शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कर्मचारी कमतरतेने पाणी चोर निर्धास्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 17:23 IST

कालव्याच्या मार्गातील अनेक गावातील नागरिकांनी हा कालवा जागोजागी फोडलेला आहे. यासोबतच धरणातील पाण्याची देखील मोठया प्रमाणावर चोरी होत आहे.परंतु; जलसंधारण व उपसा सिंचन विभागाच्या माजलगाव येथील कार्यालयात कर्मचा-यांची कमतरता असल्याने पाणी चोरीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. 

ऑनलाईन लोकमत

माजलगाव (बीड), दि. १३ : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याचा बराचसा भाग गेवराई व माजलगांव तालुक्यातुन माजलगांव धरणापर्यंत आलेला आहे. कालव्याच्या मार्गातील अनेक गावातील नागरिकांनी हा कालवा जागोजागी फोडलेला आहे. यासोबतच धरणातील पाण्याची देखील मोठया प्रमाणावर चोरी होत आहे.परंतु; जलसंधारण व उपसा सिंचन विभागाच्या माजलगाव येथील कार्यालयात कर्मचा-यांची कमतरता असल्याने पाणी चोरीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. 

माजलगांव धरणाच्या पाण्यावर तसेच पैठण येथुन कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम उपसा सिंचन योजनेच्या दोन शाखांमार्फत केले जाते. दोन्ही शाखांमध्ये मिळुन कालवा निरीक्षकांची 6 पदे, दप्तर कारकुनची 2 पदे व मजुरांची 6 अशी 14 पदे रिक्त आहेत. यामुळे या शाखांमार्फत आता केवळ कार्यालयीन कामच होते. प्रत्यक्ष कामासाठी येथे कर्मचारीच नाहीत. 

बिनधास्त चोरले जाते पाणी  धरणाकडे येणा-या कालव्याला ठिकठिकाणी लोकांनी छिद्र पाडून पाणी वळवलेले आहे. एका गावात तर चक्क बंधा-यात ओढुन घेतलेले आहे त्यामुळे पैठण वरुन निघालेल्या पाण्याच्या केवळ 10 टक्के इतकेच पाणी धरणात येते. याने  कालव्याची अगदी चाळण झाली आहे. यातच कालवा निरीक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे कालव्यावर नेमके काय चाललेय याची माहिती विभागाला फार उशिराने मिळते. माहिती मिळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तसेच कारवाईसाठी निरीक्षकच नसल्यामुळे या पाणी चोरांवर कोणतीच कारवाई करता येत नाही. यामुळे हे पाणी चोर अगदी निर्धास्त आहेत. 

दुसरीकडे, याच विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या धरणातील पाण्याचा देखील मोठया प्रमाणावर अवैधरीत्या उपसा  होत आहे. धरणावरुन शेतीसाठी पाणी उपसा करण्याचे 1586 जणांना परवाने देण्यात आलेले आहेत. यातील केवळ 350 परवाना धारकाच पाणी उपसा करत आहेत. या व्यतिरिक्त दीड ते दोन हजार मोटार मात्र विनापरवानाच पाणी उपसा करत आहेत. पाटबंधारे विभागा अंतर्गत असलेली जवळपास सर्वच कार्यालये ही सन 2000 मध्ये माजलगांव येथुन परळी येथे स्थलांतरीत झालेले आहेत. यामुळे विभागाचा सारा कारभार परळी येथून राबवला जातो. हा कारभार म्हणजे उंटावरुन शेळया हाकल्या सारखाच असल्याने पाणी चोरीला आळा घालणे अवघड झाले आहे.

कर्मचारी कमतरतेने अडचणीकार्यालयात कर्मचा-यांच्या कमतरतेबाबत आम्ही वरिष्ठांना वेळोवेळी कळवलेले आहे. कर्मचा-यांचे संख्याबळ कमी असल्यामुळे पाणी चोरी संदर्भात कारवाई करण्यास अडचणी येतात.- व्ही. आर.फड, शाखा अधिकारी, माजलगांव जलसंधारण व उपसासिंचन शाखा क्र.- 2