शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

अतिवृष्टीमुळे पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:40 IST

बीड : जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतातील लवकरात-लवकर ...

बीड : जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतातील लवकरात-लवकर पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. जेणेकरून बुरशीजन्य रोगांपासून शेतातील उभ्या पिकांचे संरक्षण होईल. त्यासाठी कृषी विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, गावपातळीवर शेतकऱ्यांसाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

खरीप हंगामातील मूग, उडीद ही पिके काढणीला आली आहेत, तर सोयाबीन पिकाला काही दिवस बाकी आहेत. कापूस-कांदा-तूर ही पिके शेतात उभी असताना जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे. या पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही, तर पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असून, शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी करावेत हे उपाय

१ सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे, तसेच ढगाळ वातावरणामुळे पाने पिवळी पडणे, शेंगवर काळे खोलगट चट्टे पडणे अशा बुरशीजन्य करापा रोगाची लक्षणे दिसून आल्यास खालीलपैकी एका बुरशनाशकाची प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात मात्रा घेऊन फवारणी करावी, तसेच टेब्यूकोनाझोल १२.५ मिली किंवा टेब्यूकोनाझोल व सल्फर २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनाझोल ५ टक्के ईसी १० मिली याचा वापर करावा.

२ तूर : पिकात मरीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास मरग्रस्त झाडे काढून टाकावीत व त्याठिकाणी, तसेच चोहोबााजूनी एक मीटर अंतरावर बाविस्टिन २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.

३ कापूस या पिकात आकस्मित मर अथवा मूळकूज दिसू लागल्यास कॉपर ऑक्सिकलोराइड २५ ग्रॅम व युरिया २०० ग्रॅम त्यासोबत पंधरा पोटॅश १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन झाडांच्या मुळाना द्यावे.

४ कांदा : पाऊस जास्त झाल्यास शेतात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. ताबडतोब जास्तीच पाणी निचरा करावा, जास्त पावसामुळे कांद्याच्या पाती पिवळी पडली असल्यास (नत्राच्या कमतरतेमुळे) १०० ग्राम युरिया प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

.................

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संबंधित कृषी सहायकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी देखील वेळोवेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून उपाययोजनेच्या संदर्भात माहिती घ्यावी व उपाययोजना कराव्यात.

बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड.

060921\06_2_bed_14_06092021_14.jpg~060921\06_2_bed_13_06092021_14.jpg

पिकांचे झालेले नुकसान ~कापूस पीक पाण्याखाली