शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

तीन महिन्यानंतरही मांजरा धरणात केवळ ३१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:37 IST

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरासह धारूर, केज, कळंब, मुरुड, लातूर व लातूर एमआयडीसी आणि एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरासह धारूर, केज, कळंब, मुरुड, लातूर व लातूर एमआयडीसी आणि एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यात फक्त ३० दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रात आणखी मोठ्या पावसाची गरज असून प्रकल्पात फक्त ३१.८३ टक्के इतका जिवंत साठा आहे.

या वर्षी पावसाळ्यात सर्वत्र मोठा पाऊस झाला. तीन महिने लोटली तरी मांजरा धरणाचा पाणीसाठा वाढलेला नाही. मांजरा प्रकल्पावर अनेक मोठी शहरे आणि गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. शिवाय, मांजरा प्रकल्प क्षेत्रांतर्गत मोठे पाणलोट क्षेत्र आहे. त्यामुळे प्रकल्प शंभर टक्के भरणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत प्रकल्पाची पाणी पातळी ६३८. ३३०मीटर आहे. सर्व शहरांसाठी प्रति महिना ३ दलघमी पाणी उचलले जाते. अंबाजोगाई शहरात किमान आठ दिवसाआड पाणी देण्यासाठी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची गरज आहे. २०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने दोनदा भरले आहे. यावर्षी ऑगस्ट खेर फक्त चोवीस दलघमी नवीन पाण्याची आवक झालेली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसावरच सर्व काही अवलंबून आहे. पिण्यासाठी मुबलक आणि शेतीला जेमतेम पाणी मिळण्यासाठी मोठ्या पावसाकडे अंबाजोगाईकरांचे डोळे लागले आहेत. आतापर्यंत प्रकल्प क्षेत्र परिसरात ४१० मिमी ४१० मिमी पाऊस झाला आहे. जूनपासून आजपर्यंत ३०.०२३ दलघमी नवीन पाणीसाठा झाला असला तरी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पावसाची गरज आहे.

अशी आहे मांजरा धरणाची स्थिती :

प्रकल्पा क्षमता २२४.०९४ दलघमी असून, सद्य:स्थितीत (१०३.४५४) दलघमी आहे. त्यातील ४७.१३० दलघमी मृतसाठा आहे. पाणी पातळी गाठण्यासाठी मोठा पाऊस हवा आहे. सध्या धरणातील एकूण पाणीसाठा १०३.४५४ दलघमी आहे तर धरणाच्या पाणीसाठ्याची एकूण क्षमता २२४.०९३ दलघमी आहे. मृत पाणीसाठा ४७.१३० दलघमी आहे. सध्या प्रकल्पातील जिवंत साठ्याची टक्केवारी ३१.८३ टक्के आहे.