शहरं
Join us  
Trending Stories
1
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
2
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
3
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
4
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
5
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
6
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
7
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
8
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
9
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
10
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
11
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
12
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
13
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
14
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
15
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
16
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
17
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
18
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
19
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
20
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी

बोगस ठराव घेऊन शालेय अनुदानासह वसतिगृहात अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:21 IST

गेवराई : शालेय समिती अस्तित्वात नसतानादेखील बोगस ठराव व कागदपत्रे जोडून मुख्याध्यापक व तत्कालीन शालेय समिती अध्यक्षांनी शालेय अनुदानासह ...

गेवराई : शालेय समिती अस्तित्वात नसतानादेखील बोगस ठराव व कागदपत्रे जोडून मुख्याध्यापक व तत्कालीन शालेय समिती अध्यक्षांनी शालेय अनुदानासह ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या वसतिगृहात अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, संबंधित मुख्याध्यापक व शालेय समिती अध्यक्षावर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी मंगळवारी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली असून तत्काळ कारवाई न केल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

गेवराई तालुक्यातील कोळगाव याठिकाणी जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे. दरम्यान, या शाळेच्या शालेय शिक्षण समितीची मुदत गतवर्षी २२ जुलै २०१९ रोजी संपलेली आहे. मात्र, समितीची मुदत संपल्यानंतर देखील या शाळेचे मुख्याध्यापक धनवे व तत्कालीन शालेय समिती अध्यक्ष यांनी संगनमत करून नवीन समिती गठित केली नसल्याचा आरोप निवेदनात ग्रामस्थांनी केलेला आहे. तसेच पूर्वीच्या समितीची मुदत संपल्याने ती बरखास्त असताना देखील डिसेंबरमध्ये ऊसतोड मजुरांसाठी चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहासाठी बोगस ठराव व कागदपत्रे जोडून गटशिक्षणाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांची फसवणूक करीत वसतिगृहाला मंजुरी आणली. यामध्ये ऊसतोड मजुरांची मुले नसतानादेखील बोगस विद्यार्थी दाखवून मोठा अपहार केला आहे, तसेच शालेय अनुदानात देखील मुख्याध्यापकांनी समिती अध्यक्षांच्या सहमतीने बँकेत व्यवहार करून अफरातफर केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या अपहाराची चौकशी करुन दोषी मुख्याध्यापक व तत्कालीन शालेय समिती अध्यक्षावर कारवाई न केल्यास येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ८ फेब्रुवारी रोजी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शालेय समिती सदस्य शामसुंदर पाटील, तीर्थराज बारहाते, जयदत्त बनसोडे, जीवन लोंढे, गोविंद रासकर, रमेश शेंडगे आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे.

२२ जुलै २०१९ रोजी शालेय समितीची मुदत संपल्यानंतर समितीची नव्याने स्थापना करण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे पूर्वीच्या समितीचा ठराव घेऊन वसतिगृह सुरू करण्यात आले. यानंतर कोविडमुळे समिती गठित करू शकलो नसल्याचे मुख्याध्यापक धनवे यांनी सांगितले. त्यामुळे मुदत संपल्यावर कोरोनाचे लाॅकडाऊन २२ मार्च रोजी लागले. त्यामुळे मुदत संपल्यावर तब्बल ९ महिने समिती का गठित केली नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.