शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:40 IST

बीड : जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतातील लवकरात-लवकर ...

बीड : जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतातील लवकरात-लवकर पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. जेणेकरून बुरशीजन्य रोगांपासून शेतातील उभ्या पिकांचे संरक्षण होईल. त्यासाठी कृषी विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, गावपातळीवर शेतकऱ्यांसाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

खरीप हंगामातील मूग, उडीद ही पिके काढणीला आली आहेत, तर सोयाबीन पिकाला काही दिवस बाकी आहेत. कापूस-कांदा-तूर ही पिके शेतात उभी असताना जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे. या पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही, तर पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असून, शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी करावेत हे उपाय

१ सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे, तसेच ढगाळ वातावरणामुळे पाने पिवळी पडणे, शेंगवर काळे खोलगट चट्टे पडणे अशा बुरशीजन्य करापा रोगाची लक्षणे दिसून आल्यास खालीलपैकी एका बुरशनाशकाची प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात मात्रा घेऊन फवारणी करावी, तसेच टेब्यूकोनाझोल १२.५ मिली किंवा टेब्यूकोनाझोल व सल्फर २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनाझोल ५ टक्के ईसी १० मिली याचा वापर करावा.

२ तूर : पिकात मरीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास मरग्रस्त झाडे काढून टाकावीत व त्याठिकाणी, तसेच चोहोबााजूनी एक मीटर अंतरावर बाविस्टिन २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.

३ कापूस या पिकात आकस्मित मर अथवा मूळकूज दिसू लागल्यास कॉपर ऑक्सिकलोराइड २५ ग्रॅम व युरिया २०० ग्रॅम त्यासोबत पंधरा पोटॅश १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन झाडांच्या मुळाना द्यावे.

४ कांदा : पाऊस जास्त झाल्यास शेतात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. ताबडतोब जास्तीच पाणी निचरा करावा, जास्त पावसामुळे कांद्याच्या पाती पिवळी पडली असल्यास (नत्राच्या कमतरतेमुळे) १०० ग्राम युरिया प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

.................

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संबंधित कृषी सहायकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी देखील वेळोवेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून उपाययोजनेच्या संदर्भात माहिती घ्यावी व उपाययोजना कराव्यात.

बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड.

060921\06_2_bed_14_06092021_14.jpg~060921\06_2_bed_13_06092021_14.jpg

पिकांचे झालेले नुकसान ~कापूस पीक पाण्याखाली