी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड मोजावा लागणार आहे. अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हा खर्च परवडणारा नाही. त्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख यांनी केली आहे.

----------------------------