शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

बीडमध्ये जलवाहिनी दुरुस्तीवर वर्षाला ८० लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शहरवासीयांना सध्या ८ ते १० दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची ओरड आहे. सुरळीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : शहरवासीयांना सध्या ८ ते १० दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची ओरड आहे. सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने पालिकेबद्दल रोष आहे. वारंवार जलवाहिनी लिकेज आणि खंडित वीज पुरवठ्याचे कारण दिले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मागील वर्षात जलवाहिनी लिकेजवर पालिका जवळपास ८० लाख रुपयांची उधळपट्टी करीत असल्याचे समोर आले आहे. तसेच वीज बीलही प्रति महिना सरासरी ३५ ते ४० लाख रुपये येत असल्याचे सांगण्यात आले. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २ लाख ३ हजार २४० एवढी आहे. परंंतु त्यांना पाणीपुरवठ्यासाठी केवळ १२५ कर्मचारी आहेत. अपुऱ्या मनुष्यबळावर आणि जलवाहिनी जुनी झाल्याने वारंवार लिकेज होत असल्याने पाणी पुरवठ्यात अडचणी येत आहेत. नवीन पाईपलाईन झाल्यास हा त्रास कमी होईल.

व्हाॅल्व्हमधून पाणी गळती

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवर शहरात ठिकठिकाणी व्हाॅल्व्ह काढलेले आहेत. बार्शी रोडवरून केएसके महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील व्हाॅल्व्हमधून मागील अनेक वर्षांपासून पाणी गळती होत असल्याचे दिसत आहे.

लिकेजमुळे २० टक्के पाणी वाया

बीड शहराला होणाऱ्या एकूण पाणी पुरवठ्यापैकी तब्बल २० टक्के पाणी वाया जाते. असे असले तरी एकूण पाणी पुरवठ्याच्या १५ टक्के पाणी वाया जाण्याचे प्रमाण गृहीत धरले जाते. परंतु शहरातील जुन्या जलवाहिनी आणि वारंवार रस्त्यांचे कामे सुरू राहत असल्याने जलवाहिनी लिकेज होत राहते. यामुळे ५ टक्के पाणी जास्त वाया जाते.

शहराला दररोज ३२ एमएलडी पाण्याची गरज असते. माजलगाव धरणातून २० तर बिंदुसरा धरणातून ८ असे २८ एमएलडी पाणीपुरवठा दररोज होतो. एकूण पाणीपुरवठ्याच्या १५ टक्के पाणी वाया जाऊ शकते. जलवाहिनी लिकेज होताच दुरुस्ती केली जाते.

- राहुल टाळके, अभियंता पाणीपुरवठा विभाग