शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी ग्रामसमिती स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:35 IST

गंगाभिषण थावरे यांची मागणी माजलगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या ...

गंगाभिषण थावरे यांची मागणी

माजलगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. मागच्या लॉकडाऊनमध्येही अशीच परिस्थिती होती. मात्र, त्यावेळच्या प्रशासकीय टीमने योग्य नियोजन केल्याने परिस्थिती आटोक्यात आली होती. आता पुन्हा ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव जोरात होत असून, या परिस्थितीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात ग्रामसमिती स्थापन करून कडक लॉकडाऊन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाभिषण थावरे यांनी केली आहे.

मराठवाड्यात बीड जिल्ह्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे तरुण ते वृद्ध या वयोगटातील लोकांना जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी उत्तम कामगिरी केली होती. वेळीच निर्णय घेतल्याने जिल्ह्यात कोरोनाचा उशिरा शिरकाव झाला होता. मागच्या वेळी ग्रामीण भागात कोरोचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासकीय टीमने प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीसपाटील, ग्रामपंचयत सदस्य यांची ग्रामसमिती नियुक्त केली होती. या समितीने गावात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली. बाहेरील लोकांना गावाबाहेरच राहू दिले, तर कोणालाही गावात फिरू दिले नाही. यामुळे मागच्या वेळी ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली नाही. परंतु आजच्या दुसऱ्या लाटेमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागात दुपटीने रुग्ण संख्या झाली आहे. यामुळे गाव खेड्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा गावस्तरावर ग्रामसमिती नियुक्त करून ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन करावे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांनीही पुढाकार घेऊन आपापल्या वॉर्डात, गटात, गणात जाऊन नागरिकांचे मनोबल वाढवावे व नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करावे. असे नियम राबवले तर ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल नाहीतर प्लेगच्या काळातील परिस्थिती उद्भवल्याशिवाय राहणार नाही असेही गंगाभिषण थावरे म्हणाले.