शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
5
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
6
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
7
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
8
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
9
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
10
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
11
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
12
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
13
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
14
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
15
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
16
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
17
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
18
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
19
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
20
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!

बोगस ठराव घेऊन शालेय अनुदानासह वसतिगृहात अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:21 IST

गेवराई : शालेय समिती अस्तित्वात नसतानादेखील बोगस ठराव व कागदपत्रे जोडून मुख्याध्यापक व तत्कालीन शालेय समिती अध्यक्षांनी शालेय अनुदानासह ...

गेवराई : शालेय समिती अस्तित्वात नसतानादेखील बोगस ठराव व कागदपत्रे जोडून मुख्याध्यापक व तत्कालीन शालेय समिती अध्यक्षांनी शालेय अनुदानासह ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या वसतिगृहात अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, संबंधित मुख्याध्यापक व शालेय समिती अध्यक्षावर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी मंगळवारी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली असून तत्काळ कारवाई न केल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

गेवराई तालुक्यातील कोळगाव याठिकाणी जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे. दरम्यान, या शाळेच्या शालेय शिक्षण समितीची मुदत गतवर्षी २२ जुलै २०१९ रोजी संपलेली आहे. मात्र, समितीची मुदत संपल्यानंतर देखील या शाळेचे मुख्याध्यापक धनवे व तत्कालीन शालेय समिती अध्यक्ष यांनी संगनमत करून नवीन समिती गठित केली नसल्याचा आरोप निवेदनात ग्रामस्थांनी केलेला आहे. तसेच पूर्वीच्या समितीची मुदत संपल्याने ती बरखास्त असताना देखील डिसेंबरमध्ये ऊसतोड मजुरांसाठी चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहासाठी बोगस ठराव व कागदपत्रे जोडून गटशिक्षणाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांची फसवणूक करीत वसतिगृहाला मंजुरी आणली. यामध्ये ऊसतोड मजुरांची मुले नसतानादेखील बोगस विद्यार्थी दाखवून मोठा अपहार केला आहे, तसेच शालेय अनुदानात देखील मुख्याध्यापकांनी समिती अध्यक्षांच्या सहमतीने बँकेत व्यवहार करून अफरातफर केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या अपहाराची चौकशी करुन दोषी मुख्याध्यापक व तत्कालीन शालेय समिती अध्यक्षावर कारवाई न केल्यास येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ८ फेब्रुवारी रोजी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शालेय समिती सदस्य शामसुंदर पाटील, तीर्थराज बारहाते, जयदत्त बनसोडे, जीवन लोंढे, गोविंद रासकर, रमेश शेंडगे आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे.

२२ जुलै २०१९ रोजी शालेय समितीची मुदत संपल्यानंतर समितीची नव्याने स्थापना करण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे पूर्वीच्या समितीचा ठराव घेऊन वसतिगृह सुरू करण्यात आले. यानंतर कोविडमुळे समिती गठित करू शकलो नसल्याचे मुख्याध्यापक धनवे यांनी सांगितले. त्यामुळे मुदत संपल्यावर कोरोनाचे लाॅकडाऊन २२ मार्च रोजी लागले. त्यामुळे मुदत संपल्यावर तब्बल ९ महिने समिती का गठित केली नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.