शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी ग्रामसमिती स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:35 IST

गंगाभिषण थावरे यांची मागणी माजलगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या ...

गंगाभिषण थावरे यांची मागणी

माजलगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. मागच्या लॉकडाऊनमध्येही अशीच परिस्थिती होती. मात्र, त्यावेळच्या प्रशासकीय टीमने योग्य नियोजन केल्याने परिस्थिती आटोक्यात आली होती. आता पुन्हा ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव जोरात होत असून, या परिस्थितीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात ग्रामसमिती स्थापन करून कडक लॉकडाऊन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाभिषण थावरे यांनी केली आहे.

मराठवाड्यात बीड जिल्ह्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे तरुण ते वृद्ध या वयोगटातील लोकांना जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी उत्तम कामगिरी केली होती. वेळीच निर्णय घेतल्याने जिल्ह्यात कोरोनाचा उशिरा शिरकाव झाला होता. मागच्या वेळी ग्रामीण भागात कोरोचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासकीय टीमने प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीसपाटील, ग्रामपंचयत सदस्य यांची ग्रामसमिती नियुक्त केली होती. या समितीने गावात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली. बाहेरील लोकांना गावाबाहेरच राहू दिले, तर कोणालाही गावात फिरू दिले नाही. यामुळे मागच्या वेळी ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली नाही. परंतु आजच्या दुसऱ्या लाटेमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागात दुपटीने रुग्ण संख्या झाली आहे. यामुळे गाव खेड्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा गावस्तरावर ग्रामसमिती नियुक्त करून ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन करावे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांनीही पुढाकार घेऊन आपापल्या वॉर्डात, गटात, गणात जाऊन नागरिकांचे मनोबल वाढवावे व नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करावे. असे नियम राबवले तर ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल नाहीतर प्लेगच्या काळातील परिस्थिती उद्भवल्याशिवाय राहणार नाही असेही गंगाभिषण थावरे म्हणाले.