शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

कर्मचारी कमतरतेने पाणी चोर निर्धास्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 17:23 IST

कालव्याच्या मार्गातील अनेक गावातील नागरिकांनी हा कालवा जागोजागी फोडलेला आहे. यासोबतच धरणातील पाण्याची देखील मोठया प्रमाणावर चोरी होत आहे.परंतु; जलसंधारण व उपसा सिंचन विभागाच्या माजलगाव येथील कार्यालयात कर्मचा-यांची कमतरता असल्याने पाणी चोरीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. 

ऑनलाईन लोकमत

माजलगाव (बीड), दि. १३ : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याचा बराचसा भाग गेवराई व माजलगांव तालुक्यातुन माजलगांव धरणापर्यंत आलेला आहे. कालव्याच्या मार्गातील अनेक गावातील नागरिकांनी हा कालवा जागोजागी फोडलेला आहे. यासोबतच धरणातील पाण्याची देखील मोठया प्रमाणावर चोरी होत आहे.परंतु; जलसंधारण व उपसा सिंचन विभागाच्या माजलगाव येथील कार्यालयात कर्मचा-यांची कमतरता असल्याने पाणी चोरीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. 

माजलगांव धरणाच्या पाण्यावर तसेच पैठण येथुन कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम उपसा सिंचन योजनेच्या दोन शाखांमार्फत केले जाते. दोन्ही शाखांमध्ये मिळुन कालवा निरीक्षकांची 6 पदे, दप्तर कारकुनची 2 पदे व मजुरांची 6 अशी 14 पदे रिक्त आहेत. यामुळे या शाखांमार्फत आता केवळ कार्यालयीन कामच होते. प्रत्यक्ष कामासाठी येथे कर्मचारीच नाहीत. 

बिनधास्त चोरले जाते पाणी  धरणाकडे येणा-या कालव्याला ठिकठिकाणी लोकांनी छिद्र पाडून पाणी वळवलेले आहे. एका गावात तर चक्क बंधा-यात ओढुन घेतलेले आहे त्यामुळे पैठण वरुन निघालेल्या पाण्याच्या केवळ 10 टक्के इतकेच पाणी धरणात येते. याने  कालव्याची अगदी चाळण झाली आहे. यातच कालवा निरीक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे कालव्यावर नेमके काय चाललेय याची माहिती विभागाला फार उशिराने मिळते. माहिती मिळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तसेच कारवाईसाठी निरीक्षकच नसल्यामुळे या पाणी चोरांवर कोणतीच कारवाई करता येत नाही. यामुळे हे पाणी चोर अगदी निर्धास्त आहेत. 

दुसरीकडे, याच विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या धरणातील पाण्याचा देखील मोठया प्रमाणावर अवैधरीत्या उपसा  होत आहे. धरणावरुन शेतीसाठी पाणी उपसा करण्याचे 1586 जणांना परवाने देण्यात आलेले आहेत. यातील केवळ 350 परवाना धारकाच पाणी उपसा करत आहेत. या व्यतिरिक्त दीड ते दोन हजार मोटार मात्र विनापरवानाच पाणी उपसा करत आहेत. पाटबंधारे विभागा अंतर्गत असलेली जवळपास सर्वच कार्यालये ही सन 2000 मध्ये माजलगांव येथुन परळी येथे स्थलांतरीत झालेले आहेत. यामुळे विभागाचा सारा कारभार परळी येथून राबवला जातो. हा कारभार म्हणजे उंटावरुन शेळया हाकल्या सारखाच असल्याने पाणी चोरीला आळा घालणे अवघड झाले आहे.

कर्मचारी कमतरतेने अडचणीकार्यालयात कर्मचा-यांच्या कमतरतेबाबत आम्ही वरिष्ठांना वेळोवेळी कळवलेले आहे. कर्मचा-यांचे संख्याबळ कमी असल्यामुळे पाणी चोरी संदर्भात कारवाई करण्यास अडचणी येतात.- व्ही. आर.फड, शाखा अधिकारी, माजलगांव जलसंधारण व उपसासिंचन शाखा क्र.- 2