शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

अतिवृष्टीमुळे पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:40 IST

बीड : जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतातील लवकरात-लवकर ...

बीड : जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतातील लवकरात-लवकर पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. जेणेकरून बुरशीजन्य रोगांपासून शेतातील उभ्या पिकांचे संरक्षण होईल. त्यासाठी कृषी विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, गावपातळीवर शेतकऱ्यांसाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

खरीप हंगामातील मूग, उडीद ही पिके काढणीला आली आहेत, तर सोयाबीन पिकाला काही दिवस बाकी आहेत. कापूस-कांदा-तूर ही पिके शेतात उभी असताना जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे. या पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही, तर पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असून, शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी करावेत हे उपाय

१ सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे, तसेच ढगाळ वातावरणामुळे पाने पिवळी पडणे, शेंगवर काळे खोलगट चट्टे पडणे अशा बुरशीजन्य करापा रोगाची लक्षणे दिसून आल्यास खालीलपैकी एका बुरशनाशकाची प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात मात्रा घेऊन फवारणी करावी, तसेच टेब्यूकोनाझोल १२.५ मिली किंवा टेब्यूकोनाझोल व सल्फर २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनाझोल ५ टक्के ईसी १० मिली याचा वापर करावा.

२ तूर : पिकात मरीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास मरग्रस्त झाडे काढून टाकावीत व त्याठिकाणी, तसेच चोहोबााजूनी एक मीटर अंतरावर बाविस्टिन २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.

३ कापूस या पिकात आकस्मित मर अथवा मूळकूज दिसू लागल्यास कॉपर ऑक्सिकलोराइड २५ ग्रॅम व युरिया २०० ग्रॅम त्यासोबत पंधरा पोटॅश १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन झाडांच्या मुळाना द्यावे.

४ कांदा : पाऊस जास्त झाल्यास शेतात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. ताबडतोब जास्तीच पाणी निचरा करावा, जास्त पावसामुळे कांद्याच्या पाती पिवळी पडली असल्यास (नत्राच्या कमतरतेमुळे) १०० ग्राम युरिया प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

.................

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संबंधित कृषी सहायकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी देखील वेळोवेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून उपाययोजनेच्या संदर्भात माहिती घ्यावी व उपाययोजना कराव्यात.

बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड.

060921\06_2_bed_14_06092021_14.jpg~060921\06_2_bed_13_06092021_14.jpg

पिकांचे झालेले नुकसान ~कापूस पीक पाण्याखाली